शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

पाणीपट्टी, घरपट्टीचा ग्रामपंचायतीवर डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:39 IST

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नाची मदार पाणीपट्टी आणि घरपट्टी या दोन मुख्य आर्थिक स्त्रोतावर अवलंबुन असते़ मात्र या दोन्हीच्या थकबाकीचा डोंगर ग्रामपंचायतीवर वाढत असल्याचे दिसून येते़ पाणीपट्टीचे तब्बल १० कोटी ६० लाख थकीत आहेत़ तर घरपट्टीचाही १७ कोटी २४ लाख ६० हजाराचा डोंगर झाला आहे़ विशेष म्हणजे वसुलीची टक्केवारी अवघी २० टक्के असल्याचे दिसून येते़

ठळक मुद्देवसूली २० टक्के : घरपट्टीचे १७ कोटी तर पाणीपट्टीचे १० कोटी थकीत

विशान सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नाची मदार पाणीपट्टी आणि घरपट्टी या दोन मुख्य आर्थिक स्त्रोतावर अवलंबुन असते़ मात्र या दोन्हीच्या थकबाकीचा डोंगर ग्रामपंचायतीवर वाढत असल्याचे दिसून येते़ पाणीपट्टीचे तब्बल १० कोटी ६० लाख थकीत आहेत़ तर घरपट्टीचाही १७ कोटी २४ लाख ६० हजाराचा डोंगर झाला आहे़ विशेष म्हणजे वसुलीची टक्केवारी अवघी २० टक्के असल्याचे दिसून येते़जिल्ह्यातील १६ तालुक्यांकडे २०१७-१८ अखेरची २ कोटी ९ लाख ६४ हजाराची थकबाकी आहे़ तर याच कालावधीतील पाणीपट्टीचे १ कोटी १८ लाख ९० हजार रुपये थकीत आहेत़ तालुकानिहाय घरपट्टीची थकबाकी पाहता नांदेड तालुका २० लाख ५८ हजार, अर्धापूर ४ लाख १९ हजार, मुदखेड ३ लाख १० हजार, कंधार १५ लाख ३० हजार, मुखेड १८ लाख ८ हजार, देगलूर २१ लाख ५० हजार, बिलोली १२ लाख ११ हजार, नायगाव २३ लाख ९२ हजार, धर्माबाद ९ लाख ४५ हजार, हदगाव १७ लाख ५ हजार, किनवट २० लाख ४४ हजार, भोकर ५ लाख ३८ हजार, हिमायतनगर ९ लाख १० हजार, माहूर ६ लाख ५६ हजार, उमरी ६ लाख ३ हजार तर लोहा तालुक्याची घरपट्टीची थकबाकी १६ लाख ८५ हजार एवढी आहे़ २०१७-१८ मधील घरपट्टीच्या या थकीत रक्कमे दिवसेंदिवस वाढ होत आहे़दुसरीकडे पाणीपट्टी वसुलीची स्थितीही अशीच आहे़ जुलै अखेरपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार पाणीपट्टची मागील थकबाकी १ कोटी १८ लाखावर जावुन पोहोंचली आहे़ यात नांदेड तालुका ४ लाख ७० हजार, अर्धापूर ९ लाख ९९ हजार, मुदखेड १ लाख ३ हजार, कंधार ३ लाख ६२ हजार, मुखेड १२ लाख ९६ हजार, देगलूर ५ लाख ५२ हजार, बिलोली ४ लाख ५० हजार, नायगाव १० लाख ७४ हजार, धर्माबाद ४ लाख ५३ हजार, हदगाव १६ लाख ६४ हजार, किनवट ११ लाख २० हजार, भोकर ४ लाख ५८ हजार, हिमायतनगर ९ लाख २६ हजार, माहूर ४ लाख ५२ हजार, उमरी ५ लाख ५ हजार तर लोहा तालुक्यात १० लाख ६ हजाराची पाणीपट्टी थकीत आहे़घरपट्टी आणि पाणीपट्टीच वसुल होणार नसेल तर ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी निधी कसा उपलब्ध होणार ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असल्याने ग्रामस्थांकडील थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी आता विशेष मोहिम राबविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे़जुनी थकबाकी ठरतेय डोकेदुखीपाणीपट्टी आणि घरपट्टीचीही मागील थकबाकी वसुल होण्यास अडचणी येत असल्याने थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे़ २ कोटी ९ लाखांची २०१७-१८ मधील घरपट्टी थकीत आहे़ यातील ७१ लाख ४४ हजार वसुली करण्यात यश आले आहे़ अशीच स्थिती पाणीपट्टीच्या बाबतीतही दिसून येते़ २०१७-१८ मधील १ कोटी १८ लाख ९० हजाराची थकीत असून जुलै अखेरपर्यंत ४४ लाख ७७ हजार रुपयांची वसुली झाली आहे़ दर महिन्याच्या घर आणि पाणी पट्टीची रक्कम वाढत असतानाच जुनी थकबाकी वसुली अडचणी येत असल्याचे दिसून येते़स्थिती दयनीयपाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीत सर्वच तालुक्याची स्थिती दयनीय असल्याचे दिसून येते़ नांदेड तालुका पाणीपट्टीची वसुली २२़६२ टक्के, अर्धापूर १६़८० टक्के, मुदखेड २०़८७ टक्के, कंधार ३५़२८ टक्के, मुखेड १६़४९ टक्के, देगलूर १६़४५ टक्के, बिलोली १६़६४ टक्के, नायगाव २४़७२ टक्के, धर्माबाद २०़५८ टक्के, हदगाव १९़५२ टक्के, किनवट २१़३० टक्के, भोकर २३़४८ टक्के, हिमायतनगर २०़५५ टक्के, माहूर १९़४४ टक्के, उमरी ३०़१२ टक्के तर लोहा तालुक्याचे प्रमाणे २१़०८ टक्के इतके आहे़ घरपट्टीच्या वसुलीचीही अशीच स्थिती आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदWaterपाणीgram panchayatग्राम पंचायत