शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

छातीपर्यंत पाण्यातून जीव वाचविण्यासाठी धावपळ; लेंडी धरणाच्या बॅकवॉटरमुळे मुखेडात हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:09 IST

झोपेत असलेल्या ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली, पाच

मुखेड (जि. नांदेड) : लेंडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. मुखेड तालुक्यातील हसनाळ गावात पुराच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या पाचपैकी तीन महिलांचे मृतदेह सायंकाळी हाती लागले. तर अद्यापही दोघींचा शोध लागू शकला नाही, गंगाबाई गंगाराम मादळे (वय ६०), भीमाबाई हिरामण मादळे (५५) यांचा मृतदेह सायंकाळी ४ वाजता आढळला. त्यानंतर तासाभराने ललिताबाई भोसले यांचा मृतदेह हसनाळ (प.मु.) येथून काढण्यात आला.

रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आंतरराज्यीय लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील रावणगाव, हासनाळ, भासवाडी आणि भिंगेली ही चार गावे पाण्याखाली गेली होती. नुकतेच घळभरणी झालेल्या लेंडीचे बॅकवॉटर या गावात घुसले होते. रात्री अंधारातच साखर झोपेत असलेल्या नागरिकांना जीव वाचविण्यासाठी छातीपर्यंतच्या पाण्यातून धावपळ करावी लागली.

सोमवारी दुपारपर्यंत बचाव पथकाने २०० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले होते. दिवसभर बचावकार्य सुरूच होते. पुरात कारमधील तीन महिला बेपत्ता झाल्या असून हासनाळ येथील पाच ते सात जणांचा अद्यापही संपर्क झाला नाही. बचाव कार्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून सैन्य दलाला पाचारण करण्यात आले होते.

लेंडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे दीड ते दोन वाजेच्या सुमारास बुडीत क्षेत्रातील रावणगाव, हासनाळ, भासवाडी आणि भिंगेली या चार गावांमध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली होती. झोपेत असलेल्या ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली. ग्रामस्थांनी अंधारातच उंच ठिकाणांकडे धाव घेतली, तर म्हाताऱ्या मंडळींना छातीपर्यंतच्या पाण्यातून युवकांनी बाहेर काढले; परंतु चालताही येत नसलेली काही म्हातारी मंडळी घरातच थांबली होती.

पहाटे चार वाजेपासून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते. जवळपास तीनशेहून अधिक जणांना दुपारपर्यंत बाहेर काढण्यात आले. अद्यापही शेकडो जण पाण्यात अडकून आहेत. त्यांच्या बचाव कार्यासाठी आता सैन्य दलाला पाचारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सोमवारीही नांदेड आणि लातूर जिल्ह्याला ऑरेंट अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तेलंगणाच्या प्रधान सचिवांशी संपर्क करून पोचमपाड धरणातून पाणी विसर्गावर चर्चा केली. सोमवारी दिवसभर पाऊस थांबला असला, तरी रात्रीच्या वेळी पावसाचा जोर वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

तीन महिला बेपत्ता, सात जणांशी संपर्कच नाही

दगीर येथील तीन महिला एका मुलासह करीमनगरकडे कारमधून जात होत्या. यावेळी रावी येथील नाल्याच्या पुरात कार आणि तीन महिला वाहून गेल्या; परंतु कारमधील मुलगा मात्र बचावला. या तिन्ही महिलांचा शोध सुरू आहे. हासनाळ येथील पुरात अडकलेल्या पाच ते सात जणांचाही अद्याप संपर्क झाला नव्हता. ही सर्व मंडळी वयोवृद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय काळजीत पडले आहेत. रात्रीच्या वेळी रावणगाव येथील राजू पाटील यांच्या वाड्यावर तब्बल ३०० नागरिकांनी आश्रय घेतला होता, तर कुणी मशीद, तर कुणी झाडावर चढून जीव वाचविला.

दोनशेहून अधिक पशुधन मृत्युमुखीमुखेड तालुक्यातील चार गावांतील शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी, बैल, असे दोनशेहून अधिक पशुधन या पुरात मृत्युमुखी पडले आहे. मुक्रमाबाद येथील बालाजी खंकरे या शेतकऱ्यांच्या तब्बल ४० म्हैस मरण पावल्या आहेत. त्यामुळे पशुपालकांवर मोठे संकट ओढावले आहे.

घळभरणीमुळे परिस्थिती ओढावलीपहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गावांमध्ये पाणी शिरले आहे. या पुरात हासनाळ येथील पाच ते सात जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. लेंडी धरणाची घळभरणी करण्यापूर्वी गावांचे पुनर्वसन करण्याची गरज होती; परंतु फौजफाटा लावून पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे परिसरातील दहा ते बारा गावांत पाणी शिरले आहे, असा आरोप खासदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे.

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडfloodपूरFarmerशेतकरी