शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये ३४ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर २३ विक्रेत्यांवर न्यायालयात खटले भरणार

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: August 8, 2024 19:51 IST

खरीप हंगामात कृषी विभागाची कारवाई, चार जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल

नांदेड : खरिप पेरण्याच्या तोंडावर बियाणे आणि खतांचा काळा बाजार ही नित्याचीच बाब झाली आहे. यावर्षी खरीप हंगामात कृषी विभागाने राबविलेल्या तपासणी मोहिमेत ३४ कृषी निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित केले आहेत, तर २३ कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर न्यायालयात खटले दाखल केले जाणार असून, चार जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मागील वर्षी जिल्ह्यातील काही कृषी केंद्रांमध्ये बोगस खते विक्रीचे अनेक प्रकार आढळले होते. काही ठिकाणी विशिष्ट कंपनीचे बियाणे विकत घ्यावे, यासाठी सक्तीही केल्या जात होती. यावर्षी असा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कृषी विभागाने तत्पर पावले उचलली आहेत. नियमानुसार जे कृषी केंद्र खते आणि बियांणांची विक्री करीत नसतील, अशावर कारवाई करण्याचे काम कृषी विभागाकडून करण्यात आले. पेरणीच्या वेळी गर्दीचा फायदा घेत अनेक विक्रेते निकृष्ट खते, बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना निपाकी आणि त्यानंतर वाढलेल्या कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या करण्याची वेळ येते. त्यासाठी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

खरीप हंगामात राज्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट असल्याचेदेखील बघायला मिळाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध करून देण्यासह बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे खरीप हंगामात कृषी विभागाकडून कारवाई करण्यात आली.

२६९४ खत, बियाणे नमुन्यांच्या तपासण्याजिल्ह्यात कृषी विभागाने खरीप हंगामात एकूण २६९४ विक्रेत्यांकडील बियाणे, खते व कीटकनाशकांच्या तपासण्या केल्या. ९४९ नमुने काढण्यात आले. त्यांपैकी १३ विक्रेत्यांना ताकीद देण्यात आली.

२१ विक्रेत्यांना दिले विक्री बंदचे आदेशकृषी विभागाने खरीप हंगामात कृषी केंद्रांची तपासणी करून त्रुटी आढळलेल्या २१ विक्रेत्यांना विक्री बंदचे आदेश दिले आहेत. ३४ परवाने निलंबित केले असून एका विक्रेत्याचा परवाना रद्द केला आहे. निलंबित केलेल्या परवान्यामध्ये बियाणे १७, रासायनिक खताचे १७ परवाने आहेत.

साडेदहा लाखांचा साठा केला जप्तखरीप हंगामात कृषी विभागाने केलेल्या कारवाईत एकूण १० लाख ५२ हजारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यात रासायनिक खताचा १० लाखांचा तर बियाणांचा ५२ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. खरीप हंगाम आला की, शेतकरी वर्गाकडून बी-बियाणे, रासायनिक खते घेण्यासाठी धावपळ सुरू असते. परंतु बहुतांश कृषी केंद्रांतून मागणी असलेले कपाशी वाण तुटवड्याचे कारण दाखवून जादा भावाने विकले जाते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी