शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नांदेड जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; मनसेची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 19:25 IST

योजनांची प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली

नांदेड : जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने ज्या योजना जाहिर केल्या आहेत त्या योजनांची प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागिरदार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

सतत तीन वर्षापासून जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. परिणामी खरीप आणि रब्बी हंगाम उध्वस्त झाले. शेती व्यवसाय जवळ-जवळ मोडीत निघण्याच्या परिस्थितीत आहे. शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाला आहे. यामुळे शासन नियमाप्रमाणे दुष्काळग्रस्त भागात जमिन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या विज बिलात साडे तेहतीस टक्के सूट, शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजने अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या शेतकर्‍यांच्या शेतीच्या पंपाची विज जोडणी खंडीत न करणे अशा योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. 

नांदेड जिल्ह्यात या योजनेपैकी एकाही योजनेला योग्य तो न्याय मिळाला नाही. परिणामी शेतकरी आणि सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. शेतकर्‍यांना जगण्याचा आधार मिळावा यासाठी शासनाकडून शेड नेट हाऊस, मिनी ऑईल मिल, पावर टिलर, शेळी पालन, पॉली हाऊस, कुकुटपालन, दाल मिल, ट्रॅक्टर व अवजारे अशी साधनसामुग्री उपलब्ध करून देण्याचेही निर्देश आहेत. 

या सर्व योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागिरदार, शहर अध्यक्ष शफीक अब्दुल, जिल्हाध्यक्ष रवि राठोड, मनविसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील दरडे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन चव्हाण, संतोष सुनेवाड यांच्यासह अनेकांनी केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळNandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडMNSमनसे