शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

जोमात आलेले सोयाबीन नासल्याने वर्ष काढावे कसे? शेतकरी चिंतेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:15 IST

शेतकरी म्हणतात...यंदा दिवाळी साजरी झालीच नाही !

ठळक मुद्देहदगाव तालुक्यातील व्यथा  कापसाचीही झाली माती

- सुनील चौरे 

हदगाव (जि. नांदेड) : मनाठा-वरवंट शिवारातील शेतकऱ्यांची यंदा दिवाळी साजरी झालीच नाही. परतीच्या पावसाने झोडपून काढल्यामुळे उभे सोयाबीन भिजून कोंब फुटले. कापून ठेवलेले सोयाबीन जमा करण्यापूर्वीच शेतामध्ये तळे साचले. कुठे अर्धे सोयाबीन जमा झाले तर कुठे शेतामध्येच विखुरलेले राहिले. यामुळे शेतकऱ्यांची घाळण झाली. काढलेल्या सोयाबीनला दोन हजार रुपये बाजारभाव मिळाला. यात वर्ष काढावे कसे अन् घर चालवावे कसे? या चिंतेत शेतकरी आहेत.

वरवंट शिवारातील राजेश्वर वाठोरे, मधुकर वाठोरे यांचे सोयाबीन संपूर्ण शेतामध्ये विखुरलेले होते. ढीग जमा केला तर मळणीयंत्र चिखलामध्ये जात नाही. प्रयत्न करुन सोयाबीन काढले तर बाजारात सोयाबीन ओले व काळे पडल्याने भाव मिळत नाही, असे त्यांंनी सांगितले. मनाठा शिवारातील धोंडबा बोईनवाड, शिवाजी बोईनवाड यांचेही प्रचंड नुकसान झाले. दोन एकर घरची जमीन व दोन एकर खंडण केली. या दोन्ही शेतातील सोयाबीन पावसाने चिंब भिजले.  कसेतरी सोयाबीन काढले. सुंदराबाई  बोईनवाड म्हणाल्या, आमची दिवाळी यंदा झालीच नाही. हातात एक पैसा नाही.  सोयाबीन एकत्र जमविणे, ढीग झाकून ठेवणे, दररोज उघडणे यामध्ये दिवाळी गेली. सोयाबीन ७० टक्के नासले आहे, असेही त्या म्हणाल्या.

कापसाचे पीकही नाजूक असते. त्याला कमी वा जादा पाऊस जमत नाही.  शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याने फुटलेल्या बांधामध्ये बांध फुटत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू येत आहेत. आपबिती सांगताना त्यांचा ऊर दाटून येत होता. वर्षाचे गणित बिघडले आहे. शेतकऱ्यांनी जवळचे पैसे शेतात टाकले. सुगी आलेली असताना परतीच्या पावसाने तोंडचा घास हिरावून घेतला. शासनाने  आर्थिक मदत देण्याची गरज आहे, असे शेतकरी बोलून दाखवित आहेत.   तलाठ्यांनी स्पॉट पंचनामे केले. काही शेतावर ते गेले, मात्र शेजारच्या शेतात जाण्याचे टाळल्याने नाराजी वाढली आहे.

माझ्या शेतात तीन बॅग सोयाबीन होते. ढीग मारुन ठेवला मात्र खालून वरुन पाणीच पाणी. शेतामध्ये चिखल असल्यामुळे मळणीयंत्र शेतात येत नाही. पाऊस थांबत नाही. सोयाबीन काढले. सोयाबीन भिजल्यामुळे आर्द्रता व काळे पडल्यामुळे प्रतिक्विंटल दोन हजार भाव लागला. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलो.-धोंडबा बोईनवाड

एक एकर वावर. यामध्ये एक बॅग सोयाबीन. शेजारी दोन एकर खंडण केले. यामध्ये दोन बॅग सोयाबीन होते. दोन्ही शेतात आताही चिखलच आहे. घरच्या शेतातील ७० टक्के सोयाबीन नासले तर केलेल्या शिवारातील ५० टक्के खराब झाले. पाऊस उघडला नाही तर आणखी १५ दिवस मळणीयंत्र शेतात येत नाही.  पाऊस पडला तर काहीच हाती लागत नाही. खंडण केलेल्या शेतामध्ये तर नुकसानच नुकसान झाले.-सुंदराबाई बोईनवाड

पावसामुळे खूप घाळण झाली.  पीकपाणी बरे होते. तोंडाला आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला. दिवाळी आमची शेतातच झाली. हातात रुपयाही नाही. -अनिल सोनाळे, मनाठा

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसNandedनांदेड