शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

पाणीवाटपाबाबत आज मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 01:37 IST

विष्णूपुरी प्रकल्प तसेच डिग्रस बंधारा पाणीवाटपाचे नियोजन यापूर्वी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांसोबत बैठका घेऊन केले जात होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी प्रकल्प तसेच डिग्रस बंधारा पाणीवाटपाचे नियोजन यापूर्वी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांसोबत बैठका घेऊन केले जात होते. मागील वर्षीपासून या बैठका मुंबई येथे मंत्रालयात घेतल्या जात असल्याने योग्य नियोजनाअभावी पुरेशा पाणीपाळ्या मिळत नसल्याचे सांगत शेतक-यांनी पूर्वीप्रमाणे स्थानिक पातळीवरच नियोजन करण्याची मागणी केली असून पाच पाळ्या पाणी द्या अन्यथा जल सत्याग्रह करु, असा इशारा दिला आहे.विष्णूपुरी प्रकल्प व डिग्रस बंधारा यंदा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. त्यामुळे कालव्यांना पाच पाळ्यात पाणी देण्याची शेतकºयांची मागणी आहे. पाण्याच्या पाच पाळ्या दिल्यास रबीचा तसेच पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटू शकतो. मात्र यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नियोजनासाठीच्या बैठका यापूर्वी नांदेड येथेच असर्जन, मारतळा अथवा जानापुरी कॅम्प येथे शेतक-यांच्या उपस्थितीत घेतल्या जात होत्या.मात्र मागील वर्षीपासून या बैठका मुंबई येथे मंत्रालयात घेतल्या जात आहेत. मुंबई येथे होणा-या बैठकामुळे शेतक-यांचा कसलाही विचार घेतला जात नाही. पर्यायाने पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने ऐन टंचाईकाळात पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळेच या बैठका पुन्हा स्थानिक स्तरावर घेण्याची मागणी होत आहे.लोहा, कंधार तालुक्यातील दुष्काळी लाभ क्षेत्रात विष्णूपुरी प्रकल्पाच्या पहिल्या पाणी पाळीला अंदाजे ७ दलघमी पाणी लागते व नंतरच्या ४ पाळ्यांना २० दलघमी पाण्याची आवश्यकता असते. म्हणजेच २७ दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. विष्णूपुरीत सध्या ८४ दलघमी पाणी उपलब्ध असून, डिग्रस बंधाºयातील नांदेड शहरासाठी राखीव असलेले ३० दलघमी पाणी असे एकूण ११४ दलघमी पाणी आहे.विष्णूपुरी प्रकल्पाच्या कालव्यांना २७ दलघमी आणि डेरला लिफ्टसाठी १० दलघमी अशा ३७ दलघमी पाण्यामध्ये दोन्ही प्रकल्पाच्या ५ पाणी पाळ्या होतात. शिवाय नांदेडसाठी ७७ दलघमी पाणी उपलब्ध राहते. प्रशासनाने वरीलप्रमाणे पाण्याचे नियोजन केल्यास दुष्काळी गावांना टंचाईची झळ बसणार नाही. या बरोबरच टँकरचा लाखोंचाही खर्च वाचेल. त्यामुळे पाच पाच पाणी पाळ्या देता येईल अशा पद्धतीने नियोजन करण्याची मागणी प्राध्यापक शिवाजी मोरे सोनखेडकर यांच्यासह शेतकºयांनी केली आहे.शेतकºयांशी चर्चा करुन निर्णय घ्याविष्णूपुरी प्रकल्प व डेरला लिफ्टच्या कालव्यांना पाणी देण्यासाठीचे नियोजन यापूर्वीच स्थानिक पातळीवर बैठका घेऊन केले जात होते. मात्र मागील वर्षीपासून ज्या शेतक-यांसाठी पाण्याचे नियोजन केले जाते त्या शेतकºयांनाच या बैठकांपासून दूर ठेवण्यात येत आहे. मुंबईत बसून नियोजन केले जात असल्याने शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे सरकारने पाणी नियोजनासाठीच्या बैठका पूर्ववत स्थानिकस्तरावर घ्याव्यात. तसेच पाच पाणीपाळ्यात पाणी नियोजन न केल्यास जलसत्याग्रह करु, असा इशारा शेतकºयांच्या वतीने प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी दिला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणी