शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

पदाधिकारी आचारसंहितेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:44 IST

शहरावर विशेषत: दक्षिण नांदेडमध्ये निर्माण झालेली पाणीबाणी सोडविण्यासाठी महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग या विभागांची धावपळ सुरु आहे. दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकारी मात्र अद्यापही आचारसंहितेतच आहेत.

ठळक मुद्देपाणीबाणी ना बैठक, ना चर्चाप्रशासकीय अधिकाऱ्यांची मात्र धावपळ सुरु

नांदेड : शहरावर विशेषत: दक्षिण नांदेडमध्ये निर्माण झालेली पाणीबाणी सोडविण्यासाठी महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग या विभागांची धावपळ सुरु आहे. दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकारी मात्र अद्यापही आचारसंहितेतच आहेत. १८ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर आचारसंहिता संपली तरी ती निश्चितपणे शिथील झाली आहे. महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांनी मात्र या विषयाला अद्यापही मनावर घेतले नाही.नांदेड शहराला २३ एप्रिलपासून दोन ऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. प्रकल्पात केवळ ८.५ दलघमी म्हणजेच ९.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. निवडणुका संपताच प्रशासकीय यंत्रणेला पाण्याचे गांभीर्य कळाले. महापालिकेने दोनऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तर खुद्द जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनीही नांदेडच्या पाणीप्रश्नावर स्वतंत्रपणे बैठक घेतली. त्यानंतर २६ एप्रिल रोजी विष्णूपुरी प्रकल्पास भेट देवून प्रत्यक्ष पाणी स्थितीची पाहणीही केली. विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी तीन पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे. महावितरणला प्रकल्प क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत.एकीकडे प्रशासकीय यंत्रणेकडून पाणीबाणीचा दररोज आढावा घेतला जात असताना महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक मात्र अद्यापही आचारसंहितेच्याच अंमलाखाली आहेत. पाणी विषयावर एकाही पदाधिकारी अथवा नगरसेवकांनी प्रशासनाकडे साधी विचारणाही केली नाही. पाण्यासारख्या अत्यावश्यक बाबीवर महापौरासह इतर पदाधिकाऱ्यांनी बैठक घेणे अपेक्षित होते. १८ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आचारसंहिता कालावधीतही पाण्यासारख्या विषयावर निर्णय घेता येतात. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत आचारसंहितेचा बाऊ करुन पाणीटंचाई निवारणाची कामे अडवू नका, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असतानाही महापालिकेची आचारसंहिता मात्र अद्यापही कायमच आहे.दरम्यान, उत्तर नांदेडला इसापूर प्रकल्पाचे पाणी सांगवी बंधाºयातून पुरविले जात आहे. काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी घेतले जात आहे. तेथून संपूर्ण उत्तर नांदेडसह दक्षिण नांदेडच्या काही भागालाही पाणी दिले जात आहे. इसापूरमधून चौथी पाणीपाळी घेण्यात आली आहे. आणखी एक पाणीपाळी मे मध्ये उपलब्ध होणार आहे.सरपंच, ग्रामसेवकांची बैठकविष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी तीन पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यातील दोन पथके शनिवारी प्रकल्प क्षेत्रात गस्तीवर पोहोचले. या पथकांनी प्रकल्प क्षेत्राच्या दोन्हीही बाजूंनी असलेल्या ९ गावांमध्ये सरपंच, ग्रामसेवक तसेच गावातील प्रमुख व्यक्तींची बैठक घेतली. नांदेड शहराचा पाणीप्रश्न गंभीर झाल्याचे सांगताना जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाबाबतही गावकºयांना अवगत करण्यात आले. प्रकल्पावर बसविलेल्या मोटारी स्वत: शेतकºयांनी काढून घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या मोटारी न काढल्यास त्या जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका