शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

नांदेड जिल्ह्यात दहा लाख घनमीटर गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:50 AM

जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मार्चपासून सुरू झालेल्या या कामामध्ये राज्यात सर्वाधिक १० लाख ४८ हजार घनमीटर गाळ जिल्ह्यातील ३२ तलावांतून उपसण्यात आला आहे. जवळपास दीड लाख ट्रॅक्टर गाळ शेतक-यांनी आपल्या शेतात नेला आहे.

ठळक मुद्देगाळमुक्त धरण : ३२ तलावांतून उपसला गाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मार्चपासून सुरू झालेल्या या कामामध्ये राज्यात सर्वाधिक १० लाख ४८ हजार घनमीटर गाळ जिल्ह्यातील ३२ तलावांतून उपसण्यात आला आहे. जवळपास दीड लाख ट्रॅक्टर गाळ शेतक-यांनी आपल्या शेतात नेला आहे.जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत ४६ तलावांतील गाळ काढण्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी आजघडीला ३२ तलावांतून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. जवळपास ५० हून अधिक पोकलेन व जेसीबी मशीनद्वारे गाळ काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३२ तलावांतून १० लाख ४८ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.गाळ काढण्याचे हे काम संपूर्ण लोकसहभाग आणि प्रशासकीय पातळीवर अशा दोन टप्प्यांत सुरू आहे. संपूर्ण लोकसहभागाअंतर्गत सुरू असलेल्या कामामध्ये प्रशासनाकडून तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे.यासाठी मानव लोक सेवाभावी संस्था, अनुलोम सेवाभावी संस्था आणि सगरोळी सांस्कृतिक मंडळ सगरोळीचे येथील संस्थांचे सहाय मिळत आहे. तर प्रशासकीय पातळीवरील कामामध्ये तांत्रिक मार्गदर्शनासह ११.५७ पैसे प्रति घनमीटर दराने जेसीबींना भाडे दिले जात आहे. जिल्ह्यात झालेल्या गाळमुक्त धरण योजनेत राज्यात सर्वाधिक गाळ नांदेड जिल्ह्यातून काढल्याची माहितीही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.जिल्ह्यात गाळमुक्त धरण योजनेअंतर्गत निघणारा गाळ घेवून जाण्यासाठी शेतकºयांनी तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यातून गाळयुक्त शिवार ही संकल्पनाही प्रत्यक्षात येत आहे. गाळ नेलेल्या अनेक शेतकºयांनी आपल्या शेतातून पिकांचे उत्पन्न वाढल्याचे सांगितले आहे.तलावातील गाळ काढण्यास चांगला प्रतिसाद मिळत असला तरीही त्यासाठी आवश्यक ती मशिनरी उपलब्ध नसल्याने या कामाला म्हणावी तितकी गती आली नसल्याची बाबही पुढे आली आहे. गाळमुक्त धरणासाठी शासनस्तरावर निधीची कमतरता नसली तरीही तांत्रिक साहित्य उपलब्ध होत नाही. या कामासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याचवेळी शिर्डी संस्थान आणि सिद्धीविनायक ट्रस्टकडेही मदत मागण्यात आल्याचे डोंगरे यांनी सांगितले.मानार धरणातून पहिल्यांदाच गाळ उपसाजिल्ह्यात सर्वात मोठे धरण असलेल्या मानार प्रकल्पातील गाळ उपसा करण्याचे कामही सुरू झाले आहे. या धरणाच्या निर्मितीपासून म्हणजेच १९६२ पासून पहिल्यांदाच या धरणातील गाळ काढला जात आहे. मानार धरणात जवळपास २५ लाख घनमीटर गाळ असल्याचा अंदाज सिंचन विभागाने व्यक्त केला आहे. या धरणातून गाळ काढल्यानंतर पाणी उपलब्धता वाढणार आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील गाळ उपसा करण्याबाबत नियोजन केले जात आहे. मात्र विष्णूपुरीत नांदेड शहरासाठी पाण्याचा साठा आहे. त्यामुळे याबाबत मे अखेरीस हालचाली होतील़ विष्णूपुरी प्रकल्पाच्या दरवाजा क्र. १८ च्या दुरुस्तीबाबतही प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :DamधरणFarmerशेतकरी