शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

संभाव्य टंचाई आराखडा करण्यासाठी आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:07 IST

शासनाची उदासीनता आहे की प्रशासनाची ? याबाबतचे गूढ कायम आहे़ गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला होता़ टंचाईचे चित्र सर्वत्र निर्माण झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविला़ त्याला मंजुरीही मिळाली़

किनवट : किनवट तालुका संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यासाठी व टंचाई गावे निश्चित करण्यासाठी १५ नोव्हेेंबर रोजी टंचाई पूर्वबैठक बोलावण्यात आली आहे़ मात्र गतवर्षीचे टंचाई काळात राबवलेल्या मंजूर आराखड्ड्यातील झालेल्या कामांचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत़ त्यामुळे शासनाची उदासीनता आहे की प्रशासनाची ? याबाबतचे गूढ कायम आहे़गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला होता़ टंचाईचे चित्र सर्वत्र निर्माण झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविला़ त्याला मंजुरीही मिळाली़ संबंधित विभागाने टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना राबविल्या़ १९१ गावे, १०५ वाडीतांडे असलेल्या किनवट तालुक्यात गतवर्षी ९५ गावांत १०२ विहिरी अधिग्रहणाचे काम करण्यात आले़ त्यातून केवळ सात लक्ष रुपयांची बोळवण करण्यात आली़ अद्यापही ३४ लक्ष रुपये येणे शिल्लक असल्याची माहिती आहे़याशिवाय जि़ प़ च्या पाणी पुरवठा विभागाने गतवर्षी टंचाई काळात मंजूर आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावांत नळयोजनेची विशेष दुरुस्ती, पूरक नळयोजना ही कामे केली़ झालेल्या कामांचे पैसे अद्यापही संबंधितांना मिळाले नसल्याने यंदा काम करायला ही यंत्रणा पुढे येईल का ? याबाबत साशंकताच आहे़दरवर्षी टंचाईपूर्व बैठका घेतल्या जातात़ जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून हा टंचाई कृती आराखडा तयार केला जातो़ त्याला मंजुरीही मिळते़ मात्र उपाययोजना राबवूनही केलेल्या कामाचा मावेजा वेळेवर मिळत नाही़ आराखडा मंजूर असतानाही कामे मात्र पावसाळ्याच्या तोंडावर केली जातात़ टंचाईग्रस्त गावकऱ्यांना मात्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात़ मंजूर आराखड्यातील कामे पूर्ण होऊनही मंजूर निधी देण्यात शासनाची उदासीनता की प्रशासनाची, हे कळायला मार्ग नाही़ यावर्षीही पावसाळ्यात धरसोड पद्धतीने पाऊस झाल्याने विशेषत: इस्लापूर शिवणी व जलधारा या तीन मंडळात पन्नास टक्क्यांच्या आतच पाऊस पडला़ त्यामुळे या भागात टंचाई उग्र रूप धारण करेल, असे सध्याचे चित्र आहे़ तालुक्याच्या अन्य मंडळातही पाणीटंचाईचे चटके बसणार आहेत़३४ लाख रूपये बाकी

  • १९१ गावे, १०५ वाडीतांडे असलेल्या किनवट तालुक्यात गतवर्षी ९५ गावांत १०२ विहिरी अधिग्रहणाचे काम करण्यात आले़ त्यापैकी केवळ सात लक्ष रुपयांची बोळवण करण्यात आली़ अद्यापही ३४ लक्ष रुपये येणे बाकीच आहेत़ त्यामुळे गुरूवारी होणाºया बैठकीकडे लक्ष लागले आहे़
  • ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ संभाव्य टंचाईची गावे निश्चित करण्यासाठी आ़ प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आराखडा बैठक १५ रोजी पं़ स़ च्या सभागृहात होणार आहे़ मात्र उदासीन धोरण राबवणा-या शासनाच्या काळात मंजूर आराखड्यातील कामांना पुन्हा वर्षभर निधीची प्रतीक्षा करावी लागेल का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे़ बैठकीचे फलित संभाव्य टंचाई निर्माण झालेल्या गावांना कितपत मिळणार याकडे लक्ष लागले आहे़
टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक