शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दुचाकीचा आरसा हा केवळ केस विंचरण्यापुरताच, आजपर्यंत केवळ १३२ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:15 IST

दुचाकी असो वा कोणतेही वाहन त्यास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूने आरसा बसविण्यात येतो. परंतु, मागून येणारे वाहन पाहण्यापेक्षा या ...

दुचाकी असो वा कोणतेही वाहन त्यास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूने आरसा बसविण्यात येतो. परंतु, मागून येणारे वाहन पाहण्यापेक्षा या आरशाचा उपयोग हा केस विंचरण्यापुरता अथवा आरसा काढून गाडीचा आगळावेगळा लूक करण्याचा प्रयत्न वाहनधारक करत आहेत. परंतु, आरसा न वापरणाऱ्या वाहनधारकांवरील कारवाईदेखील नगण्य आहे. नांदेड जिल्ह्यात जवळपास साडेपाच लाख दुचाकींची संख्या असून त्यातील अडीच लाखांवर दुचाकींचा शहर व परिसरात वावर असतो. यातील बहुतांश गाड्यांना साईडग्लास बसविलेला नसतो. परंतु, त्या वाहनधारकांवर कारवाईदेखील होताना दिसत नाही. यामध्ये महाविद्यालयीन तरूणांच्या गाड्या अधिक प्रमाणात असतात. नांदेड शहरात मागील वर्षभरात जवळपास १३२ दुचाकीस्वारांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. साईडग्लास नसल्याने वाहनधारकांना मोटार वाहन कायद्यानुसार २०० रूपये दंड ठोठावला जातो. त्यानुसार १३२ वाहनधारकांकडून २६ हजार ४०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. ग्लास नसलेल्या दुचाकीचा राबता असतो. एखाद्या गाडीला ओव्हरटेक करताना अथवा वळण रस्त्यावर साईडग्लासचा उपयोग होतो. परंतु, ग्लास नसल्याने अनेकवेळा अपघाताला निमंत्रण दिले जाते. त्यामुळे वाहतूक शाखेने ज्या वाहनांना आरसा नाही, त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

चौकट

नांदेड शहरात २ लाख ५४ हजार दुचाकी

आरसा नसल्याने २०० रूपये दंड

दुचाकी अथवा अन्य वाहनास आरसा बसविणे कायद्याने बंधनकारक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आरसा असणे गरजेचे आहे. परंतु, अनेकजण हौस म्हणून आरसा काढून टाकतात. ज्या वाहनांना आरसा नाही, त्यांच्यावर मोटार वाहन कायदा १६१ नुकसान कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. यामध्ये वाहनधारकांना २०० रूपयांचा दंड होऊ शकतो.

दुचाकीला हे आहे बंधनकारक

दुचाकीसाठी साईडग्लाससह इंडीकेटर, हेडलाईट, ब्रेक लाईट तसेच पीयुसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.अन्यथा मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीस्वारास आरशासह विविध नियमांचे पालन न केल्याने वेगवेगळ्या प्रकारचा दंड बसू शकतो. त्यामुळे दुचाकीस्वारांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

शहरातील दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखेकडून कारवाई मोहीम सुरूच असते. परंतु, मागील काळात मोहीम राबविल्याने ट्रिपल सीट, साईडग्लास नसणे यासह विविध नियमांचे पालन करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच जे दुचाकीस्वार नियमांचे उल्लंघन करतात. त्यांच्यावर नियमितपणे कारवाई करण्याचे काम शहर वाहतूक शाखा करत आहे.

- चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, नांदेड.