शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

पाण्याअभावी होंडाळा ग्रामस्थांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:56 IST

होंडाळा पाणीपुरवठा करणारे मोठे मुख्य स्त्रोत नसल्यामुळे या गावाला दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ नागरिकांना पिण्यासाठी ५ रुपयाला एक घागर खाजगी बोरचे विकत घ्यावे लागते

दत्तात्रय कांबळे।मुखेड: होंडाळा पाणीपुरवठा करणारे मोठे मुख्य स्त्रोत नसल्यामुळे या गावाला दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ नागरिकांना पिण्यासाठी ५ रुपयाला एक घागर खाजगी बोरचे विकत घ्यावे लागते तर गावाजवळील एका तलावातून अशुद्ध पाणी नळाद्वारे सोडले जाते़ तर २ हजार ५०० नागरिकांची टँकरच्या एकाच फेरीवर तहान भागवली जाते़ यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले असल्याचे विदारक चित्र होंडाळा गावात आहे.मुखेड तालुक्यातील जांब बु. बाजारपेठेजवळ असलेले होंडाळा हे गाव २ हजार ५०० लोकसंख्या असलेले व ४०० पेक्षा जास्त कुटुंबसंख्या असलेले ९ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेले मोठे गाव असून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठा स्त्रोत नसल्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ३० ते ३५ वर्षापूर्वी शासकीय योजनेतून सांगवी बेनक शिवारातील तलावाच्या खाली विहीर खोदून पाणी पुरवठा केला जातो़आजही त्याच ठिकाणाहून ३० ते ३५ वर्षांपासून पाणीपुरवठा गावाला केला जातो़ या सततच्या पाईपलाईन वापरामुळे ही पाईपलाईन कुचकामी झाली असून जागोजागी फुटलेल्या अवस्थेमध्ये दिसून येते़ गावाजवळ कोठेच जलस्त्रोत नाही़ यामुळे एका तलावातून पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये टाकून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा टाकीत घेतले जाते. हेच अशुद्ध पाणी एक दिवस किंवा दोन दिवसाआड सोडले जाते.अशा दूषित पाण्याच्या वापरामुळे गावांमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पाण्यापासून होणारे रोग कावीळ, कॉलरा अशा वेगवेगळ्या आजारांना नागरिकांना बळी पडावे लागत आहे. ग्रामपंचायतच्या मागणीप्रमाणे दोन पाणी टँकरची मागणी केली आणि दोन टँकरची मंजुरी पण मिळाली; पण आजघडीला गावात एका टँकरने एकच फेरी केली जाते.गावची शेती सुद्धा कोरडवाहू जमीन, खरीपाची शेती असून गावांमध्ये कोणताही उद्योग व्यवसाय नाही. या परिस्थितीमुळे होंडाळातील जवळपास २० टक्के लोक गाव सोडून विटकाम, ऊस काम, पुणे, मुंबई, हैदराबाद, अशा शहरात कामासाठी स्थलांतरित झालेले आहेत़ त्यामुळे गाव ओसाड झाले आहे़येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बोरचे पाणी गावांमध्ये पाईपलाईन द्वारे आणले असून त्या नळाचे पाणी ५ रुपयाला १ भांडे पाणी याप्रमाणे विक्री करतो. यांना विचारले असता ते म्हणाले की बोअरचे पाणी गावाला पुरत नाही. म्हणून अधिग्रहण करता येत नाही़ यामुळे मी हा उपक्रम सुरू केला असे म्हणाले.

 

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई