शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सात तालुक्यांत लाखोंचा धान्य घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:57 AM

नांदेड: बीड जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात केलेल्या गोदामांच्या तपासणीत धान्य उचल, अभिलेख पडताळणीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे़ किनवट, भोकर, हिमायतनगर, अर्धापूर, उमरी, नायगाव व मुदखेड तालुक्यात लाभार्थ्यांचा आकडा फुगवून दाखविण्यात आला तर कुठे द्वारपोच धान्यालाही फाटा देण्यात आला़ विशेष म्हणजे, याबाबत नांदेड जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी तीन वेळेस अहवाल सादर करण्याचे आदेश देवूनही संबंधित तहसीलदारांनी त्यालाही केराची टोपली दाखविली़

ठळक मुद्देपुरवठा विभाग : बीडच्या पथकाने केला पर्दाफाश;मंजूर व वितरित धान्याचा ताळमेळ बसेना

शिवराज बिचेवार।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: बीड जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात केलेल्या गोदामांच्या तपासणीत धान्य उचल, अभिलेख पडताळणीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे़ किनवट, भोकर, हिमायतनगर, अर्धापूर, उमरी, नायगाव व मुदखेड तालुक्यात लाभार्थ्यांचा आकडा फुगवून दाखविण्यात आला तर कुठे द्वारपोच धान्यालाही फाटा देण्यात आला़ विशेष म्हणजे, याबाबत नांदेड जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी तीन वेळेस अहवाल सादर करण्याचे आदेश देवूनही संबंधित तहसीलदारांनी त्यालाही केराची टोपली दाखविली़बीडच्या या पथकाने १८ एप्रिल २०१७ रोजी नांदेड दौºयावर आले होते़ यावेळी किनवट, इस्लापूर, मांडवी यासह भोकर, हिमायतनगर, अर्धापूर, उमरी, नायगाव व मुदखेड तालुक्यांतील गोदामांची तपासणी केली़ या तपासणीत अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या़ त्यात किनवट तालुक्यात एपीएल (शेतकरी) योजनेच्या अभिलेख पडताळणीत गोदामनिहाय जोडण्यात आलेले धान्य दुकानदार, त्यांना जोडण्यात आलेली कार्डसंख्या, लोकसंख्या व देय धान्य नियतन याप्रमाणे धान्य वितरण आदेश न देता टिप्पणी स्वरुपात मंजुरी देण्यात आली़त्यामुळे प्रत्यक्ष दुकानदारनिहाय, मंजूर धान्य व वितरित धान्य यांचा ताळमेळ बसत नाही़ दुकानदारनिहाय मूळ याद्या व प्रत्यक्ष धान्य वितरण यामधील लोकसंख्येत मोठी तफावत आहे़ भोकरमध्ये महिन्याच्या शेवटच्या चार ते पाच दिवसांतच धान्य वाटप अधिक करण्यात आल्यामुळे परमिट नूतनीकरणाची संख्या वाढली़ कोणत्या दुकानात नेमका किती धान्यपुरवठा करायचा याचेही सोयरसुतक नव्हते़ हिमायतनगर येथे आॅगस्ट २०१६ ते आॅक्टोबर २०१६ या कालावधीत ३० हजार ७३५ लाभार्थ्यांना धान्य कोटा मंजूर असताना तहसीलदारांनी ३२ हजार १४८ लाभार्थ्यांना धान्य वितरित केले़हाच कित्ता डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ मध्ये गिरविण्यात आला़ २०१७ मध्ये ८९़४८ क्विंटल गहू व ५२़६० क्विंटल तांदूळ उपलब्ध असताना ९६४ क्विंटल गहू व ६४३ क्विंटल तांदळाचे जास्तीचे परमिट वितरित करण्यात आले़अर्धापूर तालुक्यात २५ जानेवारी २०१६ रोजी मंजूर करण्यात आलेले धान्य तीन दिवसांतच पूर्ण वाटप केले़ २५ तारखेनंतर धान्य वाटप लेखी परवानगी न घेता तोंडी सूचनेवरुनच करण्यात आले़ गोदामात धान्य उतरवून घेताना ते प्रमाणित केलेच नाही़ उमरी तालुक्यात अभिलेखे प्रमाणित न करणे, आर रजिस्टर न ठेवणे, शेतकरी योजनेचे कार्ड विनास्वाक्षरी असणे असे प्रकार पुढे आले़ नायगाव तालुक्यात कॅशबुक प्रिंटेड न ठेवणे, परमिट बुकची नोंदवही न ठेवणे, गोदामाची अभिलेखे अद्ययावत नसणे तसेच एकाच दिवशी ४७ स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वितरित केल्याचे एच रजिस्टरवरुन आढळून आले़मुदखेड तालुक्यात शेतकरी योजनेच्या लाभार्थी योजनेचे धान्य वर्ग केल्याचे तपासणीत पुढे आले़ सातही तालुक्यांत धान्य वाटपात मोठा गोंधळ झाला आहे, परंतु त्याबाबत अहवाल सादर करण्यास तहसीलदार संबंधित कार्यालयाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे़लोकसंख्येत केली कुठे घट तर कुठे वाढ४जानेवारी २०१६ ते मार्च २०१६ या कालावधीत लोकसंख्या ६५ हजार ६४० एवढी तर एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ती चक्क ४७ हजार ७१२ एवढी दाखविण्यात आली होती़ भोकरमध्ये फेब्रुवारी २०१६ चे तांदळाचे नियतन ६७९ क्विंटल मंजूर झाले होते़ तेवढाच तांदूळ मिळालाही़ तेवढाच प्रत्यक्ष वाटप होणे अपेक्षित असताना इतर योजनेतून २१७़७० क्विंटल तांदूळ वर्ग करुन घेण्यात आला़ विशेष म्हणजे, त्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार करण्यात आला नाही़कोट्यवधींचा गैरव्यवहारप्रकरणाचा पाठपुरावा करणारे आरटीआय कार्यकर्ते मोतीराम काळे म्हणाले, या सातही तालुक्यांत कोट्यवधी रुपयांचा धान्य घोटाळा झाला आहे़ लाभार्थ्यांची संख्या फुगविणे, रजिस्टरवर नोंदी न घेणे, द्वारपोच धान्य न देणे यासारख्या अनेक क्लृप्त्या त्यासाठी लढवल्या आहेत़