शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

रस्ता करा अन्यथा आत्मदहन ; किनवट तालुक्यातील घोगरवाडीकरांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 20:03 IST

स्वातंत्र्याची ७१ वर्षे उलटली तरीही शक्तनगर (घोगरवाडी) ची वस्ती रस्त्याअभावी मुख्य प्रवाहाला जोडली नसल्याने नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.

ठळक मुद्देकिनवटपासून १२ कि.मी. अंतरावर अतिदुर्गम डोंगरमाथ्यावर निजामकालीन शक्तीनगर (घोगरवाडी) वस्ती आहे़ ही वस्ती स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही रस्त्याअभावी मुख्य प्रवाहात आली नाही़ रस्ताच नसल्याने या वस्तीत कोणतेच वाहन जात नाही़

- गोकुळ भवरे

किनवट (नांदेड ) : स्वातंत्र्याची ७१ वर्षे उलटली तरीही शक्तनगर (घोगरवाडी) ची वस्ती रस्त्याअभावी मुख्य प्रवाहाला जोडली नसल्याने नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. रस्ता मंजूर करुन काम सुरु करा, अन्यथा महाराष्ट्रदिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा ६५ जणांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

किनवटपासून १२ कि.मी. अंतरावर अतिदुर्गम डोंगरमाथ्यावर निजामकालीन शक्तीनगर (घोगरवाडी) वस्ती आहे़ येथे आदिम कोलाम जमातीसह आदिवासीत मोडणारी गोंड जातीची वस्ती आहे़ या गावाची नोंद निजाम शासनदरबारी असूनही ही वस्ती स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही रस्त्याअभावी मुख्य प्रवाहात आली नाही़ रस्ताच नसल्याने या वस्तीत कोणतेच वाहन जात नाही़ तालुक्याच्या ठिकाणी यायचे झाल्यास येथील जनतेला पायपीट करून व प्रसंगी बैलगाडीने ये-जा करावी लागते़  

शक्तीनगर येथील इंदू धुर्वे या महिलेला २६ जुलै २०१७ रोजी रात्री प्रसववेदना सुरू झाल्या़ कोणतेच वाहन नसल्याने २७ जुलै रोजी दोन कि़मी़ अंतर बैलगाडीने प्रवास करून त्यानंतर सकाळी ७ वाजता रुग्णवाहिकेत टाकून तिला उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे नेण्यात आले़ तशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने २८ जुलै २०१७ च्या अंकात ‘रस्ताच नसल्याने गर्भवतीचा २ कि़मी़ बैलगाडीने प्रवास’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़वन अधिनियम हा १९२७ चा आहे़ मात्र आदिवासी गावे त्या अगोदर शंभर वर्षे पूर्वीची आहेत़ मग वन जमिनीवर अतिक्रमण कसे? वनविभागाचा हस्तक्षेप का? असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी विचारला. वनविभागाचे केवळ भूत दाखवून रस्त्यापासून कोसोदूर ठेवण्याचा हा सरकारी यंत्रणेचा कुटिल डाव असल्याचा आरोपही होत  आहे़ म्हणून जगण्यापेक्षा आम्हाला मरणच सोपे वाटते, अशी व्यथित प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते दत्ता आडे व नीळकंठ कातले यांनी दिली़ 

रस्त्यासाठी तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांचे प्रयत्नहा रस्ता व्हावा म्हणून तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ़अभिजित चौधरी, डॉ़राजेंद्र भारूड यांनी आदिम जाती सुधार योजनेअंतर्गत अंदाजपत्रकही प्रकल्प अधिकारी या नात्याने पाठविले होते़ पुढे ते लालफितीतच अडकले.  वनजमिनीतून रस्ता जात असल्याने या रस्त्यांना वनविभाग अडसर ठरत आहे़ आजही भीमपूर, पितांबरवाडी, अंबाडीतांडा, वरगुडा, वडोली-वसवाडी, प्रेमनगर, पाटोदा-पोतरेड्डी, रामपूर, जलधरा, मांजरी माथा, वागदरी, जवरला ते पळशीडाग, जवरला ते किनवट-पिंपरशेंडा आदी रस्ते रखडले आहेत. रस्त्याची मागणी घेवून घोगरवाडीच्या सरपंच अनुसया पेंदोर, संगीता उईके, दत्ता वेट्टी, भीमराव शेडमाके, भीमराव सलाम, सूर्यभान आत्राम व इतर ५९ जणांनी रस्ता न झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.