शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

भेटीगाठीसोबतच मदतही आटली, वृद्धाश्रमात आजी- आजोबा एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:16 IST

नांदेड शहरात असलेल्या संध्याछाया वृद्धाश्रमात सध्या २६ ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक झाला. अनेक माणसे ...

नांदेड शहरात असलेल्या संध्याछाया वृद्धाश्रमात सध्या २६ ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक झाला. अनेक माणसे मृत्युमुखी पडत आहेत. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अशा वेळी वृद्धाश्रमात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जात आहे; परंतु मदतीचा ओघ कमी होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना इतर सुविधा पुरविताना अडचणी येत आहेत. यापूर्वी वृद्धाश्रमात अनेकजण वाढदिवस, विविध उपक्रम राबवीत असे. मात्र, आता कोरोनामुळे हे सर्व कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यातच आता वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. अगोदरच कोणी याठिकाणी जात नसल्याचे चित्र होते. आता कोरोना वाढल्याने कोणीही मदत करण्यासाठी पुढे येत नाही. तसेच वृद्धाश्रमात दाखल असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे नातेवाईकही मागील दोन महिन्यांपासून भेटीला आले नाहीत. त्यामुळे वृद्धाश्रमातील आजी, आजोबा एकाकी पडले आहेत. कोरोनामुळे दररोज अनेक रुग्ण मृत्यू होत आहेत. आपले नातेवाईक सुखाने राहावेत, यासाठी हे ज्येष्ठ नागरिक दररोज प्रार्थना करत आहेत.

चौकट- वृद्धाश्रमातील एकूण सदस्य- २६, स्त्री -२२, पुरुष - ४

चाैकट- भेट देणारे शून्यावर

यापूर्वी वृद्धाश्रमाला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक होती. वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संस्था तसेच सामाजिक, राजकीय नेते या वृद्धाश्रमाला भेटी देऊन आर्थिक किंवा साहित्याच्या स्वरूपात मदत देत असे. मात्र, आता कोणीही या वृद्धाश्रमाकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे वृद्धाश्रमानेच या ठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारला आहे.

चौकट- मदतही आटली

वृद्धाश्रमांना शासनाकडून अल्प अनुदान दिले जाते; परंतु ते वेळेत न देता चार, पाच वर्षांनी मिळते. त्यामुळे हे वृद्धाश्रम देणग्या तसेच मदतीवर चालविले जाते. सध्याच्या काळात वृद्धाश्रामातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना योग्य आहार व आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी अडचणी येत आहेत.

चाैकट-१. या महामारीने माणूस माणसात राहिला नाही. प्रत्येक जण जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहे. त्यामुळे आमच्याकडे कोण लक्ष देणार; परंतु आम्ही या वृद्धाश्रमात खूप आनंदी आहोत. आता हेच आमचे खरे घर आहे.

२. खऱ्या नातेवाइकांनी घराबाहेर काढले तरी कोरोनामुळे आम्हाला त्यांचीच काळजी वाटते. त्यांनी आम्हाला विचारले नाही तरी चालते; परंतु ते सुखाचे राहावेत. एवढीच आमची इच्छा आहे. इथे तर आमची सगळी सोय आहे.

३. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते खूप चांगले आहे. आज आम्ही एकाकी असलो तरी आमच्या सुख-दु:खाची काळजी घेणारे लोक या ठिकाणी आहेत. आमच्या नशिबातच होते या ठिकाणी येण्याचे, त्याला कोण काय करणार.