शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विष्णूपुरीत आज येणार दुधनेचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:33 IST

शहराची तहान भागविण्यासाठी १६० किलोमीटरचे अंतर पार करुन लोअर दुधना प्रकल्पातील पाणी विष्णूपुरीत मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचणार आहे. नांदेडसह परभणी जिल्ह्यासाठी लोअर दुधना प्रकल्पातून ८ मे पासून पाणी सोडण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराची तहान भागविण्यासाठी १६० किलोमीटरचे अंतर पार करुन लोअर दुधना प्रकल्पातील पाणी विष्णूपुरीत मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पोहोचणार आहे. नांदेडसह परभणी जिल्ह्यासाठी लोअर दुधना प्रकल्पातून ८ मे पासून पाणी सोडण्यात येत आहे.विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ २.१८ दलघमी पाणी शिल्लक आहे. ही टक्केवारी केवळ २.७० टक्के इतकी आहे. लोअर दुधना प्रकल्पातून नांदेडसाठी २५ दलघमी पाणी सोडण्यात येत आहे. परभणी शहरासाठी रहाटी बंधाऱ्यातून तर नांदेड शहरासाठी पूर्णा येथील कोल्हापुरी बंधाºयामार्फत पाणी देण्यात आले आहे. हे पाणी विष्णूपुरी प्रकल्पात पोहोचण्यासाठी मनपा अधिकारी पाण्याच्या मार्गावर नियुक्त करण्यात आले आहेत. हा पाणीउपसा होऊ नये यासाठीही खबरदारी घेण्यात येत आहे.पूर्णा येथून सोडण्यात आलेले पाणी सोमवारी सायंकाळी अंतेश्वर बंधाºयापर्यंत पोहोचले होते.अंतेश्वरपासून भनगी, मोहनपूर, रहाटी या भागात मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाला आहे. परिणामी मोठ-मोठे डोह या भागात तयार झाले आहेत. हे डोह भरण्यासाठी वेळ लागत आहे. त्याचवेळी वाळू वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेले रॅम्पही गोदावरी नदीत ‘जैसे थे’ असल्यामुळे पाणी येण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.हे सर्व अडथळे पार करत मंगळवारी दुपारी १२ पर्यंत विष्णूपुरी प्रकल्पात लोअर दुधनेतून सोडण्यात आलेले पाणी पोहोचेल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली. हे पाणी आणण्यासाठी अजय कोहीरकर, कार्यकारी अभियंता एस.के. सब्बीनवार, कार्यकारी अभियंता आर.एन. देशमुख, मनपाचे उपअभियंता नीळकंठ गव्हाणे आदी अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.या पाण्याचे योग्य नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे. प्रशासनाने यापूर्वी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र आगामी मुस्लिम बांधवांचा सुरु होणारा पवित्र रमजान महिना पाहता सध्या सुरु आहे त्याप्रमाणेच पाणीपुरवठा ठेवावा, अशी सूचना केली.दुसरीकडे विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून पाण्यासाठी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात चोरी होते. हजारो पंपांच्या माध्यमातून पाणी उपसा केला जातो.हा उपसा रोखण्याचीही गरज निर्माण झाली आहे. यासाठी महसूलसह पोलीस, मनपा, विद्युत विभाग यांचे संयुक्त पथक स्थापन केल्यास पाणीचोरीस आळा बसू शकेल.पाण्याच्या श्रेयवादासाठी चढाओढविष्णूपुरी प्रकल्पात दाखल होणाºया लोअर दुधना प्रकल्पातील पाण्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांत चढाओढ सुरू आहे. महापौर शीलाताई भवरे यांनी महापालिकेच्या प्रयत्नाने हे पाणी विष्णूपुरीत येत असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे नांदेड दक्षिणचे आ. हेमंत पाटील यांनी आपल्या प्रयत्नातून हे पाणी मिळाल्याचे सांगितले आहे. माजी पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून हे पाणी नांदेडसाठी आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक