शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नांदेड जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; मनसेची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 19:25 IST

योजनांची प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली

नांदेड : जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने ज्या योजना जाहिर केल्या आहेत त्या योजनांची प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागिरदार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

सतत तीन वर्षापासून जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. परिणामी खरीप आणि रब्बी हंगाम उध्वस्त झाले. शेती व्यवसाय जवळ-जवळ मोडीत निघण्याच्या परिस्थितीत आहे. शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाला आहे. यामुळे शासन नियमाप्रमाणे दुष्काळग्रस्त भागात जमिन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या विज बिलात साडे तेहतीस टक्के सूट, शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजने अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या शेतकर्‍यांच्या शेतीच्या पंपाची विज जोडणी खंडीत न करणे अशा योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. 

नांदेड जिल्ह्यात या योजनेपैकी एकाही योजनेला योग्य तो न्याय मिळाला नाही. परिणामी शेतकरी आणि सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. शेतकर्‍यांना जगण्याचा आधार मिळावा यासाठी शासनाकडून शेड नेट हाऊस, मिनी ऑईल मिल, पावर टिलर, शेळी पालन, पॉली हाऊस, कुकुटपालन, दाल मिल, ट्रॅक्टर व अवजारे अशी साधनसामुग्री उपलब्ध करून देण्याचेही निर्देश आहेत. 

या सर्व योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागिरदार, शहर अध्यक्ष शफीक अब्दुल, जिल्हाध्यक्ष रवि राठोड, मनविसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील दरडे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन चव्हाण, संतोष सुनेवाड यांच्यासह अनेकांनी केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळNandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडMNSमनसे