उद्योजकता पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST2020-12-28T04:10:44+5:302020-12-28T04:10:44+5:30
उद्योग संचालनालयाच्या वतीने सन १९८४ पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सूक्ष्म व लघु ...

उद्योजकता पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले
उद्योग संचालनालयाच्या वतीने सन १९८४ पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सूक्ष्म व लघु उद्योगांना पुरस्कार दिले जातात. सन २००६ पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे १५ हजार व १० हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात येते. जिल्हा पुरस्कार योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
यात्रांसाठी परवानगी देण्याची मागणी
नांदेड : जिल्ह्यात ग्रामीण भागातील यात्रा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय आंबेडकर महासभेच्या वतीने करण्यात आली आहे. यात्रा बंद असल्याने अनेक लहान व्यापारी, फेरीवाले यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे यात्रा सुरू कराव्यात, अशी मागणी श्रावण नरवाडे, दीक्षा नरवाडे आदींनी केली.
स्वस्त धान्य दुकानांची चौकशी करा
नांदेड : शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १११ येथे गरजू व सामान्यांना धान्य मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दुकानाचा परवाना रद्द करावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. या दुकानाची चाैकशीही करण्यात आली होती.
बांधकाम कामगारांचे प्रस्ताव
देड : बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याची मागणी जिल्हा इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी संघाने केली आहे. बांधकाम कामगारांचे अनेक प्रस्ताव निकाली न काढता त्यात त्रुटी दाखविल्या जात आहेत. बांधकाम कामगारांचे अनुदानित प्रस्ताव २०१७ पासून मंजूर करण्यात आले नाहीत. प्रस्ताव निकाली न निघाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.
शिष्यवृत्ती रखडली
नांदेड : पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आणि राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीची रक्कम देण्याची मागणी भाजप विद्यार्थी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २०१८-१९ व २०१९-२० या वर्षातील रक्कम अजूनही देण्यात आली नाही. याबाबत निवेदन देण्यात आले.
संजीवन समाधी सोहळा
नांदेड : नायगाव तालुक्यातील बरबडा येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी उत्सव सोहळा उत्साहात पार पडला. संजीवन सोहळ्यानिमित्त कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गंगाधर भायेगावकर यांच्यासह गावकऱ्यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.
स्मशानभूमीच्या विकासाची मागणी
नांदेड : वसरणी येथील नावघाट स्मशानभूमीचा विकास करण्याची मागणी स्थायी समिती सदस्या दीपाली संतोष मोरे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. गोदावरीकाठी वसरणी येथील नावघाट स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. येथे मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी दीपाली मोरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.