शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

Nanded: उन्हाच्या तडाख्यात मोठ्या कष्टाने जगवलेल्या केळीच्या बागा वादळीवाऱ्याने उद्धवस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:18 IST

अर्धापूरात वादळीवाऱ्यामुळे केळी बागा उद्धवस्त; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

- गोविंद टेकाळे अर्धापूर (जिल्हा नांदेड) : गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाचा केळी बागांना मोठा फटका बसत असून पाणी पातळी खालावल्याने पाण्याचे कसेबसे नियोजन करून बाग जोपासत असतानाच सोमवारी दि.५ रोजी सायंकाळी जोरदार वादळी वादळीवाऱ्यामुळे केळी बागा उन्मळून, मोडून पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले. 

काही दिवसापासून तापमानाचा पारा ४५ अंशावर गेल्याने वाढत्या तापमानात केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात होरपळल्या. पाणी पातळी खालावल्याने पाण्याचे कसेबसे नियोजन करून केळीच्या बागा शेतकऱ्यांनी जगवल्या. काढणी आलेली असतानाच आता वादळीवाऱ्याने केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. बामणी येथील बालाजी सत्ताप्पा हुडे गट नं.३०, उमाजी शंकर देलमडे ग. नं.७७, संजय नागोराव देलमोडे गट २७, माणिक मारोती हुडे गट नंबर २४, बंडू बाबुराव देलमडे गट नंबर २६ यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावलानांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. बामणी शिवारात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. जोराच्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या पडल्या असून अक्षरशः केळीच्या पानांची चाळणी झाली आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या  वादळी वाऱ्याने या शिवारातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. केळीचे भाव कोसळल्यामुळे उत्पादक शेतकरी निराश झाले आहेत. या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडल्या आहेत. हाती आलेल्या पिकांचे डोळ्यांसमोर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र