शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

संभाव्य टंचाई आराखडा करण्यासाठी आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:07 IST

शासनाची उदासीनता आहे की प्रशासनाची ? याबाबतचे गूढ कायम आहे़ गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला होता़ टंचाईचे चित्र सर्वत्र निर्माण झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविला़ त्याला मंजुरीही मिळाली़

किनवट : किनवट तालुका संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यासाठी व टंचाई गावे निश्चित करण्यासाठी १५ नोव्हेेंबर रोजी टंचाई पूर्वबैठक बोलावण्यात आली आहे़ मात्र गतवर्षीचे टंचाई काळात राबवलेल्या मंजूर आराखड्ड्यातील झालेल्या कामांचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत़ त्यामुळे शासनाची उदासीनता आहे की प्रशासनाची ? याबाबतचे गूढ कायम आहे़गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला होता़ टंचाईचे चित्र सर्वत्र निर्माण झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविला़ त्याला मंजुरीही मिळाली़ संबंधित विभागाने टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना राबविल्या़ १९१ गावे, १०५ वाडीतांडे असलेल्या किनवट तालुक्यात गतवर्षी ९५ गावांत १०२ विहिरी अधिग्रहणाचे काम करण्यात आले़ त्यातून केवळ सात लक्ष रुपयांची बोळवण करण्यात आली़ अद्यापही ३४ लक्ष रुपये येणे शिल्लक असल्याची माहिती आहे़याशिवाय जि़ प़ च्या पाणी पुरवठा विभागाने गतवर्षी टंचाई काळात मंजूर आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावांत नळयोजनेची विशेष दुरुस्ती, पूरक नळयोजना ही कामे केली़ झालेल्या कामांचे पैसे अद्यापही संबंधितांना मिळाले नसल्याने यंदा काम करायला ही यंत्रणा पुढे येईल का ? याबाबत साशंकताच आहे़दरवर्षी टंचाईपूर्व बैठका घेतल्या जातात़ जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून हा टंचाई कृती आराखडा तयार केला जातो़ त्याला मंजुरीही मिळते़ मात्र उपाययोजना राबवूनही केलेल्या कामाचा मावेजा वेळेवर मिळत नाही़ आराखडा मंजूर असतानाही कामे मात्र पावसाळ्याच्या तोंडावर केली जातात़ टंचाईग्रस्त गावकऱ्यांना मात्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात़ मंजूर आराखड्यातील कामे पूर्ण होऊनही मंजूर निधी देण्यात शासनाची उदासीनता की प्रशासनाची, हे कळायला मार्ग नाही़ यावर्षीही पावसाळ्यात धरसोड पद्धतीने पाऊस झाल्याने विशेषत: इस्लापूर शिवणी व जलधारा या तीन मंडळात पन्नास टक्क्यांच्या आतच पाऊस पडला़ त्यामुळे या भागात टंचाई उग्र रूप धारण करेल, असे सध्याचे चित्र आहे़ तालुक्याच्या अन्य मंडळातही पाणीटंचाईचे चटके बसणार आहेत़३४ लाख रूपये बाकी

  • १९१ गावे, १०५ वाडीतांडे असलेल्या किनवट तालुक्यात गतवर्षी ९५ गावांत १०२ विहिरी अधिग्रहणाचे काम करण्यात आले़ त्यापैकी केवळ सात लक्ष रुपयांची बोळवण करण्यात आली़ अद्यापही ३४ लक्ष रुपये येणे बाकीच आहेत़ त्यामुळे गुरूवारी होणाºया बैठकीकडे लक्ष लागले आहे़
  • ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ संभाव्य टंचाईची गावे निश्चित करण्यासाठी आ़ प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आराखडा बैठक १५ रोजी पं़ स़ च्या सभागृहात होणार आहे़ मात्र उदासीन धोरण राबवणा-या शासनाच्या काळात मंजूर आराखड्यातील कामांना पुन्हा वर्षभर निधीची प्रतीक्षा करावी लागेल का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे़ बैठकीचे फलित संभाव्य टंचाई निर्माण झालेल्या गावांना कितपत मिळणार याकडे लक्ष लागले आहे़
टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक