शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'आमदनी अठन्नी खर्चा रुपया'; कपाशीचा उत्पादन खर्च तीस हजार, उत्पन्न 16 हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 14:55 IST

कापसाची लागवड करण्यापासून खते, फवारणी, कोळपणी, वेचणी आदींंचा जवळपास एकरी ३० ते ३२ हजार रुपये खर्च जातो.

ठळक मुद्देचुकारेही वेळेत मिळेनातुटपुंज्या हमीभावाने शेतकरी हवालदिल 

नांदेड : जिल्ह्यात यंदा सोयाबीनपाठोपाठ कपाशीची लागवड झाली आहे. परंतु, कपाशीच्या उत्पन्नापेक्षा  काढण्यासाठी लागलेला खर्च अधिक होत आहे. यंदा अतिवृष्टीने कपाशीचे अतोनात नुकसान झाल्याने आमदनी अठन्नी खर्चा रुपया असे चित्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे. 

नांदेड जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. त्यापाठोपाठ कपाशीची ८० हजार हेक्टरवर लागवड झालेली आहे. कापसाची लागवड करण्यापासून खते, फवारणी, कोळपणी, वेचणी आदींंचा जवळपास एकरी ३० ते ३२ हजार रुपये खर्च जातो. तर प्रतिक्विंटल ५२०० रुपयेप्रमाणे यंदा भाव मिळालेला आहे. त्यात अतिवृष्टीने केवळ एकाच वेचणीत कपाशीची पऱ्हाटी होत आहे. एकरी २ ते ३ क्विंटलचा उतारा निघत आहे. त्यामुळे उत्पादनावर केलेला खर्चही निघणे कठीण बनल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

मजूरही मिळेनातयंदा अतिवृष्टीमुळे कापसाच्या बोंडामध्ये अळ्या पडल्याने कवडीचे प्रमाण वाढले आहे. हा कापूस वेचणीसाठी अवघड जातो. त्यामुळे रोजंदारीवर येणाऱ्या महिला मजुरांनी कापूस वेचणीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिकिलो अथवा ठोक दराने कापूस वेचणीस द्यावा लागत आहे.

खर्च सर्वाधिकखत आणि कीटकनाशकावर केला जाणारा खर्च सर्वाधिक असतो. यामध्ये विविध कंपन्यांच्या औषधींची खरेदी करण्यासाठी पाच ते दहा हजार मोजावे लागतात. यामध्ये दोन किंवा तीनच फवारण्या होतात.

यंदा सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर केलेल्या पेरणीतून खर्च काढण्यासाठी पिकांवर अतोनात मेहनत घेतली. परंतु, अतिवृष्टीने हाततोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यात शासनाकडूनही केवळ कोरडी आश्वासने दिली जात आहेत. परंतू अद्यापपर्यंत कुठलीही मदत मिळालेली नाही. शेतकर्यांना कोणीही वाली नाही. - सुदर्शन पाटील कल्याणकर,शेतकरी

कपाशीचे बिटी बियाणे घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. लागवडीपासून ते वेचणीपर्यंत मुलाप्रमाणे पिकांचे पालनपोषण केले जाते. परंतु, ऐन वेचणीच्या काळात अतिवृष्टीने घात केला. तसेच शासनाकडूनही उत्पादनावर आधारित भाव मिळत नसल्याने तुटपुंज्या भावात पांढरे सोने व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे.  केलेला उत्पादन खर्चही निघत नाही. - शिवहरी गाढे, शेतकरी 

टॅग्स :cottonकापूसNandedनांदेडFarmerशेतकरी