शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीत आज येणार दुधनेचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:33 IST

शहराची तहान भागविण्यासाठी १६० किलोमीटरचे अंतर पार करुन लोअर दुधना प्रकल्पातील पाणी विष्णूपुरीत मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचणार आहे. नांदेडसह परभणी जिल्ह्यासाठी लोअर दुधना प्रकल्पातून ८ मे पासून पाणी सोडण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराची तहान भागविण्यासाठी १६० किलोमीटरचे अंतर पार करुन लोअर दुधना प्रकल्पातील पाणी विष्णूपुरीत मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचणार आहे. नांदेडसह परभणी जिल्ह्यासाठी लोअर दुधना प्रकल्पातून ८ मे पासून पाणी सोडण्यात येत आहे.विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ २.१८ दलघमी पाणी शिल्लक आहे. ही टक्केवारी केवळ २.७० टक्के इतकी आहे. लोअर दुधना प्रकल्पातून नांदेडसाठी २५ दलघमी पाणी सोडण्यात येत आहे. परभणी शहरासाठी रहाटी बंधाऱ्यातून तर नांदेड शहरासाठी पूर्णा येथील कोल्हापुरी बंधाºयामार्फत पाणी देण्यात आले आहे. हे पाणी विष्णूपुरी प्रकल्पात पोहोचण्यासाठी मनपा अधिकारी पाण्याच्या मार्गावर नियुक्त करण्यात आले आहेत. हा पाणीउपसा होऊ नये यासाठीही खबरदारी घेण्यात येत आहे.पूर्णा येथून सोडण्यात आलेले पाणी सोमवारी सायंकाळी अंतेश्वर बंधाºयापर्यंत पोहोचले होते.अंतेश्वरपासून भनगी, मोहनपूर, रहाटी या भागात मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाला आहे. परिणामी मोठ-मोठे डोह या भागात तयार झाले आहेत. हे डोह भरण्यासाठी वेळ लागत आहे. त्याचवेळी वाळू वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेले रॅम्पही गोदावरी नदीत ‘जैसे थे’ असल्यामुळे पाणी येण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.हे सर्व अडथळे पार करत मंगळवारी दुपारी १२ पर्यंत विष्णूपुरी प्रकल्पात लोअर दुधनेतून सोडण्यात आलेले पाणी पोहोचेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली. हे पाणी आणण्यासाठी अजय कोहीरकर, कार्यकारी अभियंता एस.के. सब्बीनवार, कार्यकारी अभियंता आर.एन. देशमुख, मनपाचे उपअभियंता नीळकंठ गव्हाणे आदी अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.या पाण्याचे योग्य नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे. प्रशासनाने यापूर्वी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र आगामी मुस्लिम बांधवांचा सुरु होणारा पवित्र रमजान महिना पाहता सध्या सुरु आहे त्याप्रमाणेच पाणीपुरवठा ठेवावा, अशी सूचना केली.दुसरीकडे विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून पाण्यासाठी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात चोरी होते. हजारो पंपांच्या माध्यमातून पाणी उपसा केला जातो.हा उपसा रोखण्याचीही गरज निर्माण झाली आहे. यासाठी महसूलसह पोलीस, मनपा, विद्युत विभाग यांचे संयुक्त पथक स्थापन केल्यास पाणीचोरीस आळा बसू शकेल.पाण्याच्या श्रेयवादासाठी चढाओढविष्णूपुरी प्रकल्पात दाखल होणाºया लोअर दुधना प्रकल्पातील पाण्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांत चढाओढ सुरू आहे. महापौर शीलाताई भवरे यांनी महापालिकेच्या प्रयत्नाने हे पाणी विष्णूपुरीत येत असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे नांदेड दक्षिणचे आ. हेमंत पाटील यांनी आपल्या प्रयत्नातून हे पाणी मिळाल्याचे सांगितले आहे. माजी पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून हे पाणी नांदेडसाठी आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक