शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

मराठवाड्यात टंचाईची तीव्रता वाढली;१०९९ गावांसह वाड्या-वस्त्या टँकरवर अवलंबून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 11:40 IST

येणाऱ्या काळात ही टंचाई अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देजून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्यतूटमहिन्यात वाढले २६९ टँकर

नांदेड : अत्यल्प पाऊस आणि त्यामुळे भूजलसाठ्यात झालेली घसरण यामुळे  मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मराठवाड्यातील ८०९ गावे आणि २९० वाड्या टँकरवर विसंबून आहेत. या १०९९ ठिकाणी १०७६ टँकरद्वारे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविली जात आहे. येणाऱ्या काळात ही टंचाई अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्यतूट, उपलब्ध भूजलाची कमतरता यामुळे पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. सद्य:स्थितीत औरंगाबाद, जालना आणि बीड  या तीन जिल्ह्यांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ४४१ गावे आणि १८४ वाड्यांवर ५९४ पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात २३८ गावे आणि ९८ वाड्यांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. येथे २८९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जालना जिल्ह्यातही टंचाईची तीव्रता दिसून येते. जिल्ह्यातील ११ गावे आणि ६ वाड्यांसाठी २२ शासकीय आणि १५० खाजगी अशा १७२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ गावांत टंचाईची तीव्रता आहे.  येथे ५ शासकीय आणि ८ खाजगी अशा १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर लातूर येथे ३ गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे.  अशीच स्थिती नांदेड जिल्ह्यातही असून जिल्ह्यातील ३ गावे आणि २ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. उन्हाळ्यात येणाऱ्या भीषणतेची आताच चिंता लागून राहिली आहे.

महिन्यात वाढले २६९ टँकरडिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मराठवाड्यातील ६२५ गावे आणि ८७ वाड्यांना ७९३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र अवघ्या महिनाभरात टँकरची संख्या सुमारे २६९ ने वाढली आहे. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात हीच संख्या १०७६ टँकरवर पोहोचली आहे. येणाऱ्या काळात टंचाईची स्थिती तीव्र होण्याचे संकेतच यातून मिळत आहेत. 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीMarathwadaमराठवाडा