शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पदाधिकारी आचारसंहितेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:44 IST

शहरावर विशेषत: दक्षिण नांदेडमध्ये निर्माण झालेली पाणीबाणी सोडविण्यासाठी महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग या विभागांची धावपळ सुरु आहे. दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकारी मात्र अद्यापही आचारसंहितेतच आहेत.

ठळक मुद्देपाणीबाणी ना बैठक, ना चर्चाप्रशासकीय अधिकाऱ्यांची मात्र धावपळ सुरु

नांदेड : शहरावर विशेषत: दक्षिण नांदेडमध्ये निर्माण झालेली पाणीबाणी सोडविण्यासाठी महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग या विभागांची धावपळ सुरु आहे. दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकारी मात्र अद्यापही आचारसंहितेतच आहेत. १८ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर आचारसंहिता संपली तरी ती निश्चितपणे शिथील झाली आहे. महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांनी मात्र या विषयाला अद्यापही मनावर घेतले नाही.नांदेड शहराला २३ एप्रिलपासून दोन ऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. प्रकल्पात केवळ ८.५ दलघमी म्हणजेच ९.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. निवडणुका संपताच प्रशासकीय यंत्रणेला पाण्याचे गांभीर्य कळाले. महापालिकेने दोनऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तर खुद्द जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनीही नांदेडच्या पाणीप्रश्नावर स्वतंत्रपणे बैठक घेतली. त्यानंतर २६ एप्रिल रोजी विष्णूपुरी प्रकल्पास भेट देवून प्रत्यक्ष पाणी स्थितीची पाहणीही केली. विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी तीन पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे. महावितरणला प्रकल्प क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत.एकीकडे प्रशासकीय यंत्रणेकडून पाणीबाणीचा दररोज आढावा घेतला जात असताना महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक मात्र अद्यापही आचारसंहितेच्याच अंमलाखाली आहेत. पाणी विषयावर एकाही पदाधिकारी अथवा नगरसेवकांनी प्रशासनाकडे साधी विचारणाही केली नाही. पाण्यासारख्या अत्यावश्यक बाबीवर महापौरासह इतर पदाधिकाऱ्यांनी बैठक घेणे अपेक्षित होते. १८ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आचारसंहिता कालावधीतही पाण्यासारख्या विषयावर निर्णय घेता येतात. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत आचारसंहितेचा बाऊ करुन पाणीटंचाई निवारणाची कामे अडवू नका, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असतानाही महापालिकेची आचारसंहिता मात्र अद्यापही कायमच आहे.दरम्यान, उत्तर नांदेडला इसापूर प्रकल्पाचे पाणी सांगवी बंधाºयातून पुरविले जात आहे. काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी घेतले जात आहे. तेथून संपूर्ण उत्तर नांदेडसह दक्षिण नांदेडच्या काही भागालाही पाणी दिले जात आहे. इसापूरमधून चौथी पाणीपाळी घेण्यात आली आहे. आणखी एक पाणीपाळी मे मध्ये उपलब्ध होणार आहे.सरपंच, ग्रामसेवकांची बैठकविष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी तीन पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यातील दोन पथके शनिवारी प्रकल्प क्षेत्रात गस्तीवर पोहोचले. या पथकांनी प्रकल्प क्षेत्राच्या दोन्हीही बाजूंनी असलेल्या ९ गावांमध्ये सरपंच, ग्रामसेवक तसेच गावातील प्रमुख व्यक्तींची बैठक घेतली. नांदेड शहराचा पाणीप्रश्न गंभीर झाल्याचे सांगताना जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाबाबतही गावकºयांना अवगत करण्यात आले. प्रकल्पावर बसविलेल्या मोटारी स्वत: शेतकºयांनी काढून घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या मोटारी न काढल्यास त्या जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका