शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

रस्ता करा अन्यथा आत्मदहन ; किनवट तालुक्यातील घोगरवाडीकरांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 20:03 IST

स्वातंत्र्याची ७१ वर्षे उलटली तरीही शक्तनगर (घोगरवाडी) ची वस्ती रस्त्याअभावी मुख्य प्रवाहाला जोडली नसल्याने नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.

ठळक मुद्देकिनवटपासून १२ कि.मी. अंतरावर अतिदुर्गम डोंगरमाथ्यावर निजामकालीन शक्तीनगर (घोगरवाडी) वस्ती आहे़ ही वस्ती स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही रस्त्याअभावी मुख्य प्रवाहात आली नाही़ रस्ताच नसल्याने या वस्तीत कोणतेच वाहन जात नाही़

- गोकुळ भवरे

किनवट (नांदेड ) : स्वातंत्र्याची ७१ वर्षे उलटली तरीही शक्तनगर (घोगरवाडी) ची वस्ती रस्त्याअभावी मुख्य प्रवाहाला जोडली नसल्याने नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. रस्ता मंजूर करुन काम सुरु करा, अन्यथा महाराष्ट्रदिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा ६५ जणांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

किनवटपासून १२ कि.मी. अंतरावर अतिदुर्गम डोंगरमाथ्यावर निजामकालीन शक्तीनगर (घोगरवाडी) वस्ती आहे़ येथे आदिम कोलाम जमातीसह आदिवासीत मोडणारी गोंड जातीची वस्ती आहे़ या गावाची नोंद निजाम शासनदरबारी असूनही ही वस्ती स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही रस्त्याअभावी मुख्य प्रवाहात आली नाही़ रस्ताच नसल्याने या वस्तीत कोणतेच वाहन जात नाही़ तालुक्याच्या ठिकाणी यायचे झाल्यास येथील जनतेला पायपीट करून व प्रसंगी बैलगाडीने ये-जा करावी लागते़  

शक्तीनगर येथील इंदू धुर्वे या महिलेला २६ जुलै २०१७ रोजी रात्री प्रसववेदना सुरू झाल्या़ कोणतेच वाहन नसल्याने २७ जुलै रोजी दोन कि़मी़ अंतर बैलगाडीने प्रवास करून त्यानंतर सकाळी ७ वाजता रुग्णवाहिकेत टाकून तिला उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे नेण्यात आले़ तशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने २८ जुलै २०१७ च्या अंकात ‘रस्ताच नसल्याने गर्भवतीचा २ कि़मी़ बैलगाडीने प्रवास’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़वन अधिनियम हा १९२७ चा आहे़ मात्र आदिवासी गावे त्या अगोदर शंभर वर्षे पूर्वीची आहेत़ मग वन जमिनीवर अतिक्रमण कसे? वनविभागाचा हस्तक्षेप का? असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी विचारला. वनविभागाचे केवळ भूत दाखवून रस्त्यापासून कोसोदूर ठेवण्याचा हा सरकारी यंत्रणेचा कुटिल डाव असल्याचा आरोपही होत  आहे़ म्हणून जगण्यापेक्षा आम्हाला मरणच सोपे वाटते, अशी व्यथित प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते दत्ता आडे व नीळकंठ कातले यांनी दिली़ 

रस्त्यासाठी तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांचे प्रयत्नहा रस्ता व्हावा म्हणून तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ़अभिजित चौधरी, डॉ़राजेंद्र भारूड यांनी आदिम जाती सुधार योजनेअंतर्गत अंदाजपत्रकही प्रकल्प अधिकारी या नात्याने पाठविले होते़ पुढे ते लालफितीतच अडकले.  वनजमिनीतून रस्ता जात असल्याने या रस्त्यांना वनविभाग अडसर ठरत आहे़ आजही भीमपूर, पितांबरवाडी, अंबाडीतांडा, वरगुडा, वडोली-वसवाडी, प्रेमनगर, पाटोदा-पोतरेड्डी, रामपूर, जलधरा, मांजरी माथा, वागदरी, जवरला ते पळशीडाग, जवरला ते किनवट-पिंपरशेंडा आदी रस्ते रखडले आहेत. रस्त्याची मागणी घेवून घोगरवाडीच्या सरपंच अनुसया पेंदोर, संगीता उईके, दत्ता वेट्टी, भीमराव शेडमाके, भीमराव सलाम, सूर्यभान आत्राम व इतर ५९ जणांनी रस्ता न झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.