शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मागोवा २०१७ : नांदेड या काँग्रेसच्या गडाला मजबुती देणारे वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 19:06 IST

२०१७ हे वर्ष राजकीय पातळीवर लक्षवेधी ठरले. याच वर्षात राज्याचे लक्ष लागलेली नांदेड महानगरपालिका निवडणूक झाली. या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवित काँग्रेसने नांदेड जिल्ह्यावर असलेले आपले वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित असल्याचे दाखवून दिले.

नांदेड : सरते २०१७ हे वर्ष राजकीय पातळीवर लक्षवेधी ठरले. याच वर्षात राज्याचे लक्ष लागलेली नांदेड महानगरपालिका निवडणूक झाली. या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवित काँग्रेसने नांदेड जिल्ह्यावर असलेले आपले वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित असल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे, वर्षाच्या अखेरच्या महिन्यात काँग्रेस नेते खा. अशोकराव चव्हाण यांच्याबद्दलची विशेष चौकशीची परवानगी उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविल्याने खा. चव्हाण यांच्यासह जिल्हा काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

आॅक्टोबरमध्ये नांदेड महानगरपालिकेचा फड रंगला. ही निवडणूक भाजपाने गांभीर्याने घेवून परिवर्तन घडविण्याचा नारा दिल्याने काँग्रेसचा गड असलेल्या महानगरपालिकेत काय होते? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् मंत्र्यांची फौज तर शिवसेनेकडूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे प्रमुख नेते मैदानात उतरल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या होत्या़ मात्र नांदेडचा हा गड काँग्रेसने एकहाती जिंकून सर्वच पक्षांना मोठी चपराक दिली. या निवडणुकीत एमआयएमचाही दारुण पराभव झाला. ज्या नांदेडमध्ये घवघवीत यश घेवून एमआयएमचा घोडा राज्याच्या विविध भागात चौफेर उधळला होता. त्यालाही नांदेडमध्येच लगाम घालण्यात महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसला यश आले.

शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठीही हे वर्ष तसे निराशाजनकच ठरले. शहरात आमदार असतानाही शिवसेनेला महानगरपालिकेत अवघी एक जागा मिळाली तर राष्ट्रवादीचे खातेही उघडले नाही. एकूणच महापालिका निवडणुकीने नांदेडमधील काँग्रेसच्या वर्चस्वाला एकप्रकारे बळकटी दिल्याचे दिसून आले. तर २०१७ या वर्षाने राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही धोक्याचा इशारा दिल्याचे दिसून येते. मनपानंतर किनवट पालिका निवडणुकीत भाजपाने आपला झेंडा फडकविला. काँग्रेस, राष्ट्रवादीमधील मतविभाजनाचा नेमका फायदा येथे भाजपाला उठविता आला.

किनवट पालिका निवडणुकीतील हा विजय जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी उमेद वाढविणारा ठरला. मात्र किनवट पालिका निवडणुकीनंतर केवळ मतविभाजनामुळे पराभव पत्करावा लागल्याचे लक्षात आल्याने नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित आले आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा आघाडीचे पर्व सुरू झाल्याचे संकेत मिळाले. या आघाडीमुळेच जिल्हा बँकेच्या सत्तेतून भाजपाला पायउतार व्हावे लागले. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणNandedनांदेडcongressकाँग्रेस