शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

लिंबोटीचे पाणी आता पालम तालुक्यासह ६५ गावांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:16 IST

लिंबोटीचे पाणी लातूर जिल्हा पाठोपाठ आता परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यासह ६५ गावांना दिले जात आहे.त्यामुळे लोहा-कंधार मतदारसंघातील हिरव्या शेतीला उजाड, ओसाड करण्याचे षडयंत्र आहे.

ठळक मुद्देधोंडगेंचे चिखलीकरांवर टीकास्त्र लोहा-कंधार मतदारसंघ कोरडे ठेवण्याचे षडयंत्र

कंधार : लिंबोटीचे पाणी लातूर जिल्हा पाठोपाठ आता परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यासह ६५ गावांना दिले जात आहे.त्यामुळे लोहा-कंधार मतदारसंघातील हिरव्या शेतीला उजाड, ओसाड करण्याचे षडयंत्र आहे. असे टीकास्त्र माजी आ.शंकर धोंडगे यांनी आ.प्रताप पा.चिखलीकर यांच्यावर सोडले़लोहा तालुक्यातील अप्पर मानार प्रकल्प (लिंबोटी) हे लोहा-कंधार तालुक्यातील शेती सिंचनाखाली यावी.आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण बळकट व्हावे.यासाठी प्रकल्पाची निर्मिती झाली.परंतु या प्रकल्पातील पाणी उचलण्याची स्पर्धा सुरु झाली.लातूर जिल्ह्यातील अहमदपूरला सेना-भाजपाच्या १९९५ च्या शासन काळात ३०टक्के पाणी देण्यात आले. आता भाजपा-सेनेच्या कार्यकाळात २० टक्के (१०द.ल.घ.मी.) पाणी उदगीरला देण्याचे पातक आ.चिखलीकर यांनी केले. असा आरोप धोंडगे यांनी केला.एवढे कमी आहे म्हणून की काय आता शासनाच्या पाणी पुरवठा विभागाचे मंत्री व आ.चिखलीकर यांनी संगनमताने लिंबोटी प्रकल्प कोरडा करण्याचा घाट घातला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत पालम तालुक्यासह ६५ गावच्या संयुक्त पाणी पुरवठ्यासाठी ५७ कोटीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता जून २०१८ मध्ये देण्यात आली. तसेच ६ डिसेंबर २०१८ ला या योजनेचा कायार्रंभ दिला.असे धोंडगे यांनी सांगितले.लिंबोटीचे पाणी देण्यापेक्षा दिग्रस बंधा-यातील विष्णूपूरीचे आरक्षण वगळता ३७ द.ल.घ.मी.पाणी व मुळी बंधाºयातील १२ द.ल.घ.मी.असे एकूण ५० द.ल.घ.मी.शिल्लक पाणी आहे. तसेच पाथरी तालुक्यात मुदगल,तासगव्हाण,ढालेगाव हे उच्च पातळीचे बंधारे आहेत.मग मानार खोºयातील उरलेले पाणी या योजनेला देण्याचे विश्वासघात आ.चिखलीकर करत असल्याचा आरोप धोंडगे यांनी केला.मोठ्या संघर्षाने शेती सिंचनासाठी उभारलेला सुमारे ४०० कोटी खर्च केलेला प्रकल्प आता इतरत्र पाणी दिले जात असल्याने या भागाचे वाळवंट होण्याचा धोका आहे.यावेळी दत्ता पवार,बाबूराव केंद्रे ,दिलीप धोंडगे, शिवदास धमार्पूरीकर, राजकुमार केकाटे आदीची उपस्थिती होती.दरम्यान, काही दिवसापूर्वीच आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून किवळा साठवण तलावासाठी निधी आणल्याचे सांगितले होते़ तसेच आपल्याच प्रयत्नातून या साठवण तलावाच्या कामाचे निकष बदलण्यात आल्याचे ते म्हणाले होते़ त्यावर माजी आ़शंकर धोंडगे यांनीही पत्रपरिषद घेवून किवळ साठवण तलावाला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मंजूरी मिळाल्याचे सांगितले होते़ त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांमध्ये लिंबोटी हा वादाचा विषय ठरणार आहे़रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा चिखलीकरांचा केविलवाणा प्रकार

  • केंद्रीय महामार्गाकडून राष्ट्रीय रस्ते बांधणी कार्यक्रम असतो.हे महामार्ग विविध राज्ये,जिल्हा व तालुक्यातून जात असतात.प्रधानमंत्री, संबंधित मंत्री उद्घाटन करत असताना उथळपणा आमदार करत असल्याचा आरोप धोंडगे यांनी केला.नांदेडचे खासदार व मुखेडचे आमदार हे उद्घाटन करताना दिसत नाहीत. मग श्रेय घेण्याचा केविलवाणा खटाटोप ते करत असल्याचा टोला धोंडगे यांनी लगावला. आपल्या मतदारसंघातील रस्ते सुधारण्याचा सल्ला त्यांनी चिखलीकरांना दिला. मतदारसंघात अवैध धंदे सुरू आहेत.आरोग्यसेवा बेभरवशाची, विविध कार्यालयातील कामकाज ढेपाळले आहे. विकासाच्या पोकळ गप्पा मारणे सुरु आहे़ असा टोलाही धोंडगे यांनी लगाविला़
टॅग्स :NandedनांदेडDamधरणwater scarcityपाणी टंचाई