शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
5
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
6
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
7
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
8
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
9
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
10
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
11
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
12
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
13
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
14
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
15
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
16
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
17
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
19
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
20
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री

मानार धरण गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:55 IST

बारूळ : मागील ५३ वर्षांत मानार प्रकल्पातील फक्त २ लाख ५ हजार ९१२ घनमीटर गाळ काढण्यात प्रशासनाला यश आले ...

ठळक मुद्देमानार प्रकल्प : मागील ५३ वर्षांत फक्त २ लाख घनमीटर गाळ काढला

बारूळ : मागील ५३ वर्षांत मानार प्रकल्पातील फक्त २ लाख ५ हजार ९१२ घनमीटर गाळ काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रकल्पात अजूनही लाखो घनमीटरच्यावर गाळ असल्याने हा प्रकल्प गाळात रुतल्याचे चित्र आहे़बारूळ येथील मानार प्रकल्प कै़ शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने १९६२ साली झाला़ या प्रकल्पाचा फायदा कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद तालुक्यांतील शेतकरी, नागरिक, जनावरांना पिण्यासाठी व सिंचनासाठी झाला़ प्रकल्पामुळे २४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून त्यामुळे शेतकरी, नागरिक सधन झाले़मानार प्रकल्पाला ५३ वर्षे झाली़ या वर्षात लाखो घनमीटरवर गाळ या प्रकल्पात आला़ पण प्रकल्पातील गाळउपसा अत्यंत कमी प्रमाणात झाला़ या प्रकल्पातील गाळ उपसा करण्यासाठी प्रशासनाला अपयश आले़ याचे कारण म्हणजे ढिसाळ नियोजऩ गाळ काढण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली नाही़गाळ काढण्याची सुरुवात उशिरा होणे, गाळ काढून देण्यासाठी उपाययोजना नसणे, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत अशांना शेतात मोफत गाळ टाकून देणे यासह आदी उपाययोजना प्रशासनाकडून केल्या नसल्यामुळे गाळ उपसा काढून शेतात घेवून जाण्यास शेतकऱ्यांनी थंड प्रतिसाद दिल्यामुळे हा प्रकल्प गाळात रुतला आहे़१४६ दलघमी जलसाठ्याचा हा प्रकल्प गाळात रुतल्याने याची पाणीपातळी साठा कमी झाला आहे़ या प्रकल्पात १०० टक्के गाळ उपसा केला तर दहा धरण बांधल्यासारखा साठा या प्रकल्पातील होईल़ या प्रकल्पात सध्या १४़७९ टक्के पाणीसाठा आहे़‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या अभियानांतर्गत तहसीलकडे एकाही सेवाभावी संस्थेचा प्रस्ताव दाखल झाला नाही़ त्यामुळे सध्या प्रकल्पातील गाळ शेतकरी वैयक्तिकरित्या काढून घेवून जात असल्याची माहिती शाखा अभियंता एस़एम़ पांडागळे यांनी दिली़मागील दोन वर्षांखाली २०१६ मध्ये प्रकल्पातील १ लाख ६७ हजार घनमीटर, २०१७- निरंक, २०१८- ३५ हजार ९१२, २०१९ सध्या चालू ५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला़मागील २०१६ व २०१८ मध्ये मानव लोक सेवाभावी संस्थेचे मशीन व शासनाकडून डिझेल देवून गाळ उपसा काढण्यात आला होता़ यंदा मात्र एकाही सेवाभावी संस्थेने दखल न घेतल्याने शेतकरी स्वत: गाळ काढून घेवून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.१४६ दलघमी जलसाठ्याचा हा प्रकल्प गाळात रुतल्याने साठा कमी झाला आहे़ या प्रकल्पात १०० टक्के गाळ उपसा केला तर दहा धरणे बांधल्यासारखा साठा या प्रकल्पातील होईल़ सध्या १४़७९ टक्के पाणीसाठा आहे़मानार प्रकल्पाला ५३ वर्षे झाली़ या वर्षात लाखोंच्यावर गाळ या प्रकल्पात आला़ पण प्रकल्पातील गाळउपसा अत्यंत कमी प्रमाणात झाला़ या प्रकल्पातील गाळउपसा काढण्यासाठी प्रशासनाला अपयश प्राप्त झाले़ याचे कारण म्हणजे ढिसाळ नियोजऩ

टॅग्स :NandedनांदेडDamधरणwater scarcityपाणी टंचाई