शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मानार धरण गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:55 IST

बारूळ : मागील ५३ वर्षांत मानार प्रकल्पातील फक्त २ लाख ५ हजार ९१२ घनमीटर गाळ काढण्यात प्रशासनाला यश आले ...

ठळक मुद्देमानार प्रकल्प : मागील ५३ वर्षांत फक्त २ लाख घनमीटर गाळ काढला

बारूळ : मागील ५३ वर्षांत मानार प्रकल्पातील फक्त २ लाख ५ हजार ९१२ घनमीटर गाळ काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रकल्पात अजूनही लाखो घनमीटरच्यावर गाळ असल्याने हा प्रकल्प गाळात रुतल्याचे चित्र आहे़बारूळ येथील मानार प्रकल्प कै़ शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने १९६२ साली झाला़ या प्रकल्पाचा फायदा कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद तालुक्यांतील शेतकरी, नागरिक, जनावरांना पिण्यासाठी व सिंचनासाठी झाला़ प्रकल्पामुळे २४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून त्यामुळे शेतकरी, नागरिक सधन झाले़मानार प्रकल्पाला ५३ वर्षे झाली़ या वर्षात लाखो घनमीटरवर गाळ या प्रकल्पात आला़ पण प्रकल्पातील गाळउपसा अत्यंत कमी प्रमाणात झाला़ या प्रकल्पातील गाळ उपसा करण्यासाठी प्रशासनाला अपयश आले़ याचे कारण म्हणजे ढिसाळ नियोजऩ गाळ काढण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली नाही़गाळ काढण्याची सुरुवात उशिरा होणे, गाळ काढून देण्यासाठी उपाययोजना नसणे, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत अशांना शेतात मोफत गाळ टाकून देणे यासह आदी उपाययोजना प्रशासनाकडून केल्या नसल्यामुळे गाळ उपसा काढून शेतात घेवून जाण्यास शेतकऱ्यांनी थंड प्रतिसाद दिल्यामुळे हा प्रकल्प गाळात रुतला आहे़१४६ दलघमी जलसाठ्याचा हा प्रकल्प गाळात रुतल्याने याची पाणीपातळी साठा कमी झाला आहे़ या प्रकल्पात १०० टक्के गाळ उपसा केला तर दहा धरण बांधल्यासारखा साठा या प्रकल्पातील होईल़ या प्रकल्पात सध्या १४़७९ टक्के पाणीसाठा आहे़‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या अभियानांतर्गत तहसीलकडे एकाही सेवाभावी संस्थेचा प्रस्ताव दाखल झाला नाही़ त्यामुळे सध्या प्रकल्पातील गाळ शेतकरी वैयक्तिकरित्या काढून घेवून जात असल्याची माहिती शाखा अभियंता एस़एम़ पांडागळे यांनी दिली़मागील दोन वर्षांखाली २०१६ मध्ये प्रकल्पातील १ लाख ६७ हजार घनमीटर, २०१७- निरंक, २०१८- ३५ हजार ९१२, २०१९ सध्या चालू ५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला़मागील २०१६ व २०१८ मध्ये मानव लोक सेवाभावी संस्थेचे मशीन व शासनाकडून डिझेल देवून गाळ उपसा काढण्यात आला होता़ यंदा मात्र एकाही सेवाभावी संस्थेने दखल न घेतल्याने शेतकरी स्वत: गाळ काढून घेवून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.१४६ दलघमी जलसाठ्याचा हा प्रकल्प गाळात रुतल्याने साठा कमी झाला आहे़ या प्रकल्पात १०० टक्के गाळ उपसा केला तर दहा धरणे बांधल्यासारखा साठा या प्रकल्पातील होईल़ सध्या १४़७९ टक्के पाणीसाठा आहे़मानार प्रकल्पाला ५३ वर्षे झाली़ या वर्षात लाखोंच्यावर गाळ या प्रकल्पात आला़ पण प्रकल्पातील गाळउपसा अत्यंत कमी प्रमाणात झाला़ या प्रकल्पातील गाळउपसा काढण्यासाठी प्रशासनाला अपयश प्राप्त झाले़ याचे कारण म्हणजे ढिसाळ नियोजऩ

टॅग्स :NandedनांदेडDamधरणwater scarcityपाणी टंचाई