शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

पुराच्या पाण्याने लख्खा, तूपशेळगाव गावांचा संपर्क तुटला; पावसाळ्यात संपर्क तुटणे नित्याचेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 18:35 IST

मागील दोन दिवसापासून देगलूर तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे.

- शेख शब्बीरदेगलूर: पुलाचे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडल्याने पुरात रस्ता पाण्याखाली जाऊन आज सकाळपासून लख्खा व तूपशेळगाव या गावांचा संपर्क तुटला. मागील अनेक वर्षांपासून पावसाळ्यात गावचा संपर्क तुटून मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.

मागील दोन दिवसापासून देगलूर तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. लख्खा या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दोन पूलाचे बांधकाम अनेक वर्षापासून रखडले आहे. जोरदार पाऊस झाल्याने दोन्ही पुलावरून पुराचे पाणी वाहते आहे. यामुळे गुरुवारी सकाळपासून लख्खा आणि तूपशेळगाव या गावांचा संपर्क तुटला. दुपारनंतर तुपशेळगाव येथील पुराचे पाणी ओसरल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली असल्याचे देगलूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी सांगितले आहे. 

पावसाळ्यात संपर्क तुटणे नित्याचेच १९८३ च्या महापुरानंतर पुनर्वसन करण्यात आलेल्या लख्खा गावाची लोकसंख्या जवळपास १५०० च्या आसपास आहे. या गावाला जोडणाऱ्या दोन पूलांचे काम मागील अनेक वर्षापासून रखडले आहे. त्यामुळे  पावसाळ्यात  खानापूर, सुगाव, इब्राहिमपूर या शिवारातील पाणी येऊन या पुलावरून वाहते.त्यामुळे पूर स्थिती निर्माण होऊन लख्खा गावाचा संपर्क तुटणे ही नित्याचीच बाब बनली आहे.  त्यामुळे गावकऱ्यांना गावातून बाहेर पडणे कठीण होते. एखाद्या वेळेस गावातील नागरिकांना आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्यास मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते.  गावातील जवळपास ३०० मुले शिक्षणासाठी वन्नाळी, देगलूर या ठिकाणी जातात तर गावातील काही नागरिकांना रोजगारानिमित्त देगलूरला यावे लागते मात्र येथील दोन पुलाला पाणी आले की पालकांचा जीव टांगणीला लागतो. प्रसंगी मुलांना वन्नाळी येथील गुरुद्वारात मुक्कामी थांबवावे लागते .

गिरीश महाजन यांच्या आश्वासनास वर्ष लोटलेविशेष म्हणजे जुलै 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी तालुक्यातील लख्खा, वन्नाळी,व सुगाव परिसराला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली होती. परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत लख्खा येथील दोन पूलांचा प्रश्न येत्या सहा महिन्यात निकाली काढू असे आश्वासनही महाजन यांनी दिले होते. या आश्वासनाला वर्ष होत आले मात्र परिस्थिती जैसे थे च असल्याने गावकऱ्यांना मात्र मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेड