शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भेटीगाठीसोबतच मदतही आटली, वृद्धाश्रमात आजी- आजोबा एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:16 IST

नांदेड शहरात असलेल्या संध्याछाया वृद्धाश्रमात सध्या २६ ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक झाला. अनेक माणसे ...

नांदेड शहरात असलेल्या संध्याछाया वृद्धाश्रमात सध्या २६ ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक झाला. अनेक माणसे मृत्युमुखी पडत आहेत. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अशा वेळी वृद्धाश्रमात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जात आहे; परंतु मदतीचा ओघ कमी होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना इतर सुविधा पुरविताना अडचणी येत आहेत. यापूर्वी वृद्धाश्रमात अनेकजण वाढदिवस, विविध उपक्रम राबवीत असे. मात्र, आता कोरोनामुळे हे सर्व कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यातच आता वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. अगोदरच कोणी याठिकाणी जात नसल्याचे चित्र होते. आता कोरोना वाढल्याने कोणीही मदत करण्यासाठी पुढे येत नाही. तसेच वृद्धाश्रमात दाखल असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे नातेवाईकही मागील दोन महिन्यांपासून भेटीला आले नाहीत. त्यामुळे वृद्धाश्रमातील आजी, आजोबा एकाकी पडले आहेत. कोरोनामुळे दररोज अनेक रुग्ण मृत्यू होत आहेत. आपले नातेवाईक सुखाने राहावेत, यासाठी हे ज्येष्ठ नागरिक दररोज प्रार्थना करत आहेत.

चौकट- वृद्धाश्रमातील एकूण सदस्य- २६, स्त्री -२२, पुरुष - ४

चाैकट- भेट देणारे शून्यावर

यापूर्वी वृद्धाश्रमाला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक होती. वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संस्था तसेच सामाजिक, राजकीय नेते या वृद्धाश्रमाला भेटी देऊन आर्थिक किंवा साहित्याच्या स्वरूपात मदत देत असे. मात्र, आता कोणीही या वृद्धाश्रमाकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे वृद्धाश्रमानेच या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारला आहे.

चौकट- मदतही आटली

वृद्धाश्रमांना शासनाकडून अल्प अनुदान दिले जाते; परंतु ते वेळेत न देता चार, पाच वर्षांनी मिळते. त्यामुळे हे वृद्धाश्रम देणग्या तसेच मदतीवर चालविले जाते. सध्याच्या काळात वृद्धाश्रामातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना योग्य आहार व आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी अडचणी येत आहेत.

चाैकट-१. या महामारीने माणूस माणसात राहिला नाही. प्रत्येक जण जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहे. त्यामुळे आमच्याकडे कोण लक्ष देणार; परंतु आम्ही या वृद्धाश्रमात खूप आनंदी आहोत. आता हेच आमचे खरे घर आहे.

२. खऱ्या नातेवाइकांनी घराबाहेर काढले तरी कोरोनामुळे आम्हाला त्यांचीच काळजी वाटते. त्यांनी आम्हाला विचारले नाही तरी चालते; परंतु ते सुखाचे राहावेत. एवढीच आमची इच्छा आहे. इथे तर आमची सगळी सोय आहे.

३. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते खूप चांगले आहे. आज आम्ही एकाकी असलो तरी आमच्या सुख-दु:खाची काळजी घेणारे लोक या ठिकाणी आहेत. आमच्या नशिबातच होते या ठिकाणी येण्याचे, त्याला कोण काय करणार.