शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बूथ कार्यकर्ता संघटनेतील महत्त्वाचा धागा-चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:35 IST

लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी व फडणवीस सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. या सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यापारी, शेतमजूर हे सगळेच अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देबूथ कमिटी कार्यकर्ता बैठक

नांदेड : लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी व फडणवीस सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. या सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यापारी, शेतमजूर हे सगळेच अडचणीत आले आहेत. त्यामुळे जनतेनेच दृढनिश्चय केला असून अब की बार काँग्रेस सरकार हे आता निश्चित झाल्याचे प्रतिपादन आ़अमिताताई चव्हाण यांनी केले़शुक्रवारपासून आ. अमिता चव्हाण यांचा तीनदिवसीय देगलूर दौरा सुरू झाला आहे़ दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी देगलूर तालुक्यातील हणेगाव व मरखेल या दोन जिल्हा परिषद सर्कलमधील गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.अमरनाथ राजूरकर हे होते तर व्यासपीठावर माजी आ.रावसाहेब अंतापूरकर, सभापती माधवराव मिसाळे, शिवाजीराव देशमुख बळेगावकर, न.प.अध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, शहराध्यक्ष शंकर कंतेवार, प्रवक्ते संतोष पांडागळे, प्रीतम देशमुख, प्रशांत देशमुख, अ‍ॅड.रामराव नाईक, बंदखडके, दीपक शहाणे, बालाजीराव टेकाळे, डॉ.विजयकुमार धुमाळे, उमेश पा.हाळीकर, संदीप पा.मरखेलकर, चंद्रकला रेड्डी, पप्पू रेड्डी, किशनराव पाटील, जनार्दन बिरादार, नंदाताई देशमुख आदींची उपस्थिती होती़यावेळी आ़चव्हाण म्हणाल्या, बूथ कार्यकर्ता संघटनेतील महत्त्वाचा धागा आहे. काँग्रेस पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होते. आता प्रत्येक बुथवर व्हॉट्सअप ग्रूप तयार करून त्या माध्यमातून गावातील प्रश्न जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून होत आहे. मोदी सरकारने पीकविमा किंवा कर्जमाफी असेल त्यासोबतच प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करणे असेल, ही सगळी खोटी आश्वासने दिली. त्यामुळेच आता जनताच त्यांना धडा शिकविल़

  • जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाने अमिता चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी, असा एकमुखी ठराव घेतला आहे;परंतु यासंदर्भातील निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे घेणार आहेत, त्यामुळे उमेदवारी कोणालाही मिळो, देगलूर तालुक्यातील सुजाण मतदारांनी काँग्रेस पक्षाला साथ द्यावी. समृद्धी महामार्गावर तब्बल १ लाख कोटी रुपये खर्च करण्याचा अट्टाहास कशासाठी ? महामार्गाचे काम करणारे अधिकारी शेतकºयांच्या जमिनी घेऊन मालामाल झाले आहेत, असा आरोप आ. अमरनाथ राजूरकर यांनी केला आहे़
टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस