शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ZP नोकरभरती: १२ लाख उमेदवारांची परीक्षा घ्यायची कशी ? मंत्र्यांनीच व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 14:30 IST

परीक्षा ऑफलाइन घेतल्यास त्यात भ्रष्टाचार हाेण्याची भीती उमेदवारांना आहे. त्यातूनच गाेंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

- राजेश निस्तानेनांदेड : गेल्या चार वर्षांपासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या १३ हजार ५२१ पदांची भरती रखडली आहे. मात्र, त्यासाठी १२ ते १३ लाख उमेदवारांचे अर्ज आल्याने ही परीक्षा घ्यायची कशी, याचा पेच राज्य सरकारपुढे निर्माण झाला आहे. त्याबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही चिंता व्यक्त केली आहे.

२०१९ ला जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील १३ हजार ५२१ पदांसाठी नाेकरभरतीची जाहिरात काढली गेली हाेती. मात्र, प्रत्यक्षात ही भरती अद्याप घेतली गेली नाही. मध्यंतरी काेराेना काळातील दाेन वर्षे त्यासाठी प्रमुख अडचण ठरली. या भरतीसाठी १२ लाख ७२ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. बहुतेकांनी एकापेक्षा अनेक जागांसाठी अर्ज केल्याने ही संख्या वाढली आहे. काहींनी तर चार ते पाच पदांसाठी अर्ज केल्याची माहिती आहे. ही भरती ऑनलाइन की ऑफलाइन याचाही गाेंधळ आहे. कारण, ऑनलाइन घ्यायची झाल्यास परीक्षा केंद्रांवर वायफाय सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात तालुकास्तरावरसुद्धा शाळा-महाविद्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. परीक्षा ऑफलाइन घेतल्यास त्यात भ्रष्टाचार हाेण्याची भीती उमेदवारांना आहे. त्यातूनच गाेंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

१२ लाख उमेदवारांची परीक्षा एकाचवेळी घ्यायची कशी, याचा प्रश्न सरकारपुढे निर्माण झाला आहे. कारण आयबीपीएस व टीसीएस या कंपन्यांची एवढ्या माेठ्या संख्येने परीक्षा घेण्याची क्षमता व अनुभव नाही. त्यांची क्षमता एकावेळी जास्तीत जास्त २० ते २५ हजार उमेदवारांची परीक्षा घेण्याची असल्याचे सांगितले जाते. याच अनुषंगाने लातूरच्या एका बेराेजगाराने परीक्षा लवकरात लवकर घ्यावी म्हणून नुकतेच मंत्री गिरीश महाजन यांना फाेनवरून साकडे घातले. आपण औरंगाबादमध्ये कशा अवस्थेत दिवस काढताे आहे, याबाबत आपली व्यथा मांडली. बहुतांश अर्जदारांची हीच अवस्था असल्याचे त्याने सांगितले. तेव्हा मंत्री महाजन यांनीसुद्धा उमेदवारांच्या संख्येपुढे सरकारची हतबलता बाेलून दाखविली. मात्र, लवकरच ही परीक्षा घेतली जाईल, असे आश्वासनही या उमेदवाराला दिले.

आठ जीआर अन् सीईओंवर भारया भरतीच्या अनुषंगाने आतापर्यंत राज्य शासनाने आठ जीआर काढले आहेत. अलीकडे तर शासनाने भरतीची ही जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर साेपविली हाेती. मात्र शासनाला जे शक्य नाही ते सीईओ कसे करणार, हा प्रश्न आहे. याच कारणावरून अनेक सीईओंची मंत्रालयातील संबंधित उपसचिवांवर नाराजी असल्याचेही सांगितले जाते. या भरतीसाठी धाेरणात्मक निर्णयाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे.

२५ काेटी परत देणार कसे ?जिल्हा परिषद नाेकरभरतीच्या अनुषंगाने सुशिक्षित बेराेजगारांनी अर्जासाेबत शुल्क भरले. त्यापाेटी शासनाकडे सुमारे २५ काेटींची रक्कम जमा आहे. मात्र, ही रक्कम उमेदवारांना परत करायची कशी, हा प्रश्न आहे. कारण अनेकांनी सायबर कॅफेवरून फाॅर्म भरले. त्यामुळे ही रक्कम त्या कॅफेच्या खात्यात जाण्याचा धाेका आहे.

असा आहे नाेकरभरतीचा प्रवास२६ मार्च २०१९ : १३ ५२१ जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध१४ जून २०२१: परीक्षेचे वेळापत्रक जाहीर१८ जून २०२१ : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर वेळापत्रक रद्द२८ ऑगस्ट २०२१ : पुन्हा वेळापत्रक जाहीर२९ सप्टेंबर २०२१ : पुन्हा वेळापत्रक रद्द१० मे २०२२ : महाविकास आघाडीने पुन्हा वेळापत्रक जाहीर केले२६ ऑगस्ट २०२२ : शिदे-फडणवीस सरकारकडून पुन्हा वेळापत्रक जाहीर१९ सप्टेंबर २०२२ : पुन्हा परीक्षा रद्द३१ डिसेंबर २०२२ : आरक्षणानुसार बिंदू नामावली निश्चित करणे

२०१९ भरतीतील शुल्कखुला प्रवर्ग : ५०० रुपयेराखीव प्रवर्ग : २५० रुपयेएकूण जमा शुल्क : २५ काेटी ८७ हजारएकूण अर्ज : १२ लाख ७२ हजार

टॅग्स :NandedनांदेडState Governmentराज्य सरकारjobनोकरी