शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

भेटीगाठीसोबतच मदतही आटली, वृद्धाश्रमात आजी- आजोबा एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:16 IST

नांदेड शहरात असलेल्या संध्याछाया वृद्धाश्रमात सध्या २६ ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक झाला. अनेक माणसे ...

नांदेड शहरात असलेल्या संध्याछाया वृद्धाश्रमात सध्या २६ ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक झाला. अनेक माणसे मृत्युमुखी पडत आहेत. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अशा वेळी वृद्धाश्रमात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जात आहे; परंतु मदतीचा ओघ कमी होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना इतर सुविधा पुरविताना अडचणी येत आहेत. यापूर्वी वृद्धाश्रमात अनेकजण वाढदिवस, विविध उपक्रम राबवीत असे. मात्र, आता कोरोनामुळे हे सर्व कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यातच आता वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. अगोदरच कोणी याठिकाणी जात नसल्याचे चित्र होते. आता कोरोना वाढल्याने कोणीही मदत करण्यासाठी पुढे येत नाही. तसेच वृद्धाश्रमात दाखल असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे नातेवाईकही मागील दोन महिन्यांपासून भेटीला आले नाहीत. त्यामुळे वृद्धाश्रमातील आजी, आजोबा एकाकी पडले आहेत. कोरोनामुळे दररोज अनेक रुग्ण मृत्यू होत आहेत. आपले नातेवाईक सुखाने राहावेत, यासाठी हे ज्येष्ठ नागरिक दररोज प्रार्थना करत आहेत.

चौकट- वृद्धाश्रमातील एकूण सदस्य- २६, स्त्री -२२, पुरुष - ४

चाैकट- भेट देणारे शून्यावर

यापूर्वी वृद्धाश्रमाला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक होती. वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संस्था तसेच सामाजिक, राजकीय नेते या वृद्धाश्रमाला भेटी देऊन आर्थिक किंवा साहित्याच्या स्वरूपात मदत देत असे. मात्र, आता कोणीही या वृद्धाश्रमाकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे वृद्धाश्रमानेच या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारला आहे.

चौकट- मदतही आटली

वृद्धाश्रमांना शासनाकडून अल्प अनुदान दिले जाते; परंतु ते वेळेत न देता चार, पाच वर्षांनी मिळते. त्यामुळे हे वृद्धाश्रम देणग्या तसेच मदतीवर चालविले जाते. सध्याच्या काळात वृद्धाश्रामातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना योग्य आहार व आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी अडचणी येत आहेत.

चाैकट-१. या महामारीने माणूस माणसात राहिला नाही. प्रत्येक जण जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहे. त्यामुळे आमच्याकडे कोण लक्ष देणार; परंतु आम्ही या वृद्धाश्रमात खूप आनंदी आहोत. आता हेच आमचे खरे घर आहे.

२. खऱ्या नातेवाइकांनी घराबाहेर काढले तरी कोरोनामुळे आम्हाला त्यांचीच काळजी वाटते. त्यांनी आम्हाला विचारले नाही तरी चालते; परंतु ते सुखाचे राहावेत. एवढीच आमची इच्छा आहे. इथे तर आमची सगळी सोय आहे.

३. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते खूप चांगले आहे. आज आम्ही एकाकी असलो तरी आमच्या सुख-दु:खाची काळजी घेणारे लोक या ठिकाणी आहेत. आमच्या नशिबातच होते या ठिकाणी येण्याचे, त्याला कोण काय करणार.