शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

नांदेडात अनुदान याद्यांचा घोळ मिटेना; शेतकऱ्यांसाठीचे २६३ कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:03 IST

शेतकऱ्यांसाठी शासनाकडून २०१६ आणि २०१७ मध्ये मिळालेली रक्कम अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही़  

ठळक मुद्दे पीकविमा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त न झाल्याने अनुदान वाटपास विलंब , बँकांतील याद्यांचा घोळ मिटत नसल्याने अनुदानाचे जवळपास २६३ कोटी रूपये पडून आहेत.

- श्रीनिवास भोसले

नांदेड : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या व पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून २०१६ आणि २०१७ मध्ये मिळालेली रक्कम अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही़  दरम्यान, पीकविमा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त न झाल्याने अनुदान वाटपास विलंब लागत असल्याचे प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे़ परंतु, बँकांतील याद्यांचा घोळ मिटत नसल्याने अनुदानाचे जवळपास २६३ कोटी रूपये प्रशासनाच्या खात्यात पडून आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती धोक्यात आली आहे़ त्यातच शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेची योग्य अंमलबजावणी करण्याचे काम मागील काही वर्षांपासून सुरू केले आहे़ त्यामुळे पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीनंतरही पिकांचा योग्य मोबदला मिळत आहे़ परंतु, हजारो शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नसल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे़ त्यातच २०१६ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होवून हजारो हेक्टरवरील पीक गेले़ हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतल्याने हतबल झालेल्या लाखो शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे कवच मिळाले़ तर पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना सरकारने नांदेड जिल्ह्यासाठी २६१ कोटी ९६ लाख रुपये दिले़

यातून अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणात आहे़ तर मागील वर्षात भोकर, किनवट, माहूर, मुदखेड आणि नायगाव या पाच तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचा फटका बसला़ त्यांना मदत म्हणून शासनाने ८५ लाख रूपये मंजूर करून ते जिल्हा प्रशासनाच्या खात्यात जमा केले़ परंतु, आजपर्यंत दोन्ही वर्षातील अनुदान वाटपास प्रत्यक्षात सुरूवात झाली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यातून रोष व्यक्त केला जात आहे़ दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला असेल त्यांना हे अनुदान देता येणार नाही़ त्यामुळे पीकविमा प्राप्त शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून मिळविण्याचे काम संबंधित तहसील प्रशासन करीत असल्याचे समजते़ त्यातही वेगवेगळ्या बँकांना वेगवेगळी गावे दत्तक दिली आहेत़ पीकविमा वेगळ्या बॅकेत मिळाला तर गाव दत्तक वेगळ्याच बँकेत आहे़ त्यातच सरकारने छत्रपती शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली़ या निर्णयाची अंमलबजावणीत बँका गुंतल्याने पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांच्या याद्या काढण्यात वेळ गेला़

मागील दोन वर्षांपासून सदर याद्यांचा घोळ मिटलेला नाही़ परिणामी शेतकऱ्यांचे २६३ कोटी रूपये प्रशासनाच्या खात्यात पडून आहेत़  यात २६१ कोटी ९५ लाख ९९ हजार रुपये हे २०१६ मधील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना तर ८५ लाख रूपये हे २०१७ मधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पाच तालुक्यांसाठी आहेत़ नांदेड जिल्ह्यात आॅगस्ट २०१८ मध्ये बहुतांश मंडळात अतिवृष्टी होवून हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले़ त्यातच सलग रिमझिम पाऊस, दमट वातावरणामुळे सोयाबीन आणि कापसावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला़ 

अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचे हेलपाटेअतिवृष्टीने नुकसान झालेल्या, परंतु विम्यापासून वंचित  शेतकऱ्यांची नावे बँकेकडून घेण्याचे तसेच काही ठिकाणी अनुदान वाटपाचे काम सुरू आहे़ वंचित शेतकऱ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी सांगितले़ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मिळालेली तालुकानिहाय रक्कम (कोटीमध्ये) नांदेड-१३़३४, मुदखेड-१९़५३, अर्धापूर- ११़४५ भोकर-७़४४, कंधार-१७़६३, लोहा-२९़४२, किनवट-२०़८३, माहूर-१३़०१, हदगाव -१५़१४, हिमायतनगर-८़५७, देगलूर- १९़९६,  मुखेड-३१़११  नायगाव -१३़२१, उमरी - ११़७६, धर्माबाद -११़८१ कोटी रूपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे़  

टॅग्स :fundsनिधीNandedनांदेडFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारagricultureशेती