शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
2
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
3
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
4
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
5
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
6
ट्रम्प ज्युनियर यांचा भारतात शाही मुक्काम! एका रात्रीच्या भाड्यात येईल SUV कार; ताजमहलचा दिसतो व्ह्यू
7
Gold Price Today: ₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट
8
Railway: रेल्वेगाड्यांत 'या' रुग्णांना मिळते 'इतकी' सवलत!
9
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”
10
स्मृती-पलाश होणार विवाहबद्ध; PM मोदींचे दोघांसाठी खास पत्र, म्हणाले- "तुमची पार्टनरशिप..."
11
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
12
Mumbai: एक्स्प्रेस वेवरील पुलांच्या डागडुजीसाठी १३६ कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर महापालिका सरसावली
13
Cryptocurrency Crash: क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
14
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
15
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
16
‘गोल्डन गर्ल’चं नवं टार्गेट सेट, बिहारच्या राजकारणातील तरुण चेहऱ्याने वेधलं लक्ष, कोण आहे ती?
17
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
18
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
19
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
20
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाणीवाटपाबाबत आज मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 01:37 IST

विष्णूपुरी प्रकल्प तसेच डिग्रस बंधारा पाणीवाटपाचे नियोजन यापूर्वी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांसोबत बैठका घेऊन केले जात होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी प्रकल्प तसेच डिग्रस बंधारा पाणीवाटपाचे नियोजन यापूर्वी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांसोबत बैठका घेऊन केले जात होते. मागील वर्षीपासून या बैठका मुंबई येथे मंत्रालयात घेतल्या जात असल्याने योग्य नियोजनाअभावी पुरेशा पाणीपाळ्या मिळत नसल्याचे सांगत शेतक-यांनी पूर्वीप्रमाणे स्थानिक पातळीवरच नियोजन करण्याची मागणी केली असून पाच पाळ्या पाणी द्या अन्यथा जल सत्याग्रह करु, असा इशारा दिला आहे.विष्णूपुरी प्रकल्प व डिग्रस बंधारा यंदा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. त्यामुळे कालव्यांना पाच पाळ्यात पाणी देण्याची शेतकºयांची मागणी आहे. पाण्याच्या पाच पाळ्या दिल्यास रबीचा तसेच पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटू शकतो. मात्र यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नियोजनासाठीच्या बैठका यापूर्वी नांदेड येथेच असर्जन, मारतळा अथवा जानापुरी कॅम्प येथे शेतक-यांच्या उपस्थितीत घेतल्या जात होत्या.मात्र मागील वर्षीपासून या बैठका मुंबई येथे मंत्रालयात घेतल्या जात आहेत. मुंबई येथे होणा-या बैठकामुळे शेतक-यांचा कसलाही विचार घेतला जात नाही. पर्यायाने पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने ऐन टंचाईकाळात पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळेच या बैठका पुन्हा स्थानिक स्तरावर घेण्याची मागणी होत आहे.लोहा, कंधार तालुक्यातील दुष्काळी लाभ क्षेत्रात विष्णूपुरी प्रकल्पाच्या पहिल्या पाणी पाळीला अंदाजे ७ दलघमी पाणी लागते व नंतरच्या ४ पाळ्यांना २० दलघमी पाण्याची आवश्यकता असते. म्हणजेच २७ दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. विष्णूपुरीत सध्या ८४ दलघमी पाणी उपलब्ध असून, डिग्रस बंधाºयातील नांदेड शहरासाठी राखीव असलेले ३० दलघमी पाणी असे एकूण ११४ दलघमी पाणी आहे.विष्णूपुरी प्रकल्पाच्या कालव्यांना २७ दलघमी आणि डेरला लिफ्टसाठी १० दलघमी अशा ३७ दलघमी पाण्यामध्ये दोन्ही प्रकल्पाच्या ५ पाणी पाळ्या होतात. शिवाय नांदेडसाठी ७७ दलघमी पाणी उपलब्ध राहते. प्रशासनाने वरीलप्रमाणे पाण्याचे नियोजन केल्यास दुष्काळी गावांना टंचाईची झळ बसणार नाही. या बरोबरच टँकरचा लाखोंचाही खर्च वाचेल. त्यामुळे पाच पाच पाणी पाळ्या देता येईल अशा पद्धतीने नियोजन करण्याची मागणी प्राध्यापक शिवाजी मोरे सोनखेडकर यांच्यासह शेतकºयांनी केली आहे.शेतकºयांशी चर्चा करुन निर्णय घ्याविष्णूपुरी प्रकल्प व डेरला लिफ्टच्या कालव्यांना पाणी देण्यासाठीचे नियोजन यापूर्वीच स्थानिक पातळीवर बैठका घेऊन केले जात होते. मात्र मागील वर्षीपासून ज्या शेतक-यांसाठी पाण्याचे नियोजन केले जाते त्या शेतकºयांनाच या बैठकांपासून दूर ठेवण्यात येत आहे. मुंबईत बसून नियोजन केले जात असल्याने शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे सरकारने पाणी नियोजनासाठीच्या बैठका पूर्ववत स्थानिकस्तरावर घ्याव्यात. तसेच पाच पाणीपाळ्यात पाणी नियोजन न केल्यास जलसत्याग्रह करु, असा इशारा शेतकºयांच्या वतीने प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी दिला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणी