शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

Maharashtra Election 2019 : सरकारचा कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा डाव : अशोक चव्हाण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:31 IST

देश आणि राज्यातील इतर समस्यांवरुन लक्ष विचलित करण्याचा डाव

ठळक मुद्देवंचित आघाडीमुळे भाजपाचाच फायदाशिवसेना-भाजपा सरकारचे धोरण शेतकऱ्यांना संपविणारे आहे.

मुदखेड : खोटं बोल पण रेटून बोल, ही भाजप-शिवसेना सरकारची नीती आहे. देश आणि राज्यातील इतर समस्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला़

युती सरकारने मागील ५ वर्षे राज्यातील सर्वसामान्यांची फसवणूक तसेच दिशाभूल केल्याचे सांगत हा सर्वसामान्य माणूसच या निवडणुकीत शिवसेना-भाजपला धडा शिकवेल़ युपीपीचे पाणी हिंगोली, परभणीकडे वळविण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. असे झाल्यास उमरी, धर्माबाद, भोकर, अर्धापूर, हदगाव या तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. त्यामुळे सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.चव्हाण यांनी शुक्रवारी मुदखेड तालुक्यातील धनज, खांबाळा, दुधनवाडी, तिरकसवाडी आदी गावांचा प्रचारदौरा केला. त्यानंतर सरेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धवराव पवार, संतोष गव्हाणे, माधव पांडागळे, बाळासाहेब देशमुख, गजानन पवार, सदाशिव खवासे, श्यामराव पाटील, अ‍ॅड. वीरभद्र देवठाणकर, उद्धवराव पाटील, सरीता वारकड, पप्पूराव टेकाळे, शिवदास हिपरगे, राजेश कळणे, जीवनराव कळणे आदींची उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले, खोट्या आश्वासनांना भुलून देश गमावला. आता राज्य गमावू नका, असे सांगत चांद्रयान मोहीम, कलम ३७० यावर चर्चेचे गुºहाळ गाळले जात आहे. प्रत्यक्षात मागील पाच वर्षांत काय केले? याचा हिशेब या सरकारने मांडला पाहिजे. मात्र पाच वर्षांत सर्वसामान्य कष्टकरी, शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम या सरकारने  केले असल्याने सांगण्यासारखा मुद्दाच नसल्याने कलम ३७० वर वेळ मारुन नेली जात असल्याचे ते म्हणाले. पाच वर्षांत शेतकरी आत्महत्या का थांबल्या नाहीत? बेरोजगारी वाढत आहे, त्यावर काय उपाययोजना केल्या? कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत काय पोहोचली नाही? जाहीर केलेल्या मेगा भरतीचे काय झाले? याची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत, असे आव्हान चव्हाण यांनी दिले. यावेळी संतोष गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना-भाजपा सरकारचे धोरण शेतकऱ्यांना संपविणारे आहे. अशी टीकाही त्यांनी केली़  

वंचित आघाडीमुळे भाजपाचाच फायदालोकसभा निवडणुकीत काहींनी वंचित बहुजन आघाडीला मते दिली. त्याचा काय फायदा झाला. या आघाडीमुळे ‘तुला न मला घाल दुसऱ्याला’ अशी अवस्था झाल्याने भाजपाला बळ मिळाले. मराठा, दलित समाजाचे मतदान फोडायचे आणि सत्ता हस्तगत करायची, ही सेना-भाजपाची खेळी असून तोच खेळ आता पुन्हा विधानसभा निवडणुकीतही खेळला जात असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. गावांच्या भानगडीत मला पाडू नका, गावातील हेवेदावे, तंटे सोडवा पण वड्याचे तेल वांग्यावर काढू नका. त्यामुळे केवळ काँग्रेसचे नुकसान होते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashok Chavanअशोक चव्हाणmukhed-acमुखेडbhokar-acभोकरNandedनांदेड