शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

नांदेड जिल्हा काँग्रेसची होणार पुनर्बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:30 IST

काँग्रेसचा गड म्हणून ओळख असलेल्या नांदेडमध्येच लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचे तोंड पहावे लागले. या निकालानंतर मागील काही दिवसांपासून जिल्हा काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरु होते. अखेर जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांच्यासह १९ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत शुक्रवारी आपल्या पदाचे राजीनामे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले.

ठळक मुद्देनैतिक जबाबदारी स्वीकारली जिल्हाध्यक्षांसह १९ पदाधिकाऱ्यांचे अशोकराव चव्हाण यांच्याकडे राजीनामे सादर

नांदेड : काँग्रेसचा गड म्हणून ओळख असलेल्या नांदेडमध्येच लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचे तोंड पहावे लागले. या निकालानंतर मागील काही दिवसांपासून जिल्हा काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरु होते. अखेर जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांच्यासह १९ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत शुक्रवारी आपल्या पदाचे राजीनामे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत महाराष्टÑातील दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाला होता. मात्र त्या निवडणुकीतही अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडसह हिंगोली मतदारसंघ राखण्यात काँग्रेसने यश मिळविले होते. या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. याही निवडणुकीत राष्टÑवादीच्या मदतीने नांदेड जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकावण्यात पक्षाला यश आले होते. जिल्हा परिषद निवडणुकी पाठोपाठ नांदेड महानगरपालिकेची महत्त्वाची निवडणूक पार पडली. महापालिका खेचण्यासाठी भाजपाने कंबर कसली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निम्मे मंत्रिमंडळ नांदेडमध्ये तळ ठोकून असतानाही अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने महापालिकेवर एकतर्फी झेंडा फडकाविला होता. महापालिकेतील या मोठ्या विजयामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाला यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला.या धक्कादायक निकालामध्ये नुकत्याच उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडीचा वाटा मोठा असला तरी जिल्ह्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांच्या प्रभागातही पक्षाला प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा कमी मते मिळाल्याचे पुढे आले होते. या बरोबरच दुसºया फळीतील काही नेत्यांबद्दल सर्वसामान्यांत असलेल्या नाराजीमुळेच अशोकराव चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाºयांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपले राजीनामे सादर करण्याचा निर्णय घेतला.शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे हे मुंबई येथे एका बैठकीसाठी उपस्थित होते. याचवेळी नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाºयांनी मुंबई येथे जावून आपल्या पदाचे राजीनामे चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले. राजीनामे सादर केलेल्या पदाधिकाºयांमध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांच्यासह जिल्ह्यातील १६ तालुकाध्यक्ष आणि देगलूर, सिडको तसेच तरोडा ब्लॉक अशा १९ पदाधिकाºयांचा समावेश आहे.फेरबदलाची शक्यता: नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना मिळणार संधीयेणाºया काही महिन्यांत काँग्रेसला विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूूमीवर पक्षाची नव्याने पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता व्यक्त होत होती. त्यातच काँग्रेसच्या सर्व १९ पदाधिकाºयांनी पक्षश्रेष्ठींनी आदेश न देताही आपल्या पदाचे राजीनामे सादर केलेले असल्याने येणाºया काळात जिल्हा काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता असून याचा फायदा पक्षाला होऊ शकतो.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसकडून बैठकांवर बैठका झाल्या. प्रत्येक प्रभागांसह जिल्हा परिषद गट आणि गणनिहाय मतदानाची आकडेवारीही तपासण्यात आली. या आकडेवारीवरुन पक्षातील पदाधिकारी नेमके कुठे कमी पडले? याचाही अंदाज पक्षाला आला आहे. त्यामुळेच शुक्रवारी पदाधिकाºयांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर काही पदांवर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस