शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

देशातील परिवर्तनाचे नेतृत्व महाराष्ट्राकडे; महिनाभरात ४५ हजार गावांत जाणार बीआरएस: केसीआर

By शिवराज बिचेवार | Updated: May 19, 2023 16:06 IST

शेतकऱ्याचे राज्य आणण्यासाठी महिनाभरात महाराष्ट्रातील ४५ हजार गावात जाणार बीआरएस

नांदेड- भारत हा बुद्धीजीविंचा देश आहे. ज्यांनी कुणी जनविरोधी काम केले त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली असून हा इतिहास आहे. त्यातही महाराष्ट्र हे तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची भूमी आहे. त्यामुळे देशातील परिवर्तनाचे नेतृत्व आता महाराष्ट्राकडे आले असून ही संधी दवडू नका असे आवाहन भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी केले आहे. 

नांदेडात आयोजित २८८ विधानसभा मतदार संघातील प्रमुखांच्या प्रशिक्षण शिबीराचे शुक्रवारी मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केसीआर म्हणाले, आजही देशात वीज, पाणी मिळत नाही. शेतकर्यांना आपला हक्क मिळत नाही. त्यामुळे या देशात आजपर्यंत शेतकर्यांनी अनेक लढे दिले आहेत. परंतु हे कुठपर्यंत चालणार आहे. तेलंगणा निर्मितीपूर्वी त्या राज्याची वाईट अवस्था होती. परंतु बीआरएस आल्यानंतर अवघ्या नऊ वर्षात तेलंगणाचा कायापालट करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि देशातही हे हाेवू शकते. परंतु त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. देशात सर्वाधिक काळ काँग्रेस आणि भाजपाने राज्य केले. परंतु शेतकर्यांचे प्रश्न सुटले नाहीत. निवडणुका आल्या की जाती-पातीचे राजकारण करुन सत्ता मिळविण्यात येते. त्यामुळे आता केवळ त्यांना सत्ता देवून भागणार नाही, तर सर्वसामान्य, शेतकर्यांना सभागृहात जावून बसावे लागेल. त्यासाठी बीआरएस हा एकमेव पर्याय आहे. गेल्या ७५ वर्षापासून जे देशात सुरु आहे ते बदलण्याची वेळ आली आहे. असेही केसीआर म्हणाले. यावेळी राज्यभरातील विधानसभा प्रमुख उपस्थित होते.

दर दिवशी पाच गावांना भेटीआगामी काळात राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील ४५ हजार गावे आणि ५ हजार नगरपालिका, महानगर पालिका क्षेत्रात बीआरएसचे कार्यकर्ते २२ मे ते२२ जून असे महिनाभर घरोघरी फिरतील. प्रत्येक दिवशी किमान पाच गावात जातील. प्रत्येक गावात ते वेगवेगळ्या घटकातील ९ समित्या स्थापन करतील. पुढील महिनाभरात महाराष्ट्रातील प्रत्येक गावात बीआरएस पक्षाचे नाव आणि झेंडा पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, आपले म्हणणे लोकापर्यंत पोहचवा असे आवाहनही केसीआर यांनी केले.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावNandedनांदेडMaharashtraमहाराष्ट्र