शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 19:13 IST

सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हे संतांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात: अजित पवार

- मारोती चिलपिपरेकंधार (नांदेड) : मराठवाड्याची भूमी संघर्ष आणि शौर्याची भूमी आहे, आणि याच भूमीवर संतांची शिकवणही आहे. संघर्ष करून प्राप्त केलेली यशस्वी परंपरा आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे. संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी श्रीक्षेत्र उमरज येथे १०८ कुंडी विष्णूयाग महायज्ञ व श्री देवकीनंदनजी ठाकूर महाराज यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

अजित पवार पुढे म्हणाले, "मराठवाड्याला सहजासहजी काही मिळाले नाही, ते संघर्ष करून मिळवले आहे. त्याच इतिहासाला आजही आपण सन्मान देत आहोत. संत परंपरेचा विचार करत असताना, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आणि संत एकनाथ यांच्या शिकवणीचे महत्त्व स्पष्ट होते. त्यांनी प्रेम, समता, बंधुत्व यावर आधारित जीवनशैली दिली." तसेच, महाराष्ट्रातील सर्वधर्मसमभावाच्या शिकवणीवर बोलताना ते म्हणाले की, "इथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, जैन सर्वधर्म एकत्र राहतात. माणुसकी हाच धर्म आहे. जातीधर्माच्या सीमापार करत संतांनी मानवतेचा संदेश दिला. सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हे संतांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात," असे ते म्हणाले. 

श्रीक्षेत्र उमरज येथील धाकटे पंढरपूर श्री संत नामदेव महाराज संस्थानाच्या पवित्र भूमीवर आयोजित या कार्यक्रमामध्ये राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत संस्थानाचे महंत श्री एकनाथ महाराज यांनी संस्थानाच्या समाज उपयोगी कार्याची माहिती दिली. तसेच संस्थानला जोडणाऱ्या काही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मागणी करण्यात आली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNandedनांदेड