शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मागोवा २०१७ : नांदेड या काँग्रेसच्या गडाला मजबुती देणारे वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 19:06 IST

२०१७ हे वर्ष राजकीय पातळीवर लक्षवेधी ठरले. याच वर्षात राज्याचे लक्ष लागलेली नांदेड महानगरपालिका निवडणूक झाली. या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवित काँग्रेसने नांदेड जिल्ह्यावर असलेले आपले वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित असल्याचे दाखवून दिले.

नांदेड : सरते २०१७ हे वर्ष राजकीय पातळीवर लक्षवेधी ठरले. याच वर्षात राज्याचे लक्ष लागलेली नांदेड महानगरपालिका निवडणूक झाली. या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवित काँग्रेसने नांदेड जिल्ह्यावर असलेले आपले वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित असल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे, वर्षाच्या अखेरच्या महिन्यात काँग्रेस नेते खा. अशोकराव चव्हाण यांच्याबद्दलची विशेष चौकशीची परवानगी उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविल्याने खा. चव्हाण यांच्यासह जिल्हा काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

आॅक्टोबरमध्ये नांदेड महानगरपालिकेचा फड रंगला. ही निवडणूक भाजपाने गांभीर्याने घेवून परिवर्तन घडविण्याचा नारा दिल्याने काँग्रेसचा गड असलेल्या महानगरपालिकेत काय होते? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् मंत्र्यांची फौज तर शिवसेनेकडूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे प्रमुख नेते मैदानात उतरल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडाल्या होत्या़ मात्र नांदेडचा हा गड काँग्रेसने एकहाती जिंकून सर्वच पक्षांना मोठी चपराक दिली. या निवडणुकीत एमआयएमचाही दारुण पराभव झाला. ज्या नांदेडमध्ये घवघवीत यश घेवून एमआयएमचा घोडा राज्याच्या विविध भागात चौफेर उधळला होता. त्यालाही नांदेडमध्येच लगाम घालण्यात महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसला यश आले.

शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठीही हे वर्ष तसे निराशाजनकच ठरले. शहरात आमदार असतानाही शिवसेनेला महानगरपालिकेत अवघी एक जागा मिळाली तर राष्ट्रवादीचे खातेही उघडले नाही. एकूणच महापालिका निवडणुकीने नांदेडमधील काँग्रेसच्या वर्चस्वाला एकप्रकारे बळकटी दिल्याचे दिसून आले. तर २०१७ या वर्षाने राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही धोक्याचा इशारा दिल्याचे दिसून येते. मनपानंतर किनवट पालिका निवडणुकीत भाजपाने आपला झेंडा फडकविला. काँग्रेस, राष्ट्रवादीमधील मतविभाजनाचा नेमका फायदा येथे भाजपाला उठविता आला.

किनवट पालिका निवडणुकीतील हा विजय जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी उमेद वाढविणारा ठरला. मात्र किनवट पालिका निवडणुकीनंतर केवळ मतविभाजनामुळे पराभव पत्करावा लागल्याचे लक्षात आल्याने नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित आले आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा आघाडीचे पर्व सुरू झाल्याचे संकेत मिळाले. या आघाडीमुळेच जिल्हा बँकेच्या सत्तेतून भाजपाला पायउतार व्हावे लागले. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणNandedनांदेडcongressकाँग्रेस