शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
2
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
3
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
4
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
5
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
6
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
7
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
8
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
9
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
10
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
11
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
12
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
13
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
14
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
15
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
16
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
17
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
18
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
19
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
20
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: उन्हाच्या तडाख्यात मोठ्या कष्टाने जगवलेल्या केळीच्या बागा वादळीवाऱ्याने उद्धवस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:18 IST

अर्धापूरात वादळीवाऱ्यामुळे केळी बागा उद्धवस्त; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

- गोविंद टेकाळे अर्धापूर (जिल्हा नांदेड) : गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाचा केळी बागांना मोठा फटका बसत असून पाणी पातळी खालावल्याने पाण्याचे कसेबसे नियोजन करून बाग जोपासत असतानाच सोमवारी दि.५ रोजी सायंकाळी जोरदार वादळी वादळीवाऱ्यामुळे केळी बागा उन्मळून, मोडून पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले. 

काही दिवसापासून तापमानाचा पारा ४५ अंशावर गेल्याने वाढत्या तापमानात केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात होरपळल्या. पाणी पातळी खालावल्याने पाण्याचे कसेबसे नियोजन करून केळीच्या बागा शेतकऱ्यांनी जगवल्या. काढणी आलेली असतानाच आता वादळीवाऱ्याने केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. बामणी येथील बालाजी सत्ताप्पा हुडे गट नं.३०, उमाजी शंकर देलमडे ग. नं.७७, संजय नागोराव देलमोडे गट २७, माणिक मारोती हुडे गट नंबर २४, बंडू बाबुराव देलमडे गट नंबर २६ यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावलानांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. बामणी शिवारात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. जोराच्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या पडल्या असून अक्षरशः केळीच्या पानांची चाळणी झाली आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या  वादळी वाऱ्याने या शिवारातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. केळीचे भाव कोसळल्यामुळे उत्पादक शेतकरी निराश झाले आहेत. या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडल्या आहेत. हाती आलेल्या पिकांचे डोळ्यांसमोर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र