शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

पाण्याअभावी होंडाळा ग्रामस्थांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:56 IST

होंडाळा पाणीपुरवठा करणारे मोठे मुख्य स्त्रोत नसल्यामुळे या गावाला दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ नागरिकांना पिण्यासाठी ५ रुपयाला एक घागर खाजगी बोरचे विकत घ्यावे लागते

दत्तात्रय कांबळे।मुखेड: होंडाळा पाणीपुरवठा करणारे मोठे मुख्य स्त्रोत नसल्यामुळे या गावाला दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ नागरिकांना पिण्यासाठी ५ रुपयाला एक घागर खाजगी बोरचे विकत घ्यावे लागते तर गावाजवळील एका तलावातून अशुद्ध पाणी नळाद्वारे सोडले जाते़ तर २ हजार ५०० नागरिकांची टँकरच्या एकाच फेरीवर तहान भागवली जाते़ यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले असल्याचे विदारक चित्र होंडाळा गावात आहे.मुखेड तालुक्यातील जांब बु. बाजारपेठेजवळ असलेले होंडाळा हे गाव २ हजार ५०० लोकसंख्या असलेले व ४०० पेक्षा जास्त कुटुंबसंख्या असलेले ९ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेले मोठे गाव असून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठा स्त्रोत नसल्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ३० ते ३५ वर्षापूर्वी शासकीय योजनेतून सांगवी बेनक शिवारातील तलावाच्या खाली विहीर खोदून पाणी पुरवठा केला जातो़आजही त्याच ठिकाणाहून ३० ते ३५ वर्षांपासून पाणीपुरवठा गावाला केला जातो़ या सततच्या पाईपलाईन वापरामुळे ही पाईपलाईन कुचकामी झाली असून जागोजागी फुटलेल्या अवस्थेमध्ये दिसून येते़ गावाजवळ कोठेच जलस्त्रोत नाही़ यामुळे एका तलावातून पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये टाकून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा टाकीत घेतले जाते. हेच अशुद्ध पाणी एक दिवस किंवा दोन दिवसाआड सोडले जाते.अशा दूषित पाण्याच्या वापरामुळे गावांमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पाण्यापासून होणारे रोग कावीळ, कॉलरा अशा वेगवेगळ्या आजारांना नागरिकांना बळी पडावे लागत आहे. ग्रामपंचायतच्या मागणीप्रमाणे दोन पाणी टँकरची मागणी केली आणि दोन टँकरची मंजुरी पण मिळाली; पण आजघडीला गावात एका टँकरने एकच फेरी केली जाते.गावची शेती सुद्धा कोरडवाहू जमीन, खरीपाची शेती असून गावांमध्ये कोणताही उद्योग व्यवसाय नाही. या परिस्थितीमुळे होंडाळातील जवळपास २० टक्के लोक गाव सोडून विटकाम, ऊस काम, पुणे, मुंबई, हैदराबाद, अशा शहरात कामासाठी स्थलांतरित झालेले आहेत़ त्यामुळे गाव ओसाड झाले आहे़येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बोरचे पाणी गावांमध्ये पाईपलाईन द्वारे आणले असून त्या नळाचे पाणी ५ रुपयाला १ भांडे पाणी याप्रमाणे विक्री करतो. यांना विचारले असता ते म्हणाले की बोअरचे पाणी गावाला पुरत नाही. म्हणून अधिग्रहण करता येत नाही़ यामुळे मी हा उपक्रम सुरू केला असे म्हणाले.

 

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई