शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
2
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
3
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
5
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
6
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
7
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
8
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
9
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
10
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
11
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
12
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
13
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
14
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
15
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
16
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
17
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
18
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
19
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी

Maharashtra Election 2019 : सरकारचा कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा डाव : अशोक चव्हाण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:31 IST

देश आणि राज्यातील इतर समस्यांवरुन लक्ष विचलित करण्याचा डाव

ठळक मुद्देवंचित आघाडीमुळे भाजपाचाच फायदाशिवसेना-भाजपा सरकारचे धोरण शेतकऱ्यांना संपविणारे आहे.

मुदखेड : खोटं बोल पण रेटून बोल, ही भाजप-शिवसेना सरकारची नीती आहे. देश आणि राज्यातील इतर समस्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला़

युती सरकारने मागील ५ वर्षे राज्यातील सर्वसामान्यांची फसवणूक तसेच दिशाभूल केल्याचे सांगत हा सर्वसामान्य माणूसच या निवडणुकीत शिवसेना-भाजपला धडा शिकवेल़ युपीपीचे पाणी हिंगोली, परभणीकडे वळविण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. असे झाल्यास उमरी, धर्माबाद, भोकर, अर्धापूर, हदगाव या तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल. त्यामुळे सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.चव्हाण यांनी शुक्रवारी मुदखेड तालुक्यातील धनज, खांबाळा, दुधनवाडी, तिरकसवाडी आदी गावांचा प्रचारदौरा केला. त्यानंतर सरेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धवराव पवार, संतोष गव्हाणे, माधव पांडागळे, बाळासाहेब देशमुख, गजानन पवार, सदाशिव खवासे, श्यामराव पाटील, अ‍ॅड. वीरभद्र देवठाणकर, उद्धवराव पाटील, सरीता वारकड, पप्पूराव टेकाळे, शिवदास हिपरगे, राजेश कळणे, जीवनराव कळणे आदींची उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले, खोट्या आश्वासनांना भुलून देश गमावला. आता राज्य गमावू नका, असे सांगत चांद्रयान मोहीम, कलम ३७० यावर चर्चेचे गुºहाळ गाळले जात आहे. प्रत्यक्षात मागील पाच वर्षांत काय केले? याचा हिशेब या सरकारने मांडला पाहिजे. मात्र पाच वर्षांत सर्वसामान्य कष्टकरी, शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम या सरकारने  केले असल्याने सांगण्यासारखा मुद्दाच नसल्याने कलम ३७० वर वेळ मारुन नेली जात असल्याचे ते म्हणाले. पाच वर्षांत शेतकरी आत्महत्या का थांबल्या नाहीत? बेरोजगारी वाढत आहे, त्यावर काय उपाययोजना केल्या? कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत काय पोहोचली नाही? जाहीर केलेल्या मेगा भरतीचे काय झाले? याची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावीत, असे आव्हान चव्हाण यांनी दिले. यावेळी संतोष गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना-भाजपा सरकारचे धोरण शेतकऱ्यांना संपविणारे आहे. अशी टीकाही त्यांनी केली़  

वंचित आघाडीमुळे भाजपाचाच फायदालोकसभा निवडणुकीत काहींनी वंचित बहुजन आघाडीला मते दिली. त्याचा काय फायदा झाला. या आघाडीमुळे ‘तुला न मला घाल दुसऱ्याला’ अशी अवस्था झाल्याने भाजपाला बळ मिळाले. मराठा, दलित समाजाचे मतदान फोडायचे आणि सत्ता हस्तगत करायची, ही सेना-भाजपाची खेळी असून तोच खेळ आता पुन्हा विधानसभा निवडणुकीतही खेळला जात असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. गावांच्या भानगडीत मला पाडू नका, गावातील हेवेदावे, तंटे सोडवा पण वड्याचे तेल वांग्यावर काढू नका. त्यामुळे केवळ काँग्रेसचे नुकसान होते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashok Chavanअशोक चव्हाणmukhed-acमुखेडbhokar-acभोकरNandedनांदेड