शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

‘वीज वितरण’ मध्ये संतप्तांचा प्रचंड गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:27 IST

चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करु, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.

धर्माबाद : पाण्याअभावी पिके करपून जात असल्याने वीजबिल भरूनही, वीजपुरवठा करण्यास टाळाटाळ झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी २७ नोव्हेंबर रोजी धर्माबाद कार्यालयात गोंधळ घालून सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले. चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करु, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.रत्नाळी शिवारातील एक-दीड महिन्यांपूर्वी डीपी जळाल्याने शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्याने ऐन भिजवणी पिकांना पाणी देणे बंद पडले. हाताला आलेली पिके पाण्याअभावी करपून जात होती. तब्बल दीड महिन्यांपूर्वीच डीपी जळाल्याचे संबंधित विभागाला लेखी, तोंडी सांगितले. वीजबिल भरले, तरीही वीज वितरण डीपी बसविण्यात दीड-दीड महिना वेळ लागत असल्याने संतापून शेतक-यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले. यावेळी शेतकरी मारोती पाटील जाधव, नरेश रेडी आरकलवार, कांतराव रत्नाळीकर, बाबूराव जाधव, मारोती मदनूरकर, नरेश मुनलोड, सुरेश माळी, लक्ष्मण ईप्तेकर, गंगाधर लालू आदी शेतकरी उपस्थित होते.

.. तर शेतात आत्महत्या करु, शेतक-यांचा पवित्रा

  • चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करू असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.
  • हाताला आलेली पिके पाण्याअभावी करपून जात असल्याने शेतक-यांत संताप
  • शेतक-यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन वीज वितरण सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले.                                                                                      

यासंदर्भात देगलूर येथील मुख्य कार्यकारी अभियंता गोपुलवार यांच्याशी संपर्क केला असता उद्या दोन डीपी पाठवून देतो, असे आश्वासन त्यांनी दिल्याने शेतकरी शांत झाले. अन्यथा जोपर्यंत डीपी बसविणार नाही तोपर्यंत या कार्यालयातून हटणार नाही, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला होता. याशिवाय अनेक भागांत डीपी जळालेली उदाहरणे असून पाण्याअभावी पिके करपून जात असल्याने अनेक शेतकºयांच्या तक्रारी वाढत आहेत. दरम्यान, धर्माबाद तालुक्यातील विजेची अवस्था बिकट झाली आहे. चुकीची बिले देणे, रिडींग न घेता अंदाजीत बीले अदा करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. काही पथदिवे नुसतेच उभे असल्याने ते शोभेची वास्तू ठरले आहेत. नांदेडच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.बिल भरुनही वीज देण्यास टाळाटाळ

  • तालुक्यात सोळा डीपी जळालेले आहेत़ डीपीची मागणी केली तर अ‍ॅडजस्टमेन्ट करा म्हणून वरिष्ठ अधिकारी ताकीद देतात. अन्यथा वरिष्ठ अधिकारी मला निलंबित करण्याची धमकी देतात, असे दोन वेळेस निलंबित झालो आहे. मी कोणाचे ऐकू, इकडे शेतकरी, नागरिक दररोज येऊन त्रास देतात. मला नोकरी टिकवायची आहे. वरिष्ठानी डीपी दिले तर डीपी पाठवेन, पण स्वखर्चाने वाहने भाडे करून डीपी भोकरवरून आणावे लागेल असे सदरील शेतक-यांना सहाय्यक अभियंता पांडे यांनी सांगितले.
  • दीड महिना झाले तरीही जळालेली डीपी बसवित नाहीत़ लेखी पत्र, तोंडी सांगितले तरीही उडवाउडवीचे उत्तर देतात. मग पिकाला पाणी कसे द्यावे, याचे वीजबिलही भरलो आहोत, तरीही निष्क्रिय महावितरण लक्ष देत नाही असे मत शेतकरी नरेश रेडी आरकलवार, मारोती पाटील जाधव यांनी मांडले़
टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीelectricityवीज