शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नांदेड जिल्ह्यात दहा लाख घनमीटर गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:50 IST

जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मार्चपासून सुरू झालेल्या या कामामध्ये राज्यात सर्वाधिक १० लाख ४८ हजार घनमीटर गाळ जिल्ह्यातील ३२ तलावांतून उपसण्यात आला आहे. जवळपास दीड लाख ट्रॅक्टर गाळ शेतक-यांनी आपल्या शेतात नेला आहे.

ठळक मुद्देगाळमुक्त धरण : ३२ तलावांतून उपसला गाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मार्चपासून सुरू झालेल्या या कामामध्ये राज्यात सर्वाधिक १० लाख ४८ हजार घनमीटर गाळ जिल्ह्यातील ३२ तलावांतून उपसण्यात आला आहे. जवळपास दीड लाख ट्रॅक्टर गाळ शेतक-यांनी आपल्या शेतात नेला आहे.जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत ४६ तलावांतील गाळ काढण्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी आजघडीला ३२ तलावांतून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. जवळपास ५० हून अधिक पोकलेन व जेसीबी मशीनद्वारे गाळ काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३२ तलावांतून १० लाख ४८ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.गाळ काढण्याचे हे काम संपूर्ण लोकसहभाग आणि प्रशासकीय पातळीवर अशा दोन टप्प्यांत सुरू आहे. संपूर्ण लोकसहभागाअंतर्गत सुरू असलेल्या कामामध्ये प्रशासनाकडून तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे.यासाठी मानव लोक सेवाभावी संस्था, अनुलोम सेवाभावी संस्था आणि सगरोळी सांस्कृतिक मंडळ सगरोळीचे येथील संस्थांचे सहाय मिळत आहे. तर प्रशासकीय पातळीवरील कामामध्ये तांत्रिक मार्गदर्शनासह ११.५७ पैसे प्रति घनमीटर दराने जेसीबींना भाडे दिले जात आहे. जिल्ह्यात झालेल्या गाळमुक्त धरण योजनेत राज्यात सर्वाधिक गाळ नांदेड जिल्ह्यातून काढल्याची माहितीही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.जिल्ह्यात गाळमुक्त धरण योजनेअंतर्गत निघणारा गाळ घेवून जाण्यासाठी शेतकºयांनी तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यातून गाळयुक्त शिवार ही संकल्पनाही प्रत्यक्षात येत आहे. गाळ नेलेल्या अनेक शेतकºयांनी आपल्या शेतातून पिकांचे उत्पन्न वाढल्याचे सांगितले आहे.तलावातील गाळ काढण्यास चांगला प्रतिसाद मिळत असला तरीही त्यासाठी आवश्यक ती मशिनरी उपलब्ध नसल्याने या कामाला म्हणावी तितकी गती आली नसल्याची बाबही पुढे आली आहे. गाळमुक्त धरणासाठी शासनस्तरावर निधीची कमतरता नसली तरीही तांत्रिक साहित्य उपलब्ध होत नाही. या कामासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याचवेळी शिर्डी संस्थान आणि सिद्धीविनायक ट्रस्टकडेही मदत मागण्यात आल्याचे डोंगरे यांनी सांगितले.मानार धरणातून पहिल्यांदाच गाळ उपसाजिल्ह्यात सर्वात मोठे धरण असलेल्या मानार प्रकल्पातील गाळ उपसा करण्याचे कामही सुरू झाले आहे. या धरणाच्या निर्मितीपासून म्हणजेच १९६२ पासून पहिल्यांदाच या धरणातील गाळ काढला जात आहे. मानार धरणात जवळपास २५ लाख घनमीटर गाळ असल्याचा अंदाज सिंचन विभागाने व्यक्त केला आहे. या धरणातून गाळ काढल्यानंतर पाणी उपलब्धता वाढणार आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील गाळ उपसा करण्याबाबत नियोजन केले जात आहे. मात्र विष्णूपुरीत नांदेड शहरासाठी पाण्याचा साठा आहे. त्यामुळे याबाबत मे अखेरीस हालचाली होतील़ विष्णूपुरी प्रकल्पाच्या दरवाजा क्र. १८ च्या दुरुस्तीबाबतही प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :DamधरणFarmerशेतकरी