शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

बूथ कार्यकर्ता संघटनेतील महत्त्वाचा धागा-चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:35 IST

लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी व फडणवीस सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. या सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यापारी, शेतमजूर हे सगळेच अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देबूथ कमिटी कार्यकर्ता बैठक

नांदेड : लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी व फडणवीस सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. या सरकारच्या काळात शेतकरी, कष्टकरी, छोटे व्यापारी, शेतमजूर हे सगळेच अडचणीत आले आहेत. त्यामुळे जनतेनेच दृढनिश्चय केला असून अब की बार काँग्रेस सरकार हे आता निश्चित झाल्याचे प्रतिपादन आ़अमिताताई चव्हाण यांनी केले़शुक्रवारपासून आ. अमिता चव्हाण यांचा तीनदिवसीय देगलूर दौरा सुरू झाला आहे़ दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी देगलूर तालुक्यातील हणेगाव व मरखेल या दोन जिल्हा परिषद सर्कलमधील गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.अमरनाथ राजूरकर हे होते तर व्यासपीठावर माजी आ.रावसाहेब अंतापूरकर, सभापती माधवराव मिसाळे, शिवाजीराव देशमुख बळेगावकर, न.प.अध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार, शहराध्यक्ष शंकर कंतेवार, प्रवक्ते संतोष पांडागळे, प्रीतम देशमुख, प्रशांत देशमुख, अ‍ॅड.रामराव नाईक, बंदखडके, दीपक शहाणे, बालाजीराव टेकाळे, डॉ.विजयकुमार धुमाळे, उमेश पा.हाळीकर, संदीप पा.मरखेलकर, चंद्रकला रेड्डी, पप्पू रेड्डी, किशनराव पाटील, जनार्दन बिरादार, नंदाताई देशमुख आदींची उपस्थिती होती़यावेळी आ़चव्हाण म्हणाल्या, बूथ कार्यकर्ता संघटनेतील महत्त्वाचा धागा आहे. काँग्रेस पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होते. आता प्रत्येक बुथवर व्हॉट्सअप ग्रूप तयार करून त्या माध्यमातून गावातील प्रश्न जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून होत आहे. मोदी सरकारने पीकविमा किंवा कर्जमाफी असेल त्यासोबतच प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करणे असेल, ही सगळी खोटी आश्वासने दिली. त्यामुळेच आता जनताच त्यांना धडा शिकविल़

  • जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाने अमिता चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी, असा एकमुखी ठराव घेतला आहे;परंतु यासंदर्भातील निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे घेणार आहेत, त्यामुळे उमेदवारी कोणालाही मिळो, देगलूर तालुक्यातील सुजाण मतदारांनी काँग्रेस पक्षाला साथ द्यावी. समृद्धी महामार्गावर तब्बल १ लाख कोटी रुपये खर्च करण्याचा अट्टाहास कशासाठी ? महामार्गाचे काम करणारे अधिकारी शेतकºयांच्या जमिनी घेऊन मालामाल झाले आहेत, असा आरोप आ. अमरनाथ राजूरकर यांनी केला आहे़
टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस