शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

प्रतापराव चिखलीकरांविरुद्ध खतगावकरांचे बंडाचे निशाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:34 IST

लोकसभा निवडणूक निकाल लागून अद्याप महिनाही झालेला नसतानाच भाजपामध्ये गटबाजी उफाळून आली आहे. माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पत्र लिहिले आहे.

नांदेड : लोकसभा निवडणूक निकाल लागून अद्याप महिनाही झालेला नसतानाच भाजपामध्ये गटबाजी उफाळून आली आहे. माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पत्र लिहिले आहे. खा. चिखलीकर हे जाणीवपूर्वक स्वत:च्या ताकदीवर निवडून आल्याचा आव आणीत असल्याचा आरोप करीत पदाधिकाऱ्यांवरही आकसबुद्धीने अन्याय करत असल्याची तक्रार केली आहे. संघटनात्मक बदल आवश्यक असल्यास जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन करावेत अन्यथा पदाचा त्याग करण्याची तयारी असल्याचे खतगावकर यांनी या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.लोकसभा निवडणूक निकाल लागल्यापासून खा. प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्यात धूसफूस सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी खतगावकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच आपली कैफियत मांडली आहे. जागतिक योग दिनानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: शुक्रवारी नांदेडमध्ये आहेत. त्यांनी येण्याच्या पूर्वसंध्येलाच पक्षातील दोन मातब्बर नेत्यांतील ही धूसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.खतगावकर यांनी या पत्रात नमूद केले आहे की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करीत राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत कुठलीही अट न ठेवता भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी अशोकराव चव्हाण यांचे जिल्ह्यातील साम्राज्य खालसा करण्याचा माझा निर्धार होता. माझ्याबरोबर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मंडळी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, माजी आ. अविनाश घाटे, कै. गोविंदराव राठोड, ओमप्रकाश पोकर्णा, भगवानराव आलेगावकर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी महापौर अजय बिसेन, माजी जि.प. अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, खुशाल पाटील उमरदरीकर व बालाजी पाटील अंबुलगेकर यांच्यासह सभापती गणेशराव पाटील करखेलीकर आदी प्रमुख नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश घडवून आणला. मागील पाच वर्षांपासून पक्षावर निष्ठा ठेवून कार्यरत राहिलो. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुका जिद्दीने एकसंघ राहून लढल्या. यामुळेच यातील कुंडलवाडी, मुखेड नगरपालिका, मुखेड, देगलूर, धर्माबाद बाजार समिती आणि बिलोली पंचायत समितीत भाजपचा झेंंडा फडकला.मात्र प्रताप पाटील चिखलीकर हे २०१४ मध्ये माझ्याबरोबर मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपा श्रेष्ठींना माझ्या साक्षीने पक्षप्रवेशाचा शब्द दिला होता. मात्र त्यानंतर भाजपावर अविश्वास दाखवून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची आठवण खतगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पत्राद्वारे करुन दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ऐन दौºयाच्या तोंडावर भाजपातील ही खदखद बाहेर आल्याने पक्षाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.तर विधानसभेत भाजपाला नाराजी भोवेलखतगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी चिखलीकर यांचा मित्रमंडळीलाच संघटनेची प्रमुख पदे मिळावीत, असा अट्टहास दिसतो. विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाचे वाटपदेखील मीच करणार, असे सांगत चिखलीकर हे इच्छुकांना आपल्या मागे-पुढे झुलवत ठेवण्याचे धोरण अवलंबित असल्याचा आरोप खतगावकर यांनी केला आहे. या वृत्तीला वेळीच आवर न घातल्यास भाजपातील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची नाराजी आगामी विधानसभा निवडणुकीत जाणवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही खतगावकर यांनी दिला आहे.शेवटपर्यंत भाजपामध्येच राहणार-खतगावकरमाजी खा. खतगावकर यांनी या पत्रात नांदेड जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाºयांच्या हितासाठी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा त्याग करण्याची तयारीही दाखविली आहे. महानगराध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे यांचा राजीनामा घेऊन माझ्या विचाराचा महानगराध्यक्ष करणार असल्याचे खा. चिखलीकर सांगत आहेत. ते पक्षश्रेष्ठीच्या दृष्टीने योग्य नाही. संघटनात्मक बदलाचे काही निर्णय घेणे श्रेष्ठींना आवश्यक वाटल्यास जिल्ह्यातील प्रमुख कोअर ग्रुपला विश्वासात घेऊन याबाबत निर्णय घ्यावा, असे नमूद करीत मी स्वत: शेवटपर्यंत भाजपामध्येच राहणार असल्याचे स्पष्ट करीत स्वत:च्या व्यक्तिगत स्वार्थासाठी इतर पदाधिकाºयांचा बळी देणे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही खतगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

टॅग्स :NandedनांदेडBJPभाजपा