शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मानार धरण गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:55 IST

बारूळ : मागील ५३ वर्षांत मानार प्रकल्पातील फक्त २ लाख ५ हजार ९१२ घनमीटर गाळ काढण्यात प्रशासनाला यश आले ...

ठळक मुद्देमानार प्रकल्प : मागील ५३ वर्षांत फक्त २ लाख घनमीटर गाळ काढला

बारूळ : मागील ५३ वर्षांत मानार प्रकल्पातील फक्त २ लाख ५ हजार ९१२ घनमीटर गाळ काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रकल्पात अजूनही लाखो घनमीटरच्यावर गाळ असल्याने हा प्रकल्प गाळात रुतल्याचे चित्र आहे़बारूळ येथील मानार प्रकल्प कै़ शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने १९६२ साली झाला़ या प्रकल्पाचा फायदा कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद तालुक्यांतील शेतकरी, नागरिक, जनावरांना पिण्यासाठी व सिंचनासाठी झाला़ प्रकल्पामुळे २४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून त्यामुळे शेतकरी, नागरिक सधन झाले़मानार प्रकल्पाला ५३ वर्षे झाली़ या वर्षात लाखो घनमीटरवर गाळ या प्रकल्पात आला़ पण प्रकल्पातील गाळउपसा अत्यंत कमी प्रमाणात झाला़ या प्रकल्पातील गाळ उपसा करण्यासाठी प्रशासनाला अपयश आले़ याचे कारण म्हणजे ढिसाळ नियोजऩ गाळ काढण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली नाही़गाळ काढण्याची सुरुवात उशिरा होणे, गाळ काढून देण्यासाठी उपाययोजना नसणे, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत अशांना शेतात मोफत गाळ टाकून देणे यासह आदी उपाययोजना प्रशासनाकडून केल्या नसल्यामुळे गाळ उपसा काढून शेतात घेवून जाण्यास शेतकऱ्यांनी थंड प्रतिसाद दिल्यामुळे हा प्रकल्प गाळात रुतला आहे़१४६ दलघमी जलसाठ्याचा हा प्रकल्प गाळात रुतल्याने याची पाणीपातळी साठा कमी झाला आहे़ या प्रकल्पात १०० टक्के गाळ उपसा केला तर दहा धरण बांधल्यासारखा साठा या प्रकल्पातील होईल़ या प्रकल्पात सध्या १४़७९ टक्के पाणीसाठा आहे़‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या अभियानांतर्गत तहसीलकडे एकाही सेवाभावी संस्थेचा प्रस्ताव दाखल झाला नाही़ त्यामुळे सध्या प्रकल्पातील गाळ शेतकरी वैयक्तिकरित्या काढून घेवून जात असल्याची माहिती शाखा अभियंता एस़एम़ पांडागळे यांनी दिली़मागील दोन वर्षांखाली २०१६ मध्ये प्रकल्पातील १ लाख ६७ हजार घनमीटर, २०१७- निरंक, २०१८- ३५ हजार ९१२, २०१९ सध्या चालू ५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला़मागील २०१६ व २०१८ मध्ये मानव लोक सेवाभावी संस्थेचे मशीन व शासनाकडून डिझेल देवून गाळ उपसा काढण्यात आला होता़ यंदा मात्र एकाही सेवाभावी संस्थेने दखल न घेतल्याने शेतकरी स्वत: गाळ काढून घेवून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.१४६ दलघमी जलसाठ्याचा हा प्रकल्प गाळात रुतल्याने साठा कमी झाला आहे़ या प्रकल्पात १०० टक्के गाळ उपसा केला तर दहा धरणे बांधल्यासारखा साठा या प्रकल्पातील होईल़ सध्या १४़७९ टक्के पाणीसाठा आहे़मानार प्रकल्पाला ५३ वर्षे झाली़ या वर्षात लाखोंच्यावर गाळ या प्रकल्पात आला़ पण प्रकल्पातील गाळउपसा अत्यंत कमी प्रमाणात झाला़ या प्रकल्पातील गाळउपसा काढण्यासाठी प्रशासनाला अपयश प्राप्त झाले़ याचे कारण म्हणजे ढिसाळ नियोजऩ

टॅग्स :NandedनांदेडDamधरणwater scarcityपाणी टंचाई