शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘वीज वितरण’ मध्ये संतप्तांचा प्रचंड गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:27 IST

चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करु, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.

धर्माबाद : पाण्याअभावी पिके करपून जात असल्याने वीजबिल भरूनही, वीजपुरवठा करण्यास टाळाटाळ झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी २७ नोव्हेंबर रोजी धर्माबाद कार्यालयात गोंधळ घालून सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले. चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करु, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.रत्नाळी शिवारातील एक-दीड महिन्यांपूर्वी डीपी जळाल्याने शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्याने ऐन भिजवणी पिकांना पाणी देणे बंद पडले. हाताला आलेली पिके पाण्याअभावी करपून जात होती. तब्बल दीड महिन्यांपूर्वीच डीपी जळाल्याचे संबंधित विभागाला लेखी, तोंडी सांगितले. वीजबिल भरले, तरीही वीज वितरण डीपी बसविण्यात दीड-दीड महिना वेळ लागत असल्याने संतापून शेतक-यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले. यावेळी शेतकरी मारोती पाटील जाधव, नरेश रेडी आरकलवार, कांतराव रत्नाळीकर, बाबूराव जाधव, मारोती मदनूरकर, नरेश मुनलोड, सुरेश माळी, लक्ष्मण ईप्तेकर, गंगाधर लालू आदी शेतकरी उपस्थित होते.

.. तर शेतात आत्महत्या करु, शेतक-यांचा पवित्रा

  • चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करू असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.
  • हाताला आलेली पिके पाण्याअभावी करपून जात असल्याने शेतक-यांत संताप
  • शेतक-यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन वीज वितरण सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले.                                                                                      

यासंदर्भात देगलूर येथील मुख्य कार्यकारी अभियंता गोपुलवार यांच्याशी संपर्क केला असता उद्या दोन डीपी पाठवून देतो, असे आश्वासन त्यांनी दिल्याने शेतकरी शांत झाले. अन्यथा जोपर्यंत डीपी बसविणार नाही तोपर्यंत या कार्यालयातून हटणार नाही, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला होता. याशिवाय अनेक भागांत डीपी जळालेली उदाहरणे असून पाण्याअभावी पिके करपून जात असल्याने अनेक शेतकºयांच्या तक्रारी वाढत आहेत. दरम्यान, धर्माबाद तालुक्यातील विजेची अवस्था बिकट झाली आहे. चुकीची बिले देणे, रिडींग न घेता अंदाजीत बीले अदा करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. काही पथदिवे नुसतेच उभे असल्याने ते शोभेची वास्तू ठरले आहेत. नांदेडच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.बिल भरुनही वीज देण्यास टाळाटाळ

  • तालुक्यात सोळा डीपी जळालेले आहेत़ डीपीची मागणी केली तर अ‍ॅडजस्टमेन्ट करा म्हणून वरिष्ठ अधिकारी ताकीद देतात. अन्यथा वरिष्ठ अधिकारी मला निलंबित करण्याची धमकी देतात, असे दोन वेळेस निलंबित झालो आहे. मी कोणाचे ऐकू, इकडे शेतकरी, नागरिक दररोज येऊन त्रास देतात. मला नोकरी टिकवायची आहे. वरिष्ठानी डीपी दिले तर डीपी पाठवेन, पण स्वखर्चाने वाहने भाडे करून डीपी भोकरवरून आणावे लागेल असे सदरील शेतक-यांना सहाय्यक अभियंता पांडे यांनी सांगितले.
  • दीड महिना झाले तरीही जळालेली डीपी बसवित नाहीत़ लेखी पत्र, तोंडी सांगितले तरीही उडवाउडवीचे उत्तर देतात. मग पिकाला पाणी कसे द्यावे, याचे वीजबिलही भरलो आहोत, तरीही निष्क्रिय महावितरण लक्ष देत नाही असे मत शेतकरी नरेश रेडी आरकलवार, मारोती पाटील जाधव यांनी मांडले़
टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीelectricityवीज