शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

नांदेडमध्ये १०० कुटुंबांच्या श्रमदानातून कोटीचे विहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 01:01 IST

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विहार म्हणजे समाजाला जोडणारा दुवा. आदर्श आणि जागरुक पिढी घडविण्यासाठी आपल्या वाडीतच सर्व सुविधांयुक्त विहार उभे करण्याचा संकल्प तब्बल २६ वर्षानंतर प्रत्यक्षात आला आहे. सुमारे एक कोटीचे हे विहार पूर्णा रोडवरील नवीवाडीतील शंभर कुटुंबांच्या श्रमदान आणि लोकवाट्यातून साकारले आहे.१९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्मदेशच्या बुद्धिस्ट ...

ठळक मुद्देनवीवाडीतील उपक्रम : २६ वर्षांच्या संघर्षानंतर मिळाले मूर्त रूप

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विहार म्हणजे समाजाला जोडणारा दुवा. आदर्श आणि जागरुक पिढी घडविण्यासाठी आपल्या वाडीतच सर्व सुविधांयुक्त विहार उभे करण्याचा संकल्प तब्बल २६ वर्षानंतर प्रत्यक्षात आला आहे. सुमारे एक कोटीचे हे विहार पूर्णा रोडवरील नवीवाडीतील शंभर कुटुंबांच्या श्रमदान आणि लोकवाट्यातून साकारले आहे.१९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्मदेशच्या बुद्धिस्ट शासन कौन्सिलपुढे बोलताना आपल्या अनुयायांना विहाराचे महत्त्व पटवून दिले होते. विहार उभारा, नियमितपणे तेथे जावून वंदना घ्या आणि उपदेश ग्रहण करतानाच समाजाचेही प्रबोधन करा, असा संदेश त्यांनी दिला होता. त्यानंतर केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात बौद्ध विहार उभारणीची चळवळ सुरू झाली. नांदेडमध्येही विविध ठिकाणी विहारे उभारली आहेत. ही विहारे पाहिल्यानंतर नवीवाडी पूर्णारोड येथील वाडी बु. मधील तरुणांना आपल्या परिसरातही विहार उभारण्याची संकल्पना सुचली. वाडी बु. मध्ये बौद्ध समाजाची सुमारे शंभर घरे आहेत. यातील ९० टक्के कुटुंबांची रोजीरोटी मजुरीवर अवलंबून आहे. मग विहार उभारायचे कशाने? असा प्रश्न या तरुणांसमोर उभा राहिला.त्यावेळी रमेश बुक्तरे यांच्यासह गोमाजी, विठ्ठल, रमेश, धर्माजी, निवृत्ती, किसन, वामनराव, संजय, सुदर्शन, दत्ता, साहेबराव आदी बुक्तरे कुटुंबातील सदस्यांसह हिरामण गोवंदे, आनंदा कंधारे आदींनी वाडीतीलच समाजातून लोकवर्गणी उभी करुन विहार बांधण्याचा निर्णय घेतला. बांधकामासाठी श्रमदान करण्याचा संकल्प या पुरुषांसह कुटुंबातील महिला आणि चिमुकल्यांनीही केला. आणि त्यानंतर १९९२ मध्ये विहाराच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. १९९४ पासून प्रत्येक कुटुंबाकडून महिन्याला ५० रुपये लोकवर्गणी जमा करण्यात येवू लागली. याबरोबरच नवीवाडीतील २५ ते ३० तरुणांचे भीमसेना लेझीम पथकही होते. या पथकाला त्या काळी मोठ-मोठ्या कार्यक्रमांसाठी मागणी असायची. या कार्यक्रमातून मिळालेले मानधनही या तरुणांनी विहार उभारणीसाठी दिले. यातून काही रक्कम उभारल्यानंतर हा पैसा गरजू कुटुंबाला अडी-नडीच्या वेळी देण्यात येवू लागला. गरज संपल्यानंतर घेतलेल्या पैशात काही भर घालून तो पैसा पुन्हा विहाराच्या बांधकाम कमिटीकडे येवू लागला. विहाराच्या फाऊंडेशनसह इतर कामासाठीही वस्तीतील सर्व कुटुंबियांनी मोठ्या उत्साहाने श्रमदान केले. त्यामुळेच आज हे भव्य विहार उभे राहिले आहे. सद्य:स्थितीत या दोन मजली विहारातील खालच्या मजल्यावर एका सभागृहासह पुस्तकांसाठी एक खोली बांधण्यात आली असून दुसऱ्या मजल्यावर बुद्धवंदनेसाठी मोठे सभागृह उभारण्यात आले आहे. विहारासाठी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून पाच फुटांची तथागताची देखणी मूर्ती आणण्यात आली असून मंगळवारी सकाळी १० वाजता या विहाराचे लोकार्पण होणार आहे. २६ वर्षांच्या कष्ट आणि संघर्षानंतर साकारलेली विहाराची देखणी इमारत पाहिल्यानंतर या सर्वांचेच चेहरे आनंदाने फुलून गेल्याचे चित्र होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNandedनांदेड