शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मागोवा २०१७ : नांदेड या काँग्रेसच्या गडाला मजबुती देणारे वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 19:06 IST

२०१७ हे वर्ष राजकीय पातळीवर लक्षवेधी ठरले. याच वर्षात राज्याचे लक्ष लागलेली नांदेड महानगरपालिका निवडणूक झाली. या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवित काँग्रेसने नांदेड जिल्ह्यावर असलेले आपले वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित असल्याचे दाखवून दिले.

नांदेड : सरते २०१७ हे वर्ष राजकीय पातळीवर लक्षवेधी ठरले. याच वर्षात राज्याचे लक्ष लागलेली नांदेड महानगरपालिका निवडणूक झाली. या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवित काँग्रेसने नांदेड जिल्ह्यावर असलेले आपले वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित असल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे, वर्षाच्या अखेरच्या महिन्यात काँग्रेस नेते खा. अशोकराव चव्हाण यांच्याबद्दलची विशेष चौकशीची परवानगी उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविल्याने खा. चव्हाण यांच्यासह जिल्हा काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

आॅक्टोबरमध्ये नांदेड महानगरपालिकेचा फड रंगला. ही निवडणूक भाजपाने गांभीर्याने घेवून परिवर्तन घडविण्याचा नारा दिल्याने काँग्रेसचा गड असलेल्या महानगरपालिकेत काय होते? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् मंत्र्यांची फौज तर शिवसेनेकडूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे प्रमुख नेते मैदानात उतरल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या होत्या़ मात्र नांदेडचा हा गड काँग्रेसने एकहाती जिंकून सर्वच पक्षांना मोठी चपराक दिली. या निवडणुकीत एमआयएमचाही दारुण पराभव झाला. ज्या नांदेडमध्ये घवघवीत यश घेवून एमआयएमचा घोडा राज्याच्या विविध भागात चौफेर उधळला होता. त्यालाही नांदेडमध्येच लगाम घालण्यात महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसला यश आले.

शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठीही हे वर्ष तसे निराशाजनकच ठरले. शहरात आमदार असतानाही शिवसेनेला महानगरपालिकेत अवघी एक जागा मिळाली तर राष्ट्रवादीचे खातेही उघडले नाही. एकूणच महापालिका निवडणुकीने नांदेडमधील काँग्रेसच्या वर्चस्वाला एकप्रकारे बळकटी दिल्याचे दिसून आले. तर २०१७ या वर्षाने राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही धोक्याचा इशारा दिल्याचे दिसून येते. मनपानंतर किनवट पालिका निवडणुकीत भाजपाने आपला झेंडा फडकविला. काँग्रेस, राष्ट्रवादीमधील मतविभाजनाचा नेमका फायदा येथे भाजपाला उठविता आला.

किनवट पालिका निवडणुकीतील हा विजय जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी उमेद वाढविणारा ठरला. मात्र किनवट पालिका निवडणुकीनंतर केवळ मतविभाजनामुळे पराभव पत्करावा लागल्याचे लक्षात आल्याने नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित आले आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा आघाडीचे पर्व सुरू झाल्याचे संकेत मिळाले. या आघाडीमुळेच जिल्हा बँकेच्या सत्तेतून भाजपाला पायउतार व्हावे लागले. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणNandedनांदेडcongressकाँग्रेस