शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

जोमात आलेले सोयाबीन नासल्याने वर्ष काढावे कसे? शेतकरी चिंतेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:15 IST

शेतकरी म्हणतात...यंदा दिवाळी साजरी झालीच नाही !

ठळक मुद्देहदगाव तालुक्यातील व्यथा  कापसाचीही झाली माती

- सुनील चौरे 

हदगाव (जि. नांदेड) : मनाठा-वरवंट शिवारातील शेतकऱ्यांची यंदा दिवाळी साजरी झालीच नाही. परतीच्या पावसाने झोडपून काढल्यामुळे उभे सोयाबीन भिजून कोंब फुटले. कापून ठेवलेले सोयाबीन जमा करण्यापूर्वीच शेतामध्ये तळे साचले. कुठे अर्धे सोयाबीन जमा झाले तर कुठे शेतामध्येच विखुरलेले राहिले. यामुळे शेतकऱ्यांची घाळण झाली. काढलेल्या सोयाबीनला दोन हजार रुपये बाजारभाव मिळाला. यात वर्ष काढावे कसे अन् घर चालवावे कसे? या चिंतेत शेतकरी आहेत.

वरवंट शिवारातील राजेश्वर वाठोरे, मधुकर वाठोरे यांचे सोयाबीन संपूर्ण शेतामध्ये विखुरलेले होते. ढीग जमा केला तर मळणीयंत्र चिखलामध्ये जात नाही. प्रयत्न करुन सोयाबीन काढले तर बाजारात सोयाबीन ओले व काळे पडल्याने भाव मिळत नाही, असे त्यांंनी सांगितले. मनाठा शिवारातील धोंडबा बोईनवाड, शिवाजी बोईनवाड यांचेही प्रचंड नुकसान झाले. दोन एकर घरची जमीन व दोन एकर खंडण केली. या दोन्ही शेतातील सोयाबीन पावसाने चिंब भिजले.  कसेतरी सोयाबीन काढले. सुंदराबाई  बोईनवाड म्हणाल्या, आमची दिवाळी यंदा झालीच नाही. हातात एक पैसा नाही.  सोयाबीन एकत्र जमविणे, ढीग झाकून ठेवणे, दररोज उघडणे यामध्ये दिवाळी गेली. सोयाबीन ७० टक्के नासले आहे, असेही त्या म्हणाल्या.

कापसाचे पीकही नाजूक असते. त्याला कमी वा जादा पाऊस जमत नाही.  शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याने फुटलेल्या बांधामध्ये बांध फुटत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू येत आहेत. आपबिती सांगताना त्यांचा ऊर दाटून येत होता. वर्षाचे गणित बिघडले आहे. शेतकऱ्यांनी जवळचे पैसे शेतात टाकले. सुगी आलेली असताना परतीच्या पावसाने तोंडचा घास हिरावून घेतला. शासनाने  आर्थिक मदत देण्याची गरज आहे, असे शेतकरी बोलून दाखवित आहेत.   तलाठ्यांनी स्पॉट पंचनामे केले. काही शेतावर ते गेले, मात्र शेजारच्या शेतात जाण्याचे टाळल्याने नाराजी वाढली आहे.

माझ्या शेतात तीन बॅग सोयाबीन होते. ढीग मारुन ठेवला मात्र खालून वरुन पाणीच पाणी. शेतामध्ये चिखल असल्यामुळे मळणीयंत्र शेतात येत नाही. पाऊस थांबत नाही. सोयाबीन काढले. सोयाबीन भिजल्यामुळे आर्द्रता व काळे पडल्यामुळे प्रतिक्विंटल दोन हजार भाव लागला. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलो.-धोंडबा बोईनवाड

एक एकर वावर. यामध्ये एक बॅग सोयाबीन. शेजारी दोन एकर खंडण केले. यामध्ये दोन बॅग सोयाबीन होते. दोन्ही शेतात आताही चिखलच आहे. घरच्या शेतातील ७० टक्के सोयाबीन नासले तर केलेल्या शिवारातील ५० टक्के खराब झाले. पाऊस उघडला नाही तर आणखी १५ दिवस मळणीयंत्र शेतात येत नाही.  पाऊस पडला तर काहीच हाती लागत नाही. खंडण केलेल्या शेतामध्ये तर नुकसानच नुकसान झाले.-सुंदराबाई बोईनवाड

पावसामुळे खूप घाळण झाली.  पीकपाणी बरे होते. तोंडाला आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला. दिवाळी आमची शेतातच झाली. हातात रुपयाही नाही. -अनिल सोनाळे, मनाठा

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसNandedनांदेड