शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून लोकसभेची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:17 IST

नांदेड लोकसभेच्या रणधुमाळीला १९ मार्चपासून प्रसिद्ध होणाऱ्या अधिसूचनेने प्रारंभ होणार आहे. १९ मार्चपासूनच नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणा सज्ज १९ ते २७ मार्चपर्यंत दाखल करता येणार उमेदवारी अर्ज

नांदेड: नांदेड लोकसभेच्या रणधुमाळीला १९ मार्चपासून प्रसिद्ध होणाऱ्या अधिसूचनेने प्रारंभ होणार आहे. १९ मार्चपासूनच नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनीही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्याही दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यांना आचारसंहितेबाबत माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना ७० लाखांची खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज १९ मार्चपासून २७ मार्चपर्यंत भरता येणार आहेत. या कालावधीत महापालिका कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय हा रस्ता वाहतुकीसाठी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.निवडणूक खर्च निरीक्षक सुरेंद्र नाथा हे १९ मार्च रोजी नांदेडमध्ये दाखल होणार असल्याचेही जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले.जिल्ह्यात काही गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. भोकर तालुक्यातील दिवशी आणि माहूर तालुक्यातील लिंगायत नेर येथील ग्रामस्थांनी इशारा दिला आहे. संबंधित तहसीलदार गावकऱ्यांशी चर्चा करीत असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले. त्याचवेळी निवडणूकविषयक प्रशिक्षणही देण्यात येत आहे. पहिले प्रशिक्षण २४ मार्च रोजी होणार असल्याचे आहे़ मतदान यंत्रामधील होणारा बिघाड लक्षात घेता कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात येत आहे. नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण मतदारसंघातील निवडणूक कर्मचाºयांना २५ आणि २६ मार्च रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भरारी पथके, क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख यांनाही प्रशिक्षण दिले जात असल्याचेही परदेशी म्हणाले. प्रारंभी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी प्रास्ताविकात उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी आचारसंहिता नियमाबाबत शंका, अडचणी असल्यास निवडणूक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.दुपारी तीन पूर्वी दाखल करावे लागणार अर्जलोकसभा निवडणुकीत शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत जितके अर्ज जिल्हा निवडणूक अधिका-यांकडे सादर केले जातील, तेच अर्ज वैध ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्पष्ट केले. जालना येथील एका प्रकरणात उच्च न्यायालयाने वेळेच्या नियमाबाबत स्पष्टता केली आहे. उमेदवारी अर्ज तीन वाजेपर्यंत निवडणूक अधिकाºयांकडे सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कक्षात असूनही तीन वाजेपूर्वी अर्ज सादर न झाल्यास तो वैध मानला जाणार नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे एकूणच लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना वेळेच्या आत आपले अर्ज सादर करावे लागणार आहेत.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग