शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नांदेडमध्ये १०० कुटुंबांच्या श्रमदानातून कोटीचे विहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 01:01 IST

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विहार म्हणजे समाजाला जोडणारा दुवा. आदर्श आणि जागरुक पिढी घडविण्यासाठी आपल्या वाडीतच सर्व सुविधांयुक्त विहार उभे करण्याचा संकल्प तब्बल २६ वर्षानंतर प्रत्यक्षात आला आहे. सुमारे एक कोटीचे हे विहार पूर्णा रोडवरील नवीवाडीतील शंभर कुटुंबांच्या श्रमदान आणि लोकवाट्यातून साकारले आहे.१९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्मदेशच्या बुद्धिस्ट ...

ठळक मुद्देनवीवाडीतील उपक्रम : २६ वर्षांच्या संघर्षानंतर मिळाले मूर्त रूप

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विहार म्हणजे समाजाला जोडणारा दुवा. आदर्श आणि जागरुक पिढी घडविण्यासाठी आपल्या वाडीतच सर्व सुविधांयुक्त विहार उभे करण्याचा संकल्प तब्बल २६ वर्षानंतर प्रत्यक्षात आला आहे. सुमारे एक कोटीचे हे विहार पूर्णा रोडवरील नवीवाडीतील शंभर कुटुंबांच्या श्रमदान आणि लोकवाट्यातून साकारले आहे.१९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्मदेशच्या बुद्धिस्ट शासन कौन्सिलपुढे बोलताना आपल्या अनुयायांना विहाराचे महत्त्व पटवून दिले होते. विहार उभारा, नियमितपणे तेथे जावून वंदना घ्या आणि उपदेश ग्रहण करतानाच समाजाचेही प्रबोधन करा, असा संदेश त्यांनी दिला होता. त्यानंतर केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात बौद्ध विहार उभारणीची चळवळ सुरू झाली. नांदेडमध्येही विविध ठिकाणी विहारे उभारली आहेत. ही विहारे पाहिल्यानंतर नवीवाडी पूर्णारोड येथील वाडी बु. मधील तरुणांना आपल्या परिसरातही विहार उभारण्याची संकल्पना सुचली. वाडी बु. मध्ये बौद्ध समाजाची सुमारे शंभर घरे आहेत. यातील ९० टक्के कुटुंबांची रोजीरोटी मजुरीवर अवलंबून आहे. मग विहार उभारायचे कशाने? असा प्रश्न या तरुणांसमोर उभा राहिला.त्यावेळी रमेश बुक्तरे यांच्यासह गोमाजी, विठ्ठल, रमेश, धर्माजी, निवृत्ती, किसन, वामनराव, संजय, सुदर्शन, दत्ता, साहेबराव आदी बुक्तरे कुटुंबातील सदस्यांसह हिरामण गोवंदे, आनंदा कंधारे आदींनी वाडीतीलच समाजातून लोकवर्गणी उभी करुन विहार बांधण्याचा निर्णय घेतला. बांधकामासाठी श्रमदान करण्याचा संकल्प या पुरुषांसह कुटुंबातील महिला आणि चिमुकल्यांनीही केला. आणि त्यानंतर १९९२ मध्ये विहाराच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. १९९४ पासून प्रत्येक कुटुंबाकडून महिन्याला ५० रुपये लोकवर्गणी जमा करण्यात येवू लागली. याबरोबरच नवीवाडीतील २५ ते ३० तरुणांचे भीमसेना लेझीम पथकही होते. या पथकाला त्या काळी मोठ-मोठ्या कार्यक्रमांसाठी मागणी असायची. या कार्यक्रमातून मिळालेले मानधनही या तरुणांनी विहार उभारणीसाठी दिले. यातून काही रक्कम उभारल्यानंतर हा पैसा गरजू कुटुंबाला अडी-नडीच्या वेळी देण्यात येवू लागला. गरज संपल्यानंतर घेतलेल्या पैशात काही भर घालून तो पैसा पुन्हा विहाराच्या बांधकाम कमिटीकडे येवू लागला. विहाराच्या फाऊंडेशनसह इतर कामासाठीही वस्तीतील सर्व कुटुंबियांनी मोठ्या उत्साहाने श्रमदान केले. त्यामुळेच आज हे भव्य विहार उभे राहिले आहे. सद्य:स्थितीत या दोन मजली विहारातील खालच्या मजल्यावर एका सभागृहासह पुस्तकांसाठी एक खोली बांधण्यात आली असून दुसऱ्या मजल्यावर बुद्धवंदनेसाठी मोठे सभागृह उभारण्यात आले आहे. विहारासाठी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून पाच फुटांची तथागताची देखणी मूर्ती आणण्यात आली असून मंगळवारी सकाळी १० वाजता या विहाराचे लोकार्पण होणार आहे. २६ वर्षांच्या कष्ट आणि संघर्षानंतर साकारलेली विहाराची देखणी इमारत पाहिल्यानंतर या सर्वांचेच चेहरे आनंदाने फुलून गेल्याचे चित्र होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNandedनांदेड