शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पदाधिकारी आचारसंहितेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:44 IST

शहरावर विशेषत: दक्षिण नांदेडमध्ये निर्माण झालेली पाणीबाणी सोडविण्यासाठी महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग या विभागांची धावपळ सुरु आहे. दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकारी मात्र अद्यापही आचारसंहितेतच आहेत.

ठळक मुद्देपाणीबाणी ना बैठक, ना चर्चाप्रशासकीय अधिकाऱ्यांची मात्र धावपळ सुरु

नांदेड : शहरावर विशेषत: दक्षिण नांदेडमध्ये निर्माण झालेली पाणीबाणी सोडविण्यासाठी महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग या विभागांची धावपळ सुरु आहे. दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकारी मात्र अद्यापही आचारसंहितेतच आहेत. १८ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर आचारसंहिता संपली तरी ती निश्चितपणे शिथील झाली आहे. महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांनी मात्र या विषयाला अद्यापही मनावर घेतले नाही.नांदेड शहराला २३ एप्रिलपासून दोन ऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. प्रकल्पात केवळ ८.५ दलघमी म्हणजेच ९.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. निवडणुका संपताच प्रशासकीय यंत्रणेला पाण्याचे गांभीर्य कळाले. महापालिकेने दोनऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तर खुद्द जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनीही नांदेडच्या पाणीप्रश्नावर स्वतंत्रपणे बैठक घेतली. त्यानंतर २६ एप्रिल रोजी विष्णूपुरी प्रकल्पास भेट देवून प्रत्यक्ष पाणी स्थितीची पाहणीही केली. विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी तीन पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे. महावितरणला प्रकल्प क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत.एकीकडे प्रशासकीय यंत्रणेकडून पाणीबाणीचा दररोज आढावा घेतला जात असताना महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक मात्र अद्यापही आचारसंहितेच्याच अंमलाखाली आहेत. पाणी विषयावर एकाही पदाधिकारी अथवा नगरसेवकांनी प्रशासनाकडे साधी विचारणाही केली नाही. पाण्यासारख्या अत्यावश्यक बाबीवर महापौरासह इतर पदाधिकाऱ्यांनी बैठक घेणे अपेक्षित होते. १८ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आचारसंहिता कालावधीतही पाण्यासारख्या विषयावर निर्णय घेता येतात. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत आचारसंहितेचा बाऊ करुन पाणीटंचाई निवारणाची कामे अडवू नका, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असतानाही महापालिकेची आचारसंहिता मात्र अद्यापही कायमच आहे.दरम्यान, उत्तर नांदेडला इसापूर प्रकल्पाचे पाणी सांगवी बंधाºयातून पुरविले जात आहे. काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी घेतले जात आहे. तेथून संपूर्ण उत्तर नांदेडसह दक्षिण नांदेडच्या काही भागालाही पाणी दिले जात आहे. इसापूरमधून चौथी पाणीपाळी घेण्यात आली आहे. आणखी एक पाणीपाळी मे मध्ये उपलब्ध होणार आहे.सरपंच, ग्रामसेवकांची बैठकविष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी तीन पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यातील दोन पथके शनिवारी प्रकल्प क्षेत्रात गस्तीवर पोहोचले. या पथकांनी प्रकल्प क्षेत्राच्या दोन्हीही बाजूंनी असलेल्या ९ गावांमध्ये सरपंच, ग्रामसेवक तसेच गावातील प्रमुख व्यक्तींची बैठक घेतली. नांदेड शहराचा पाणीप्रश्न गंभीर झाल्याचे सांगताना जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाबाबतही गावकºयांना अवगत करण्यात आले. प्रकल्पावर बसविलेल्या मोटारी स्वत: शेतकºयांनी काढून घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या मोटारी न काढल्यास त्या जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका