शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Maharashtra Election 2019 : बंड झाले थंड ! चिखलीकरांपाठोपाठ खतगावकरही नरमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 18:01 IST

दोघांकडून मुख्यमंत्री सांगतील तोच निर्णय घेतला जाईल असे सांगत नरमाईची भूमिका

ठळक मुद्देजिल्ह्यात भाजपाला दोनच जागाचिंतनासाठी मागितला वेळ

नांदेड : लोहा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यानंतर समर्थकांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर खा.चिखलीकरांनी मुख्यमंत्री सांगतील तोच निर्णय घेतला जाईल असे सांगत नरमाईची भूमिका घेतली होती़ चिखलीकरांपाठोपाठ आता भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनीही चिंतनासाठी वेळ मागत बंडाचा झेंडा खाली ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे़

सेना-भाजपाच्या युतीमध्ये विद्यमान खा़प्रताप पाटील चिखलीकर यांचे पूत्र प्रवीण पाटील चिखलीकर हे भाजपामधून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते़ मात्र लोह्याची जागा सेनेला सुटली़ तर नायगाव विधानसभा मतदारसंघातून प्रदेश उपाध्यक्ष खतगावकर यांची सून डॉ़मिनल पाटील खतगावकर यांनी विधानसभेसाठी तयारी केली होती़ नायगावची जागाही मित्रपक्ष रिपाइंला सोडून तेथे राजेश पवार यांना उमेदवारी देण्यात आली़ या प्रकारामुळे विद्यमान खा़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खाख़तगावकर यांच्या समर्थकांनी लोहा आणि नायगाव मतदारसंघात वेगळी भूमिका घेण्याची मागणी केली होती़ मंगळवारी झालेल्या बैठकीत चिखलीकरांनी समर्थकांपुढे गुरुवारपर्यंतची वेळ मागितली होती़ तर खतगावकरांच्या राजेंद्रनगर येथील निवासस्थानी गुरुवारी झालेल्या बैठकीत खतगावकरांनी समर्थकांपुढे शुक्रवारी सकाळपर्यंतची वेळ चिंतनासाठी मागितली आहे़ 

राजेंद्रनगर येथे झालेल्या बैठकीत गुरुवारी खतगावकर समर्थकांनी डॉ़मिनलताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला़ तुम्ही सांगाल तो निर्णय मान्य राहील असेही कार्यकर्त्यांनी भावनाविवश होत सांगितले़ यावेळी व्यंकट पाटील गुजरीकर, शेख वल्ली, मंगल देसाई, खालयाअप्पा कासराळीकर, जीवन चव्हाण, भगवानराव मनूरकर, धनराज शिरोळे, सुभाष खांडरे, धोंडीबा कांबळे, सरजीतसिंघ गील, नामदेव पाटील जाहूरकर, यादवराव तुडमे आदी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या़ या सहविचार सभेत बोलताना डॉ़मिनलताई खतगावकर यांनी पक्षाकडे खतगावकरांनी आपल्या तिकीटाची मागणीही सून म्हणून नव्हे तर हे काम करणारी कार्यकर्ती म्हणून मागितले होते़ पक्षाने कामाची दखल घेतली नसली तरीही आपण पक्षकार्य सुरूच ठेवू असे त्यांनी स्पष्ट केले़ त्यानंतर खतगावकर यांनी कार्यकर्त्यांपुढे जिल्ह्यात आपण भाजपाला ताकद दिल्याचे सांगताना आम्ही काही संन्यासी नाहीत, आम्हालाही कार्यकर्त्याची चिंता आहे़ पण त्याच वेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात चांगले काम होत असल्याचे सांगत त्यांनी कोणताही निर्णय हा विचारपूर्वक घेवू असे सांगून शुक्रवारी सकाळपर्यंत चिंतनासाठी वेळ मागितली़ 

या बैठकीनंतर माजी खाख़तगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी स्पर्धा असते, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर असंतोष असतो असे सांगितले़ भाजपा हा कुटुंबियांना तिकीट देत नसल्याचे सांगितले़ 

जिल्ह्यात भाजपाला दोनच जागालोकसभा निवडणुकीत मोठा विजय प्राप्त करणाऱ्या भाजपाला जिल्ह्यात केवळ दोनच जागा मिळाल्या आहेत़ यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत़ किमान पाच जागा तरी मिळाव्यात अशी अपेक्षा होती़ पण ती पूर्ण झाली नाही़ याबाबत निश्चितच विचार करण्याची गरज असल्याचेही खतगावकर म्हणाले़ काँग्रेससोबत काही चर्चा झाली काय, या प्रश्नावर त्यांनी सर्व गोष्टी सांगायच्या नसतात, असे उत्तर दिले़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NandedनांदेडPratap Patil Chikhalikarप्रताप पाटील चिखलीकरBJPभाजपा