शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

किनवट तालुक्यात ९६ गावांना गारपिटीचा जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:20 AM

तालुक्यात १२ फेब्रुवारीच्या सायंकाळी वादळीवाºयासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यात ९६ गावांतील रबीच्या ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रातील गहू, हरभरा, मका व रबी ज्वारीसह फळे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील सात मंडळांतील २४ तलाठी सज्जांतील ९६ गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. यात एकूण ६ हजार २३४ हेक्टर रबीचे क्षेत्र असताना त्यातील ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्राला नुकसानीचा फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात १२ फेब्रुवारीच्या सायंकाळी वादळीवा-यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यात ९६ गावांतील रबीच्या ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्रातील गहू, हरभरा, मका व रबी ज्वारीसह फळे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले.तालुक्यातील सात मंडळांतील २४ तलाठी सज्जांतील ९६ गावांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. यात एकूण ६ हजार २३४ हेक्टर रबीचे क्षेत्र असताना त्यातील ३ हजार ७७४ हेक्टर क्षेत्राला नुकसानीचा फटका बसला. गारपीटग्रस्त गावांची नावे अशी-दहेली, धावजीनाईक तांडा, निराळा, निराळा तांडा, दुंड्रा, सारखणी, जुनोनी (बे), खंबाळा, बोथ, परसरामना तांडा, हातोळा (बे), पार्डी (सी), सक्रूनाईक तांडा, उमरी (बा), टिटवी, चिंचखेड, गौरी, धानोरा (सी), रामपूर, पाथरी, चापलाना तांडा, टेंभी तांडा, मांडवी, नागापूर, सिरपूर, कोठारी (सी), डोंगरगाव, जरुर, कनकी, मिनकी, पिंपळगा (भि), पळशी, पाटोदा (बु), भिलगाव, जवरला, रायपूर तांडा, दगडवझरा (बे), उनकदेव, पिंपळशेंडा, लिंगी, रामजीना तांडा, वझरा (बु), गोकुंदा, मारेगाव (खा), घोटी, कमठाला, खेर्डा, मलकापूर, गणेशपूर, लोणी, बोधडी (बु), कारला, बोधडी (खु), चिखली (बु), चिखली (खु), हुडी (बे), बुधवारपेठ, बेंदी, आमडी, दाभाडी, दरसांगवी (चि), प्रधानसांगवी (चि), बेंदी तांडा, आंदबोरी (चि), दहेगाव, मलकवाडी, पोतरेड्डी, पाडी (खु), पार्डी (बे), येंदा, पेंदा, कोठारी (चि), शनिवारपेठ, भुलजा, मदनापूर, सिंगारवाडी, पिंपरफोडी, सुंगागुडा, पाटोदा (खु), सिंदगी, इंजेगाव, देवला तांडा, सालाईगुडा, कोसमेट, कोल्हारी, भिसी, हुडी, मुळझरा, परोटी, वाळकी (बु), रोडानाईक तांडा, परोटी तांडा, बुरकुलवाडी, इरेगाव, पांगरी या ९६ गावांचा समावेश आहे.गहू (एकूण क्षेत्र- १६१० हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१११५ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी ६९ टक्के), रबी ज्वारी (एकूण क्षेत्र- ९६४ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-६६० हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-६८ टक्के), मका (एकूण क्षेत्र- ३३१ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-२०७ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-६२ टक्के), हरभरा (एकूण क्षेत्र-३०८६ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१६३४ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-५२ टक्के), टरबूज (एकूण क्षेत्र-२५ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-२६ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-९६ टक्के), केळी (एकूण क्षेत्र-१० हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१० हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-१०० टक्के), भाजीपाला (एकूण क्षेत्र-२०८ हेक्टर, नुकसान झालेले क्षेत्र-१२२ हेक्टर, नुकसानीची टक्केवारी-५८ टक्के).पंचनाम्याचा अहवाल दोन दिवसांत द्याकंधार : तालुक्यात अनेक गावांत अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती पिकांचे अन् फळपिकांचे मोठे नुकसान झाले़ अशा नुकसान झालेल्या क्षेत्राचे संयुक्त पंचनामे ग्रामस्तरीय समितीने करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. पत्रानुसार अ,ब,क,ड अशा प्रपत्रात अहवाल द्यायचा आहे. त्यात ३३ ते ५० टक्के, ५० टक्क्यांपेक्षा जास्त अशा भागात अहवाल द्यायचा असून, तो दोन दिवसांत देण्यात यावा, असेही नमूद करण्यात आले आहे.गारपीटग्रस्त भागाची पाहणीफुलवळ/माळाकोळी : फुलवळ, माळाकोळी परिसरातील गारपीटग्रस्त गावांना आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेटी देवून शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रबोधन मुळे, नायब तहसीलदार सारंग चव्हाण, कृषी अधिकारी गायकवाड, विश्वांभर मंगनाळे, मंडळ अधिकारी शिवदास पटणे, कृषी पर्यवेक्षक किर्तीवाड, तलाठी कविता इंगळे, कृषी सहाय्यक कल्पना जाधव, प्रा. किशनराव डफडे, बालाजी तोटवाड, सरपंच रमेश मोरे, विश्वांभर बसवंते, ग्रामसेवक प्रकाश जाधव, गोविंद मोरे, सुधाकर मोरे उपस्थित होते. पानशेवडी येथील शेतकरी रमेश संभाजी मोरे, नामदेव माधव मोरे, कौशाबाई पांडुरंग मोरे, व्यंकट प्रभाकर मोरे, तुकाराम मोरे, पद्मिनबाई बाबाराव मोरे यांच्यासह ६५ ते ७० शेतकºयांचे नुकसान झाले.माळाकोळी परिसरातील माळेगाव, डोंगरगाव, चोंडी, मजरेसांगवी, घोटका, आष्टूर, रिसनगाव, लव्हराळ, रामतीर्थ, नगारवाडी आदी गावांना आ. चिखलीकरांनी भेटी दिल्या. यावेळी जि.प. सदस्य चंद्रसेन पाटील, पं.स.सदस्य बालाजी राठोड, पं. स.सदस्य जनार्धन तिडके, माळेगावचे सरपंच गोविंदराव राठोड, आंबादास जहागीरदार, परमेश्वर मुरकुटे, माजी सरपंच केरबा धुळगुंडे उपस्थित होते.