शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणची हयगय शहराला भोवणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:51 IST

विष्णूपुरी प्रकल्पातून होत असलेला अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी प्रकल्पाच्या दोन्ही तीरावरील विद्युत रोहित्र तात्काळ काढून घेण्याच्या मनपाच्या पत्राकडे महावितरणनने कानाडोळा केला असून महावितरणची ही हयगय शहरवासियांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. प्रकल्पातून असाच पाणीउपसा सुरु राहिल्यास शहरावर एप्रिलमध्येच जलसंकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देएप्रिलमध्येच नांदेडवर जलसंकटाची भीती, भरारी पथकांचीही कामगिरी शून्यच

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातून होत असलेला अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी प्रकल्पाच्या दोन्ही तीरावरील विद्युत रोहित्र तात्काळ काढून घेण्याच्या मनपाच्या पत्राकडे महावितरणनने कानाडोळा केला असून महावितरणची ही हयगय शहरवासियांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. प्रकल्पातून असाच पाणीउपसा सुरु राहिल्यास शहरावर एप्रिलमध्येच जलसंकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला ३७ दलघमी पाणी उपलब्ध आहे. शहराला प्रतिमहिना ३ दलघमी पाणी ुलागत असले तरी विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला प्रतिमाह १२ दलघमी पाणीउपसा सुरु आहे. याच वेगाने पाणीउपसा सुरु राहिल्यास आगामी काळात शहराला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पाच्या दोन्ही तिरांवरुन सुरु असलेला अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भरारी पथकांची स्थापना केली आहे. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता प्रकल्पातील पाणीसाठा सुरक्षित करण्याची नितांत गरज आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी विष्णूपुरी प्रकल्पातून अनधिकृत बागायतदारांकडून उचलला जाणारा पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र आजघडीला या पथकांची कामगिरी अशीतशीच आहे.या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना १४ जानेवारी २०१९ रोजी एक पत्र लिहून अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर महाराष्ट्र पाटबंधारे विभाग अधिनियम १९७६ नुसार पंपसेट जप्त करणे, वीज तोडणे व फौजदारी स्वरुपाची तरतूद आहे. सदर तरतुदीअन्वये पाटबंधारे अधिनियम १९७६ च्या भाग क्र. १० (९७) (१) व (२) नुसार निश्चित केली आहे. जलाशय अथवा नदीतून अवैध पाणीउपसा होत असल्यास पोलीस विभागाच्या मदतीने पंपसेट जप्त करता येतील. तसेच निर्देशित कालावधीकरिता वीजपुरवठा खंडित करता येऊ शकतो.या अधिनियमानुसार महावितरणने कारवाई करावी, असे महापालिकेने कळविले होते. मात्र १५ दिवसानंतरही महावितरणने कोणतीही कारवाई केली नाही हे विशेष! म्हणजे याच विषयात आयुक्त माळी यांनी महावितरणच्या अधिकाºयांची १७ जानेवारी रोजी बैठकही घेतली होेती. या बैठकीत पाणीप्रश्नाचे गांभीर्य संबंधितांना कळविण्यात आले होते. १५ दिवसानंतरही कारवाई न झाल्याने महावितरणने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. याचा फटका आगामी काळात शहरवासियांना बसणार आहे. प्रकल्पात आजघडीला ३७ दलघमी पाणीसाठा असला तरीही प्रतिमाह १२ दलघमी पाणीउपसा सुरु आहे. या पाणी उपशावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी महावितरणने रोहित्र काढून घेण्याची कार्यवाही करावी, असे खुद्द जिल्हाधिकाºयांनीही सूचित केले होते. तसेच पाटबंधारे मंडळानेही महावितरणला एका पत्राद्वारे कळविले होते. असे असतानाही कार्यवाही झाली नाही. एकूणच शहराचा पाणीप्रश्न एप्रिलच्या मध्यानंतर ऐरणीवर येणार आहे. विष्णूपुरी प्रकल्पात पाणी घेण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने शहरासियांची चिंता आणखीच वाढणार आहे.शहरासाठी पैनगंगा प्रकल्पातूनही पाणी घेतले जात आहे. पहिल्या टप्प्यात २ दलघमी पाणी आसना नदीमध्ये घेण्यात आले होते. सांगवी बंधाºयातून हे पाणी उचलून काबरानगरातील जलशुद्धीकरण केंद्रातून उतर नांदेडातील काही भागांना उपलब्ध झालेल्या १ दलघमी पाण्यातून २० ते २५ दिवस पाणीपुरवठा केला होता. दुसºया टप्प्यात पाणी घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पाटबंधारे विभागाला महापालिकेने पत्र दिले आहे.१२ हजार अश्वशक्ती पंपाने पाणीउपसाविष्णूपुरी प्रकल्पात उपलब्ध असलेल्या ३७ दलघमी पाण्यातून प्रतिमाह १२ दलघमी पाणीउपसा असाच सुरु राहिल्यास तीन महिन्यांतच प्रकल्प तळाला जाणार आहे. त्याचवेळी फेब्रुवारीनंतर बाष्पीभवनाचे प्रमाण वाढणार आहे. प्रकल्पातून २३ डिसेंबर २०१८ ते २८ डिसेंबर २०१८ या कालावधीत २.८७ दलघमी पाण्याचा वापर झाला आहे. हे प्रमाण प्रतिदिन ०.५७ दलघमी इतके आहे. प्रकल्पाच्या दोन्ही तीरांवरुन शेतकºयांनी बसविलेल्या पंपाची एकत्रित अश्वशक्ती ही १२ हजार इतकी आहे. या अश्वशक्तीने पाणीउपसा सुरु असल्याचे पाटबंधारे विभागानेच स्पष्ट केले आहे. हा उपसा रोखण्याची गरज आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका