जात प्रमाणपत्रासाठी ‘सामाजिक न्याय’मध्ये उमेदवारांची मोठी रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST2020-12-29T04:15:40+5:302020-12-29T04:15:40+5:30
जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही ऑनलाईन झाली आहे. या प्रक्रियेत अर्जदाराने ऑनलाईन अर्जातील सर्व आवश्यक माहिती ...

जात प्रमाणपत्रासाठी ‘सामाजिक न्याय’मध्ये उमेदवारांची मोठी रांग
जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही ऑनलाईन झाली आहे. या प्रक्रियेत अर्जदाराने ऑनलाईन अर्जातील सर्व आवश्यक माहिती भरून तसेच आवश्यक सर्व दस्तावेज स्कॅन करून अपलोड करणे व त्यानंतर ऑनलाइईन शुल्क भरून ऑनलाइईन भरलेला अर्ज, ऑनलाइईन पैसे भरल्याची पावती व सोबत सर्व मूळ दस्तावेज व त्याच्या छायांकित प्रतीसह समिती कार्यालयात कार्यालयीन वेळेत विहित मुदतीत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायती निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून जात पडताळणी कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. दररोज साधारणपणे १ हजार प्रस्ताव दाखल होत आहेत. १६ डिसेंबरपासून प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सूरू झाली असून जात पडताळणी कार्यालयाच्या प्रांगणात उमेदवारांची एकच गर्दी दिसून येत आहे.व होताहेत दाखल.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्रासाठी चार खिडक्या स्थापन केल्या असून यामध्ये एका खिडकीद्वारे विद्यार्थ्यांचे प्रस्ताव स्वीकारले जात आहेत. १६ डिसेंबरपासून प्रस्ताव दाखल करण्यात असून दररोज ८००, ९०० प्रस्ताव दाखल होत आहेत. सध्या सर्व दाखल प्रस्तावांची छाननी करण्यात येत असून पुरूष व महिला अशी वर्गवारी केली जात आहे. - ए.एम. झंपलवार, कनिष्ठ लिपीक.
प्रशासनातर्फे दक्षता
समाज कल्याण विभागाअंतर्गत जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी होणारी गर्दी लक्षात घेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सॅनीटायझरची व्यवस्था केली असून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. प्रस्ताव दाखल करण्यासाठी प्रांगणात रांग लावली जात आहे.
रोज १००० अर्ज
१६ डिसेंबरपासून प्रस्ताव दाखल होत असून या दिवसी ४, १७ रोजी२२, १८ रोजी ५१, २१ रोजी १९३, २२ रोजी ४५२, २३ रोजी ७१०, २४ रोजी १०७९, २५ रोजी ६९३, २६ रोजी९४३, २७ रोजी १००० असे प्रस्ताव दाखल झाले आहेत.
उमेदवार
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षीत जागेवर उभा राहण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्याने सर्व प्रथम ऑनलाइईन प्रस्ताव दाखल करून त्याची प्रिंट व सर्व कागदपत्रे सोबत जाेडून प्रस्ताव दाखल केला आहे. यासाठी सकाळी लवकर येवून रांगेत उभे राहून प्रस्ताव दाखल केला. - गंगाधर साळवे.
विद्यार्थी
बारावी सायन्सचे विद्यार्थ्यांनी सध्या जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी कार्यालयात गर्दी केली असून दररोज २०० हून अधिक प्रस्ताव होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे होणारी गर्दी लक्षात घेवून प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र खिडकी स्थापन केली आहे. परिपूर्ण प्रस्ताव अर्जाचे प्रमाणपत्र महिनाभरात मिळत आहेत.