शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भरतीच करायची नसेल तर सेट, नेट परीक्षा घेता कशाला?; सीएचबीवरील प्राध्यापकांची सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 17:03 IST

प्राध्यापक भरती बंद असल्याने जवळपास साडेतीन हजार सेट, नेट उत्तीर्ण, पीएच़ डी़ पात्रताधारक नोकरीच्या शोधात असून अनेकांना वर्षानुवर्षे सीएचबी (तासिका तत्वावर) नोकरी करावी लागत आहे़

ठळक मुद्देस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात जवळपास जवळपास २९८ जागा रिक्त आहेत़आजघडीला १३०० प्राध्यापक हे तासिकातत्वावर कार्यरत आहे़ प

- श्रीनिवास भोसले

नांदेड : प्राध्यापक भरती बंद असल्याने जवळपास साडेतीन हजार सेट, नेट उत्तीर्ण, पीएच़ डी़ पात्रताधारक नोकरीच्या शोधात असून अनेकांना वर्षानुवर्षे सीएचबी (तासिका तत्वावर) नोकरी करावी लागत आहे़ स्वारातीम विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ९७ महाविद्यालयात एकूण १३०० प्राध्यापक तासिका तत्वावर कार्यरत आहेत़ 

शासन शिक्षणासाठी प्रोत्साहन देत आहे़ परंतु, उच्च शिक्षण घेवूनही नोकरी मिळत नसल्याने सेट, नेट, पीएच़डी धारकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे़  नांदेडसह परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील प्राध्यापक पात्रताधारक एकत्र येवून प्राध्यापक भरतीसाठी लढा देत आहेत़ त्यातील बहुतांश जण तुटपुंज्या वेतनावर ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत़ 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात जवळपास जवळपास २९८ जागा रिक्त आहेत़ तर आजघडीला १३०० प्राध्यापक हे तासिकातत्वावर कार्यरत आहे़ परंतु, उर्वरित हजारो पात्रताधारक हे आजही घरीच आहे़ शासनाच्या वेळकाढू धोरणाचा फटका उच्चशिक्षीतांना बसत आहे़ एका तासाला २४० रूपये याप्रमाणे वेतन काढले जाते़ तुटपुंज्या वेतनामुळे ज्ञानार्जनावर परिणाम होतो़ 

दरम्यान, वर्षातून दोन वेळा नेट तसेच सेटची परीक्षा घेतली जाते़ प्राध्यापक भरती प्रक्रिया बंद आहे़ परंतु, पात्रतेसाठी लागणारी परीक्षा वर्षातून पाचवेळा घेतली जाते़ त्यामुळे प्राध्यापक पात्रताधारकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़  वर्षानुवर्षे तासिका तत्वावर नोकरी करणाऱ्या अनेकांची लग्न जुळत नाहीत, नोकरीअभावी काही जण मनोरूग्ण झाले तर काही जण शिक्षण क्षेत्र सोडून मिळेल ते काम करीत असल्याचे सांगत, शासनाने सेट, नेट परीक्षा बंद करावी, असे मत प्रा़डॉ़बालाजी आव्हाड यांनी व्यकञ! केले. सेट, नेट उत्तीर्ण व पीएच़डी़धारकांमध्ये भाषा विषय, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र आदी विषयांच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे त्यांना आयटी, बँकीग क्षेत्रातही नौकरी मिळत नाही. दूसरीकडे उच्चशिक्षण घेतल्यामुळे शेतात काम करू शकत नसल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक डॉ़परमेश्वर पौळ यांनी दिली़

सालगड्याला मिळतात जास्त पैसे महाराष्ट्रात ९ हजार ५११  प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत़ शासन जागा भरण्यास तयार नाही़ एवढे शिक्षण घेवून तासिका तत्वावर नोकरी करावी लागते़  शासन वर्षाला केवळ ४०,००० पगार देते़ आमच्यापेक्षा शेतातील सालगड्याला जास्त पैसे मिळतात़ वयस्कर आई वडिलांजवळ राहण्यासाठी एमएनसीमधील मोठी नोकरी सोडून आलो़ पण इथे आल्यानंतर समजले की आपण परदेशात काम केले तर लाखो रूपये मिळतात़ परंतु, आज तुटपुंज्या वेतनावर काम करण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया अर्धापूर येथील प्रा.डॉ.परमेश्वर पौळ यांनी व्यक्त केली. 

डोनेशनअभावी नोकरी अन् लग्न नाहीपात्रता पुर्ण केल्यानंतरही मागील १२ वर्षापासून कायमस्वरूपी नौकरी मिळत नाही. त्यामुळे  शिक्षण घ्यायचे कशासाठी असा प्रश्न डॉ़ प्रणिता माधवराव वांगे यांनी उपस्थित केला. शासन नौकर भरती करीत नाही. काही जागा निघतात मात्र भरमसाठ डोनेशनच्या मागणीमुळे पात्रता असतानाही नौकरीपासून वंचित रहावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणुन लग्न नाही आणि डोनेशन नाही म्हणून नौकरी नाही. अशी अनेकांची परिस्थिती असल्याचे सांगत, देशातील शिक्षणव्यवस्था बदलण्याची वेळ आल्याचे डॉ़ प्रणिता वांगे यांनी सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडexamपरीक्षा