शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

‘वीज वितरण’ मध्ये संतप्तांचा प्रचंड गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:27 IST

चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करु, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.

धर्माबाद : पाण्याअभावी पिके करपून जात असल्याने वीजबिल भरूनही, वीजपुरवठा करण्यास टाळाटाळ झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी २७ नोव्हेंबर रोजी धर्माबाद कार्यालयात गोंधळ घालून सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले. चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करु, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.रत्नाळी शिवारातील एक-दीड महिन्यांपूर्वी डीपी जळाल्याने शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्याने ऐन भिजवणी पिकांना पाणी देणे बंद पडले. हाताला आलेली पिके पाण्याअभावी करपून जात होती. तब्बल दीड महिन्यांपूर्वीच डीपी जळाल्याचे संबंधित विभागाला लेखी, तोंडी सांगितले. वीजबिल भरले, तरीही वीज वितरण डीपी बसविण्यात दीड-दीड महिना वेळ लागत असल्याने संतापून शेतक-यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले. यावेळी शेतकरी मारोती पाटील जाधव, नरेश रेडी आरकलवार, कांतराव रत्नाळीकर, बाबूराव जाधव, मारोती मदनूरकर, नरेश मुनलोड, सुरेश माळी, लक्ष्मण ईप्तेकर, गंगाधर लालू आदी शेतकरी उपस्थित होते.

.. तर शेतात आत्महत्या करु, शेतक-यांचा पवित्रा

  • चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करू असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.
  • हाताला आलेली पिके पाण्याअभावी करपून जात असल्याने शेतक-यांत संताप
  • शेतक-यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन वीज वितरण सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले.                                                                                      

यासंदर्भात देगलूर येथील मुख्य कार्यकारी अभियंता गोपुलवार यांच्याशी संपर्क केला असता उद्या दोन डीपी पाठवून देतो, असे आश्वासन त्यांनी दिल्याने शेतकरी शांत झाले. अन्यथा जोपर्यंत डीपी बसविणार नाही तोपर्यंत या कार्यालयातून हटणार नाही, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला होता. याशिवाय अनेक भागांत डीपी जळालेली उदाहरणे असून पाण्याअभावी पिके करपून जात असल्याने अनेक शेतकºयांच्या तक्रारी वाढत आहेत. दरम्यान, धर्माबाद तालुक्यातील विजेची अवस्था बिकट झाली आहे. चुकीची बिले देणे, रिडींग न घेता अंदाजीत बीले अदा करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. काही पथदिवे नुसतेच उभे असल्याने ते शोभेची वास्तू ठरले आहेत. नांदेडच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.बिल भरुनही वीज देण्यास टाळाटाळ

  • तालुक्यात सोळा डीपी जळालेले आहेत़ डीपीची मागणी केली तर अ‍ॅडजस्टमेन्ट करा म्हणून वरिष्ठ अधिकारी ताकीद देतात. अन्यथा वरिष्ठ अधिकारी मला निलंबित करण्याची धमकी देतात, असे दोन वेळेस निलंबित झालो आहे. मी कोणाचे ऐकू, इकडे शेतकरी, नागरिक दररोज येऊन त्रास देतात. मला नोकरी टिकवायची आहे. वरिष्ठानी डीपी दिले तर डीपी पाठवेन, पण स्वखर्चाने वाहने भाडे करून डीपी भोकरवरून आणावे लागेल असे सदरील शेतक-यांना सहाय्यक अभियंता पांडे यांनी सांगितले.
  • दीड महिना झाले तरीही जळालेली डीपी बसवित नाहीत़ लेखी पत्र, तोंडी सांगितले तरीही उडवाउडवीचे उत्तर देतात. मग पिकाला पाणी कसे द्यावे, याचे वीजबिलही भरलो आहोत, तरीही निष्क्रिय महावितरण लक्ष देत नाही असे मत शेतकरी नरेश रेडी आरकलवार, मारोती पाटील जाधव यांनी मांडले़
टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीelectricityवीज