शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Maharashtra Election 2019 : सरकारचा कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा डाव : अशोक चव्हाण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:31 IST

देश आणि राज्यातील इतर समस्यांवरुन लक्ष विचलित करण्याचा डाव

ठळक मुद्देवंचित आघाडीमुळे भाजपाचाच फायदाशिवसेना-भाजपा सरकारचे धोरण शेतकऱ्यांना संपविणारे आहे.

मुदखेड : खोटं बोल पण रेटून बोल, ही भाजप-शिवसेना सरकारची नीती आहे. देश आणि राज्यातील इतर समस्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला़

युती सरकारने मागील ५ वर्षे राज्यातील सर्वसामान्यांची फसवणूक तसेच दिशाभूल केल्याचे सांगत हा सर्वसामान्य माणूसच या निवडणुकीत शिवसेना-भाजपला धडा शिकवेल़ युपीपीचे पाणी हिंगोली, परभणीकडे वळविण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. असे झाल्यास उमरी, धर्माबाद, भोकर, अर्धापूर, हदगाव या तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. त्यामुळे सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.चव्हाण यांनी शुक्रवारी मुदखेड तालुक्यातील धनज, खांबाळा, दुधनवाडी, तिरकसवाडी आदी गावांचा प्रचारदौरा केला. त्यानंतर सरेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धवराव पवार, संतोष गव्हाणे, माधव पांडागळे, बाळासाहेब देशमुख, गजानन पवार, सदाशिव खवासे, श्यामराव पाटील, अ‍ॅड. वीरभद्र देवठाणकर, उद्धवराव पाटील, सरीता वारकड, पप्पूराव टेकाळे, शिवदास हिपरगे, राजेश कळणे, जीवनराव कळणे आदींची उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले, खोट्या आश्वासनांना भुलून देश गमावला. आता राज्य गमावू नका, असे सांगत चांद्रयान मोहीम, कलम ३७० यावर चर्चेचे गुºहाळ गाळले जात आहे. प्रत्यक्षात मागील पाच वर्षांत काय केले? याचा हिशेब या सरकारने मांडला पाहिजे. मात्र पाच वर्षांत सर्वसामान्य कष्टकरी, शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम या सरकारने  केले असल्याने सांगण्यासारखा मुद्दाच नसल्याने कलम ३७० वर वेळ मारुन नेली जात असल्याचे ते म्हणाले. पाच वर्षांत शेतकरी आत्महत्या का थांबल्या नाहीत? बेरोजगारी वाढत आहे, त्यावर काय उपाययोजना केल्या? कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत काय पोहोचली नाही? जाहीर केलेल्या मेगा भरतीचे काय झाले? याची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत, असे आव्हान चव्हाण यांनी दिले. यावेळी संतोष गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना-भाजपा सरकारचे धोरण शेतकऱ्यांना संपविणारे आहे. अशी टीकाही त्यांनी केली़  

वंचित आघाडीमुळे भाजपाचाच फायदालोकसभा निवडणुकीत काहींनी वंचित बहुजन आघाडीला मते दिली. त्याचा काय फायदा झाला. या आघाडीमुळे ‘तुला न मला घाल दुसऱ्याला’ अशी अवस्था झाल्याने भाजपाला बळ मिळाले. मराठा, दलित समाजाचे मतदान फोडायचे आणि सत्ता हस्तगत करायची, ही सेना-भाजपाची खेळी असून तोच खेळ आता पुन्हा विधानसभा निवडणुकीतही खेळला जात असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. गावांच्या भानगडीत मला पाडू नका, गावातील हेवेदावे, तंटे सोडवा पण वड्याचे तेल वांग्यावर काढू नका. त्यामुळे केवळ काँग्रेसचे नुकसान होते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashok Chavanअशोक चव्हाणmukhed-acमुखेडbhokar-acभोकरNandedनांदेड