शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

मराठवाड्यात टंचाईची तीव्रता वाढली;१०९९ गावांसह वाड्या-वस्त्या टँकरवर अवलंबून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 11:40 IST

येणाऱ्या काळात ही टंचाई अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देजून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्यतूटमहिन्यात वाढले २६९ टँकर

नांदेड : अत्यल्प पाऊस आणि त्यामुळे भूजलसाठ्यात झालेली घसरण यामुळे  मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मराठवाड्यातील ८०९ गावे आणि २९० वाड्या टँकरवर विसंबून आहेत. या १०९९ ठिकाणी १०७६ टँकरद्वारे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविली जात आहे. येणाऱ्या काळात ही टंचाई अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्यतूट, उपलब्ध भूजलाची कमतरता यामुळे पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. सद्य:स्थितीत औरंगाबाद, जालना आणि बीड  या तीन जिल्ह्यांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ४४१ गावे आणि १८४ वाड्यांवर ५९४ पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात २३८ गावे आणि ९८ वाड्यांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. येथे २८९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जालना जिल्ह्यातही टंचाईची तीव्रता दिसून येते. जिल्ह्यातील ११ गावे आणि ६ वाड्यांसाठी २२ शासकीय आणि १५० खाजगी अशा १७२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ गावांत टंचाईची तीव्रता आहे.  येथे ५ शासकीय आणि ८ खाजगी अशा १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर लातूर येथे ३ गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे.  अशीच स्थिती नांदेड जिल्ह्यातही असून जिल्ह्यातील ३ गावे आणि २ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. उन्हाळ्यात येणाऱ्या भीषणतेची आताच चिंता लागून राहिली आहे.

महिन्यात वाढले २६९ टँकरडिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मराठवाड्यातील ६२५ गावे आणि ८७ वाड्यांना ७९३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र अवघ्या महिनाभरात टँकरची संख्या सुमारे २६९ ने वाढली आहे. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात हीच संख्या १०७६ टँकरवर पोहोचली आहे. येणाऱ्या काळात टंचाईची स्थिती तीव्र होण्याचे संकेतच यातून मिळत आहेत. 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीMarathwadaमराठवाडा