शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

देशातील परिवर्तनाचे नेतृत्व महाराष्ट्राकडे; महिनाभरात ४५ हजार गावांत जाणार बीआरएस: केसीआर

By शिवराज बिचेवार | Updated: May 19, 2023 16:06 IST

शेतकऱ्याचे राज्य आणण्यासाठी महिनाभरात महाराष्ट्रातील ४५ हजार गावात जाणार बीआरएस

नांदेड- भारत हा बुद्धीजीविंचा देश आहे. ज्यांनी कुणी जनविरोधी काम केले त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली असून हा इतिहास आहे. त्यातही महाराष्ट्र हे तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची भूमी आहे. त्यामुळे देशातील परिवर्तनाचे नेतृत्व आता महाराष्ट्राकडे आले असून ही संधी दवडू नका असे आवाहन भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी केले आहे. 

नांदेडात आयोजित २८८ विधानसभा मतदार संघातील प्रमुखांच्या प्रशिक्षण शिबीराचे शुक्रवारी मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केसीआर म्हणाले, आजही देशात वीज, पाणी मिळत नाही. शेतकर्यांना आपला हक्क मिळत नाही. त्यामुळे या देशात आजपर्यंत शेतकर्यांनी अनेक लढे दिले आहेत. परंतु हे कुठपर्यंत चालणार आहे. तेलंगणा निर्मितीपूर्वी त्या राज्याची वाईट अवस्था होती. परंतु बीआरएस आल्यानंतर अवघ्या नऊ वर्षात तेलंगणाचा कायापालट करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि देशातही हे हाेवू शकते. परंतु त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. देशात सर्वाधिक काळ काँग्रेस आणि भाजपाने राज्य केले. परंतु शेतकर्यांचे प्रश्न सुटले नाहीत. निवडणुका आल्या की जाती-पातीचे राजकारण करुन सत्ता मिळविण्यात येते. त्यामुळे आता केवळ त्यांना सत्ता देवून भागणार नाही, तर सर्वसामान्य, शेतकर्यांना सभागृहात जावून बसावे लागेल. त्यासाठी बीआरएस हा एकमेव पर्याय आहे. गेल्या ७५ वर्षापासून जे देशात सुरु आहे ते बदलण्याची वेळ आली आहे. असेही केसीआर म्हणाले. यावेळी राज्यभरातील विधानसभा प्रमुख उपस्थित होते.

दर दिवशी पाच गावांना भेटीआगामी काळात राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील ४५ हजार गावे आणि ५ हजार नगरपालिका, महानगर पालिका क्षेत्रात बीआरएसचे कार्यकर्ते २२ मे ते२२ जून असे महिनाभर घरोघरी फिरतील. प्रत्येक दिवशी किमान पाच गावात जातील. प्रत्येक गावात ते वेगवेगळ्या घटकातील ९ समित्या स्थापन करतील. पुढील महिनाभरात महाराष्ट्रातील प्रत्येक गावात बीआरएस पक्षाचे नाव आणि झेंडा पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, आपले म्हणणे लोकापर्यंत पोहचवा असे आवाहनही केसीआर यांनी केले.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandedनांदेडMaharashtraमहाराष्ट्र