शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

मुंबईतील 'मातोश्री' पेक्षा दिल्लीतील 'मातोश्री' अधिक शक्तिशाली झाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 17:20 IST

आजची शिवसेना ही क्षीण झाली आहे

ठळक मुद्देशिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी भाजपा आजही तयार सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे व्हेंटीलेटरवर

नांदेड : शिवेसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही देश हिताची होती. आजची शिवसेना ही क्षीण झाली असून मुंबई येथील 'मातोश्री'पेक्षा दिल्लीतील 'मातोश्री' अधिक शक्तिशाली झाल्याचा टोमना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मारला.

नांदेड येथे बुधवारी एका खाजगी कार्यक्रमासाठी आल्यानंतर मुनगंटीवार हे पत्रकारांशी बोलत होते. सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे व्हेंटीलेटरवर आहे. त्यामुळे ते फार काळ टिकणार नाही. २५ आॅक्टोबर १९५१ पासूनचा इतिहास पाहिला असता. देशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुकीतील भिन्न विचारसरणीची कोणतीही सत्ता सलग पाच वर्ष टिकली नसल्याचा हवाला देत सध्याचे सरकार किती दिवस टिकेल हे कोणालाही सांगता येत नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी नुकतेच जे विधान केले ते मात्र अगदी खरे आहे. हे सरकार मुस्लिम समाजाच्या आग्रही मागणीमुळे भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेशी युती करुन स्थापन झाले आहे. या सरकारला शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाबाबत काहीही देणे घेणे नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास आजही सत्ता स्थापन करू शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे ‘सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भुला नही कहते’. असे सांगत शिवसेनेने आजही प्रस्ताव दिला तर सरकार स्थापनेसाठी आम्ही तयार असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी केले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNandedनांदेड