शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तीन वर्षांपासून तूर खरेदीपोटीचा वाहतूक, हमाली खर्च मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:12 IST

या खरेदीपोटी वाहतूक, हमाली कमिशन आजपर्यंत शासनाकडून प्राप्त न झाल्याने यावर्षी संस्था खरेदी करण्यास असमर्थ

- सोमनाथ लाहोरकर

हदगाव (नांदेड ) :  तीन वर्षांपासून शासकीय खरेदी योजने अंतर्गत हदगाव येथील खरेदी-विक्री संघाने तूर, चणा, सोयाबीनची खरेदी केली होती़ या खरेदीपोटी वाहतूक, हमाली कमिशन आजपर्यंत शासनाकडून प्राप्त न झाल्याने यावर्षी संस्था खरेदी करण्यास असमर्थ असल्याचे खरेदी- विक्री संघ हदगावचे संचालक प्रभाकर पत्तेवार यांनी ‘लोकमत’ ला सांगितले़

सन २०१६-१७ मध्ये हदगाव तालुक्यात उशिरा का होईना खरेदी- विक्री संघाच्या माध्यमातून तूर खरेदीस सुरुवात झाली आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनीदेखील चांगला प्रतिसाद देत २५ हजार क्विंटल तूर खरेदी- विक्री संघाच्या माध्यमातून शासनास दिली़ तर सोयाबीन ४६ हजार क्विंटल, सन २०१७-१८ या काळात १३ हजार क्विंटल तूर तर सहा हजार क्विंटल चना असा एकूण ५० हजार क्विंटल माल खरेदी- विक्री संघाने घेतला़ या मालाच्या वाहतूक, हमाली कमिशनपोटी खरेदी- विक्री संघाचे ६३ लाख रुपये येणे होते़ 

यापैकी ३० लाख रुपये प्राप्त झाले असून यात वाहतूक, हमाली यांच्यापर्यंत करण्यात आली असून राहिलेल्या ३३ लाखांपैकी शेतकऱ्यांची अनामत रक्कम १६ लाख रुपये देणे बाकी असून १७ लाख रुपयांत खरेदी- विक्री संघाने उभारलेला निधी व एकत्रित     कर्मचारी पगार अशा स्वरुपाचे येणे बाकी असल्याचे पत्तेवार यांनी सांगितले. याविषयी खरेदी- विक्री संघाने या शिल्लक असलेल्या खातेसंदर्भात वेळोवेळी नाफेड, जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला असून आजपावेतो कोणत्याही प्रकारे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आ़ नागेश पाटील आष्टीकर यांच्या माध्यमातून राज्याचे सहकारमंत्री यांच्यापुढे हा विषय ठेवला असल्याचेही पत्तेवार यांनी सांगितले़

रामराव तावडे या शेतकऱ्याचे ४६ हजार २२५ रुपये आजपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे़ त्यांनी ३ मे २०१८ रोजी खरेदी-विक्री संघ यांच्यामार्फत ८ क्विंटल ५० किलो तूर मोजमाप करून दिली़ या तुरीचे ४६ हजार २२५ रुपये आजपर्यंत त्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत. याविषयी मागील अनेक दिवसांपासून जिल्हा मार्केटिंग अधिकारी नांदेड व मुंबई येथील कार्यालयास पत्रव्यवहारही केला असून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत राहिलेली ३३ लाख रुपयांची रक्कम खरेदी-विक्री संघास अदा न केल्यास यावर्षी खरेदीसंदर्भात असमर्थ असल्याचे पत्तेवार म्हणाले. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होणार आहे़ बाजारभावात आणि शासनाच्या हमीभावात १ हजार ते १५०० रुपयांची तफावत असल्याने शेतकऱ्यांचा कल हा शासन खरेदीकडे असतो; पण आजपर्यंत शेतकऱ्यांची अनामत रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांतदेखील याविषयी असंतोष आहे़ 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डNandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसाState Governmentराज्य सरकार