शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

तीन वर्षांपासून तूर खरेदीपोटीचा वाहतूक, हमाली खर्च मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:12 IST

या खरेदीपोटी वाहतूक, हमाली कमिशन आजपर्यंत शासनाकडून प्राप्त न झाल्याने यावर्षी संस्था खरेदी करण्यास असमर्थ

- सोमनाथ लाहोरकर

हदगाव (नांदेड ) :  तीन वर्षांपासून शासकीय खरेदी योजने अंतर्गत हदगाव येथील खरेदी-विक्री संघाने तूर, चणा, सोयाबीनची खरेदी केली होती़ या खरेदीपोटी वाहतूक, हमाली कमिशन आजपर्यंत शासनाकडून प्राप्त न झाल्याने यावर्षी संस्था खरेदी करण्यास असमर्थ असल्याचे खरेदी- विक्री संघ हदगावचे संचालक प्रभाकर पत्तेवार यांनी ‘लोकमत’ ला सांगितले़

सन २०१६-१७ मध्ये हदगाव तालुक्यात उशिरा का होईना खरेदी- विक्री संघाच्या माध्यमातून तूर खरेदीस सुरुवात झाली आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनीदेखील चांगला प्रतिसाद देत २५ हजार क्विंटल तूर खरेदी- विक्री संघाच्या माध्यमातून शासनास दिली़ तर सोयाबीन ४६ हजार क्विंटल, सन २०१७-१८ या काळात १३ हजार क्विंटल तूर तर सहा हजार क्विंटल चना असा एकूण ५० हजार क्विंटल माल खरेदी- विक्री संघाने घेतला़ या मालाच्या वाहतूक, हमाली कमिशनपोटी खरेदी- विक्री संघाचे ६३ लाख रुपये येणे होते़ 

यापैकी ३० लाख रुपये प्राप्त झाले असून यात वाहतूक, हमाली यांच्यापर्यंत करण्यात आली असून राहिलेल्या ३३ लाखांपैकी शेतकऱ्यांची अनामत रक्कम १६ लाख रुपये देणे बाकी असून १७ लाख रुपयांत खरेदी- विक्री संघाने उभारलेला निधी व एकत्रित     कर्मचारी पगार अशा स्वरुपाचे येणे बाकी असल्याचे पत्तेवार यांनी सांगितले. याविषयी खरेदी- विक्री संघाने या शिल्लक असलेल्या खातेसंदर्भात वेळोवेळी नाफेड, जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला असून आजपावेतो कोणत्याही प्रकारे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आ़ नागेश पाटील आष्टीकर यांच्या माध्यमातून राज्याचे सहकारमंत्री यांच्यापुढे हा विषय ठेवला असल्याचेही पत्तेवार यांनी सांगितले़

रामराव तावडे या शेतकऱ्याचे ४६ हजार २२५ रुपये आजपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे़ त्यांनी ३ मे २०१८ रोजी खरेदी-विक्री संघ यांच्यामार्फत ८ क्विंटल ५० किलो तूर मोजमाप करून दिली़ या तुरीचे ४६ हजार २२५ रुपये आजपर्यंत त्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत. याविषयी मागील अनेक दिवसांपासून जिल्हा मार्केटिंग अधिकारी नांदेड व मुंबई येथील कार्यालयास पत्रव्यवहारही केला असून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत राहिलेली ३३ लाख रुपयांची रक्कम खरेदी-विक्री संघास अदा न केल्यास यावर्षी खरेदीसंदर्भात असमर्थ असल्याचे पत्तेवार म्हणाले. या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होणार आहे़ बाजारभावात आणि शासनाच्या हमीभावात १ हजार ते १५०० रुपयांची तफावत असल्याने शेतकऱ्यांचा कल हा शासन खरेदीकडे असतो; पण आजपर्यंत शेतकऱ्यांची अनामत रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांतदेखील याविषयी असंतोष आहे़ 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डNandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसाState Governmentराज्य सरकार