शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देशातील परिवर्तनाचे नेतृत्व महाराष्ट्राकडे; महिनाभरात ४५ हजार गावांत जाणार बीआरएस: केसीआर

By शिवराज बिचेवार | Updated: May 19, 2023 16:06 IST

शेतकऱ्याचे राज्य आणण्यासाठी महिनाभरात महाराष्ट्रातील ४५ हजार गावात जाणार बीआरएस

नांदेड- भारत हा बुद्धीजीविंचा देश आहे. ज्यांनी कुणी जनविरोधी काम केले त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली असून हा इतिहास आहे. त्यातही महाराष्ट्र हे तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची भूमी आहे. त्यामुळे देशातील परिवर्तनाचे नेतृत्व आता महाराष्ट्राकडे आले असून ही संधी दवडू नका असे आवाहन भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी केले आहे. 

नांदेडात आयोजित २८८ विधानसभा मतदार संघातील प्रमुखांच्या प्रशिक्षण शिबीराचे शुक्रवारी मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केसीआर म्हणाले, आजही देशात वीज, पाणी मिळत नाही. शेतकर्यांना आपला हक्क मिळत नाही. त्यामुळे या देशात आजपर्यंत शेतकर्यांनी अनेक लढे दिले आहेत. परंतु हे कुठपर्यंत चालणार आहे. तेलंगणा निर्मितीपूर्वी त्या राज्याची वाईट अवस्था होती. परंतु बीआरएस आल्यानंतर अवघ्या नऊ वर्षात तेलंगणाचा कायापालट करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि देशातही हे हाेवू शकते. परंतु त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. देशात सर्वाधिक काळ काँग्रेस आणि भाजपाने राज्य केले. परंतु शेतकर्यांचे प्रश्न सुटले नाहीत. निवडणुका आल्या की जाती-पातीचे राजकारण करुन सत्ता मिळविण्यात येते. त्यामुळे आता केवळ त्यांना सत्ता देवून भागणार नाही, तर सर्वसामान्य, शेतकर्यांना सभागृहात जावून बसावे लागेल. त्यासाठी बीआरएस हा एकमेव पर्याय आहे. गेल्या ७५ वर्षापासून जे देशात सुरु आहे ते बदलण्याची वेळ आली आहे. असेही केसीआर म्हणाले. यावेळी राज्यभरातील विधानसभा प्रमुख उपस्थित होते.

दर दिवशी पाच गावांना भेटीआगामी काळात राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील ४५ हजार गावे आणि ५ हजार नगरपालिका, महानगर पालिका क्षेत्रात बीआरएसचे कार्यकर्ते २२ मे ते२२ जून असे महिनाभर घरोघरी फिरतील. प्रत्येक दिवशी किमान पाच गावात जातील. प्रत्येक गावात ते वेगवेगळ्या घटकातील ९ समित्या स्थापन करतील. पुढील महिनाभरात महाराष्ट्रातील प्रत्येक गावात बीआरएस पक्षाचे नाव आणि झेंडा पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, आपले म्हणणे लोकापर्यंत पोहचवा असे आवाहनही केसीआर यांनी केले.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandedनांदेडMaharashtraमहाराष्ट्र