शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

नांदेडमध्ये ३४ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर २३ विक्रेत्यांवर न्यायालयात खटले भरणार

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: August 8, 2024 19:51 IST

खरीप हंगामात कृषी विभागाची कारवाई, चार जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल

नांदेड : खरिप पेरण्याच्या तोंडावर बियाणे आणि खतांचा काळा बाजार ही नित्याचीच बाब झाली आहे. यावर्षी खरीप हंगामात कृषी विभागाने राबविलेल्या तपासणी मोहिमेत ३४ कृषी निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित केले आहेत, तर २३ कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर न्यायालयात खटले दाखल केले जाणार असून, चार जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मागील वर्षी जिल्ह्यातील काही कृषी केंद्रांमध्ये बोगस खते विक्रीचे अनेक प्रकार आढळले होते. काही ठिकाणी विशिष्ट कंपनीचे बियाणे विकत घ्यावे, यासाठी सक्तीही केल्या जात होती. यावर्षी असा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कृषी विभागाने तत्पर पावले उचलली आहेत. नियमानुसार जे कृषी केंद्र खते आणि बियांणांची विक्री करीत नसतील, अशावर कारवाई करण्याचे काम कृषी विभागाकडून करण्यात आले. पेरणीच्या वेळी गर्दीचा फायदा घेत अनेक विक्रेते निकृष्ट खते, बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना निपाकी आणि त्यानंतर वाढलेल्या कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या करण्याची वेळ येते. त्यासाठी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

खरीप हंगामात राज्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट असल्याचेदेखील बघायला मिळाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध करून देण्यासह बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे खरीप हंगामात कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली.

२६९४ खत, बियाणे नमुन्यांच्या तपासण्याजिल्ह्यात कृषी विभागाने खरीप हंगामात एकूण २६९४ विक्रेत्यांकडील बियाणे, खते व कीटकनाशकांच्या तपासण्या केल्या. ९४९ नमुने काढण्यात आले. त्यांपैकी १३ विक्रेत्यांना ताकीद देण्यात आली.

२१ विक्रेत्यांना दिले विक्री बंदचे आदेशकृषी विभागाने खरीप हंगामात कृषी केंद्रांची तपासणी करून त्रुटी आढळलेल्या २१ विक्रेत्यांना विक्री बंदचे आदेश दिले आहेत. ३४ परवाने निलंबित केले असून एका विक्रेत्याचा परवाना रद्द केला आहे. निलंबित केलेल्या परवान्यामध्ये बियाणे १७, रासायनिक खताचे १७ परवाने आहेत.

साडेदहा लाखांचा साठा केला जप्तखरीप हंगामात कृषी विभागाने केलेल्या कारवाईत एकूण १० लाख ५२ हजारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यात रासायनिक खताचा १० लाखांचा तर बियाणांचा ५२ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. खरीप हंगाम आला की, शेतकरी वर्गाकडून बी-बियाणे, रासायनिक खते घेण्यासाठी धावपळ सुरू असते. परंतु बहुतांश कृषी केंद्रांतून मागणी असलेले कपाशी वाण तुटवड्याचे कारण दाखवून जादा भावाने विकले जाते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी