शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

संभाव्य टंचाई आराखडा करण्यासाठी आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:06 AM

शासनाची उदासीनता आहे की प्रशासनाची ? याबाबतचे गूढ कायम आहे़ गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला होता़ टंचाईचे चित्र सर्वत्र निर्माण झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविला़ त्याला मंजुरीही मिळाली़

किनवट : किनवट तालुका संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यासाठी व टंचाई गावे निश्चित करण्यासाठी १५ नोव्हेेंबर रोजी टंचाई पूर्वबैठक बोलावण्यात आली आहे़ मात्र गतवर्षीचे टंचाई काळात राबवलेल्या मंजूर आराखड्ड्यातील झालेल्या कामांचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत़ त्यामुळे शासनाची उदासीनता आहे की प्रशासनाची ? याबाबतचे गूढ कायम आहे़गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला होता़ टंचाईचे चित्र सर्वत्र निर्माण झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविला़ त्याला मंजुरीही मिळाली़ संबंधित विभागाने टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना राबविल्या़ १९१ गावे, १०५ वाडीतांडे असलेल्या किनवट तालुक्यात गतवर्षी ९५ गावांत १०२ विहिरी अधिग्रहणाचे काम करण्यात आले़ त्यातून केवळ सात लक्ष रुपयांची बोळवण करण्यात आली़ अद्यापही ३४ लक्ष रुपये येणे शिल्लक असल्याची माहिती आहे़याशिवाय जि़ प़ च्या पाणी पुरवठा विभागाने गतवर्षी टंचाई काळात मंजूर आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावांत नळयोजनेची विशेष दुरुस्ती, पूरक नळयोजना ही कामे केली़ झालेल्या कामांचे पैसे अद्यापही संबंधितांना मिळाले नसल्याने यंदा काम करायला ही यंत्रणा पुढे येईल का ? याबाबत साशंकताच आहे़दरवर्षी टंचाईपूर्व बैठका घेतल्या जातात़ जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून हा टंचाई कृती आराखडा तयार केला जातो़ त्याला मंजुरीही मिळते़ मात्र उपाययोजना राबवूनही केलेल्या कामाचा मावेजा वेळेवर मिळत नाही़ आराखडा मंजूर असतानाही कामे मात्र पावसाळ्याच्या तोंडावर केली जातात़ टंचाईग्रस्त गावकऱ्यांना मात्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात़ मंजूर आराखड्यातील कामे पूर्ण होऊनही मंजूर निधी देण्यात शासनाची उदासीनता की प्रशासनाची, हे कळायला मार्ग नाही़ यावर्षीही पावसाळ्यात धरसोड पद्धतीने पाऊस झाल्याने विशेषत: इस्लापूर शिवणी व जलधारा या तीन मंडळात पन्नास टक्क्यांच्या आतच पाऊस पडला़ त्यामुळे या भागात टंचाई उग्र रूप धारण करेल, असे सध्याचे चित्र आहे़ तालुक्याच्या अन्य मंडळातही पाणीटंचाईचे चटके बसणार आहेत़३४ लाख रूपये बाकी

  • १९१ गावे, १०५ वाडीतांडे असलेल्या किनवट तालुक्यात गतवर्षी ९५ गावांत १०२ विहिरी अधिग्रहणाचे काम करण्यात आले़ त्यापैकी केवळ सात लक्ष रुपयांची बोळवण करण्यात आली़ अद्यापही ३४ लक्ष रुपये येणे बाकीच आहेत़ त्यामुळे गुरूवारी होणाºया बैठकीकडे लक्ष लागले आहे़
  • ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ संभाव्य टंचाईची गावे निश्चित करण्यासाठी आ़ प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आराखडा बैठक १५ रोजी पं़ स़ च्या सभागृहात होणार आहे़ मात्र उदासीन धोरण राबवणा-या शासनाच्या काळात मंजूर आराखड्यातील कामांना पुन्हा वर्षभर निधीची प्रतीक्षा करावी लागेल का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे़ बैठकीचे फलित संभाव्य टंचाई निर्माण झालेल्या गावांना कितपत मिळणार याकडे लक्ष लागले आहे़
टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक