शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कंधारचे ऐतिहासिक शिल्पवैभव दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:52 IST

कंधार व परिसरात असलेल्या शिल्पकला, शिल्पवैभव, मूर्तिशिल्पे असा सुंदर व देखणा वारसा अडगळीत असल्याचे भयावह चित्र आहे. भुईकोट किल्ला संवर्धन करण्यासाठी मोठे प्रयत्न होतात. तसे ऐतिहासिक मूर्तिशिल्पे जतन करण्यासाठी पावले उचलली जात नाहीत.

गंगाधर तोगरे।कंधार : कंधार व परिसरात असलेल्या शिल्पकला, शिल्पवैभव, मूर्तिशिल्पे असा सुंदर व देखणा वारसा अडगळीत असल्याचे भयावह चित्र आहे. भुईकोट किल्ला संवर्धन करण्यासाठी मोठे प्रयत्न होतात. तसे ऐतिहासिक मूर्तिशिल्पे जतन करण्यासाठी पावले उचलली जात नाहीत. पुरातत्त्व विभागाचा याकडे कानाडोळा होत असल्याचा सूर इतिहासप्रेमी, पर्यटकांतून उमटत आहे.कंधार शहर बाराशे वर्षांचा इतिहास जागवत आपले ऐतिहासिक महत्त्व टिकवून आहे. शहर आणि परिसरात बांधकाम, खोदकाम, शेती काम करताना जमिनीच्या उदरात दडलेली अनेक मूर्तिशिल्पे आढळतात. येथे क्षेत्रपाल मंदिर, मंडलसिद्धी विनायक मंदिर, कृष्णेश्वर मंदिर, कालप्रिय मंदिर, बंकेश्वर मंदिर, जैन मंदिर, बौद्ध विहार, बडी दर्गाह, छोटी दर्गाह आदींमुळे हा भाग विविध धार्मिक स्थळांनी ओळखला जातो. तसेच हा भाग अप्रतिम मूर्तिशिल्पे, कलात्मक रेखाटने व त्याच्या सौंदर्याने बहरला आहे.या भागातील अनेक मंदिरे कालोघात पडझडीने नष्ट झाली. त्यांचे अनेक अवशेष, खिंडारे पहायला मिळतात. तरीही जैन मंदिर, बौद्ध मूर्ती, अष्टभुजादेवी मूर्ती, द्वादशभुजा देवी आदीचे अतिशय चांगल्याप्रकारे जतन करण्यात या भागातील अनेकांनी यश मिळविले. परंतु, अनेक मूर्तिशिल्पांचे संवर्धन करून सौंदर्य जतन करण्यात पुरातत्त्व विभाग कमी पडत असल्याचे चित्र आहे.भुईकोट किल्ल्यात अनेक मूर्तिशिल्पे उघड्यावर ठेवण्यात आलेले आहेत. ऊन, पाऊस, वादळ-वारा, गारपीट यांचा आघात सहन करत आहेत. अतिशय कौशल्याने निर्माण केलेल्या मूर्तीदुर्लक्षाने त्यांचे सौंदर्य पुसटसे होत आहे. पर्यटकांना असे अस्ताव्यस्त असलेले मूर्तिशिल्पे पाहताना इतिहासात डोकावता येते. आणि दुसरीकडे याकडे होत असलेले दुर्लक्ष वेदनादायी ठरते. पुरातत्त्व विभागाने आधुनिक वस्तूसंग्रहालय निर्माण करण्यासाठी निकराचे प्रयत्न करावेत. असा सूर इतिहासप्रेमी, पर्यटक, नागरिकांतून उमटत आहे. क्षेत्रपाल भैरव, चंद्रशिळा, महादेव, नंदी, पार्वती, हत्ती, गणेश, कौमारी, वैष्णवी, महिषासुरमर्दिनी, लज्जागौरी, चामुंडा आदी मूर्तीचा उघड्यावरचा हा वनवास कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.बहाद्दरपुरा येथे मानार नदी काठावर शांतीघाट परिसर पर्यटकांना इतिहासात व निसर्गसौंदर्यात रममान करतो. माजी खा.व आ.भाई डॉ. केशवराव धोंडगे, माजी आ. भाई गुरूनाथराव कुरूडे यांनी ऐतिहासिक मूर्तिशिल्पे संवर्धन करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे राष्ट्रकुट भवन वस्तूसंग्रहालय अडीच दशकांपूर्वी अस्तित्वात आले. अनेक मूर्तिशिल्पे या ठिकाणी जतन करण्यासाठी पोषक ठरले. परंतु याचा आकार लहान व मूर्तींची संख्या अधिक असे झाल्याने अनेक मूर्तिशिल्पे बाहेर उघड्यावर आहेत. वस्तूसंग्रहालयातील मूर्तिशिल्पे स्वतंत्र मनुष्यबळाअभावी पहायला मिळत नाहीत.

ऐतिहासिक समृद्ध वारसा लाभलेल्या या भागातील मूर्तिशिल्पे वेरूळ-अजिंठा येथील तोडीचे आहेत. परंतु कंधार व परिसरातील हा समृद्ध वारसा जतन करणे काळाची गरज आहे. त्यासाठी पुरातत्त्व विभागाने किल्ल्यात विशेष लक्ष द्यावे. बहाद्दरपुरा येधील वस्तूसंग्रहालयात मनुष्यबळ निर्माण करून योग्य देखभाल करावी आणि नवीन पिढीला इतिहास माहिती करून घेण्यासाठी संधी द्यावी - माधवराव पेठकर (सरपंच, बहाद्दरपुरा ता.कंधार)

टॅग्स :NandedनांदेडArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणFortगड