शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
3
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
4
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
5
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
6
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
7
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
8
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
9
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
10
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
11
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
12
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
13
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
14
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
15
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
16
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
17
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
18
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
19
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
20
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण

छातीपर्यंत पाण्यातून जीव वाचविण्यासाठी धावपळ; लेंडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे मुखेडात हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:09 IST

झोपेत असलेल्या ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली, पाच

मुखेड (जि. नांदेड) : लेंडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात पुराच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या पाचपैकी तीन महिलांचे मृतदेह सायंकाळी हाती लागले. तर अद्यापही दोघींचा शोध लागू शकला नाही, गंगाबाई गंगाराम मादळे (वय ६०), भीमाबाई हिरामण मादळे (५५) यांचा मृतदेह सायंकाळी ४ वाजता आढळला. त्यानंतर तासाभराने ललिताबाई भोसले यांचा मृतदेह हसनाळ (प.मु.) येथून काढण्यात आला.

रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंतरराज्यीय लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील रावणगाव, हासनाळ, भासवाडी आणि भिंगेली ही चार गावे पाण्याखाली गेली होती. नुकतेच घळभरणी झालेल्या लेंडीचे बॅकवॉटर या गावात घुसले होते. रात्री अंधारातच साखर झोपेत असलेल्या नागरिकांना जीव वाचविण्यासाठी छातीपर्यंतच्या पाण्यातून धावपळ करावी लागली.

सोमवारी दुपारपर्यंत बचाव पथकाने २०० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले होते. दिवसभर बचावकार्य सुरूच होते. पुरात कारमधील तीन महिला बेपत्ता झाल्या असून हासनाळ येथील पाच ते सात जणांचा अद्यापही संपर्क झाला नाही. बचाव कार्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून सैन्य दलाला पाचारण करण्यात आले होते.

लेंडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे दीड ते दोन वाजेच्या सुमारास बुडीत क्षेत्रातील रावणगाव, हासनाळ, भासवाडी आणि भिंगेली या चार गावांमध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली होती. झोपेत असलेल्या ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली. ग्रामस्थांनी अंधारातच उंच ठिकाणांकडे धाव घेतली, तर म्हाताऱ्या मंडळींना छातीपर्यंतच्या पाण्यातून युवकांनी बाहेर काढले; परंतु चालताही येत नसलेली काही म्हातारी मंडळी घरातच थांबली होती.

पहाटे चार वाजेपासून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते. जवळपास तीनशेहून अधिक जणांना दुपारपर्यंत बाहेर काढण्यात आले. अद्यापही शेकडो जण पाण्यात अडकून आहेत. त्यांच्या बचाव कार्यासाठी आता सैन्य दलाला पाचारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सोमवारीही नांदेड आणि लातूर जिल्ह्याला ऑरेंट अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तेलंगणाच्या प्रधान सचिवांशी संपर्क करून पोचमपाड धरणातून पाणी विसर्गावर चर्चा केली. सोमवारी दिवसभर पाऊस थांबला असला, तरी रात्रीच्या वेळी पावसाचा जोर वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

तीन महिला बेपत्ता, सात जणांशी संपर्कच नाही

दगीर येथील तीन महिला एका मुलासह करीमनगरकडे कारमधून जात होत्या. यावेळी रावी येथील नाल्याच्या पुरात कार आणि तीन महिला वाहून गेल्या; परंतु कारमधील मुलगा मात्र बचावला. या तिन्ही महिलांचा शोध सुरू आहे. हासनाळ येथील पुरात अडकलेल्या पाच ते सात जणांचाही अद्याप संपर्क झाला नव्हता. ही सर्व मंडळी वयोवृद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय काळजीत पडले आहेत. रात्रीच्या वेळी रावणगाव येथील राजू पाटील यांच्या वाड्यावर तब्बल ३०० नागरिकांनी आश्रय घेतला होता, तर कुणी मशीद, तर कुणी झाडावर चढून जीव वाचविला.

दोनशेहून अधिक पशुधन मृत्युमुखीमुखेड तालुक्यातील चार गावांतील शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी, बैल, असे दोनशेहून अधिक पशुधन या पुरात मृत्युमुखी पडले आहे. मुक्रमाबाद येथील बालाजी खंकरे या शेतकऱ्यांच्या तब्बल ४० म्हैस मरण पावल्या आहेत. त्यामुळे पशुपालकांवर मोठे संकट ओढावले आहे.

घळभरणीमुळे परिस्थिती ओढावलीपहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गावांमध्ये पाणी शिरले आहे. या पुरात हासनाळ येथील पाच ते सात जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. लेंडी धरणाची घळभरणी करण्यापूर्वी गावांचे पुनर्वसन करण्याची गरज होती; परंतु फौजफाटा लावून पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे परिसरातील दहा ते बारा गावांत पाणी शिरले आहे, असा आरोप खासदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे.

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडfloodपूरFarmerशेतकरी