शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी; मात्र रेल्वे विभागाचा विशेष गाडीसाठी कानाडोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 15:58 IST

दिवाळीचा सण आटोपला असून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमधून चाकरमाने परतीच्या प्रवासाला लागले आहेत.

नांदेड : दोन दिवसांपासून रेल्वे गाड्या फुल्ल होऊन धावत असल्याने आणखी दोन विशेष एकेरी रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. मात्र पुणे मुंबई या मार्गावर या दोन्ही विशेष रेल्वे धावणार नसल्याने प्रवाशांना कितपत फायदा होणार हा प्रश्नच आहे.

दिवाळीचा सण आटोपला असून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमधून चाकरमाने परतीच्या प्रवासाला लागले आहेत.विशेषता सोमवारपासून नोकरीच्या ठिकाणी रुजू होण्याचे नियोजन असल्याने रेल्वे गाड्यांना शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले होते. रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने आणखी दोन विशेष रेल्वे गाड्या एकेरी मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद- भगत की कोठी आणि गुंटूर -जयपूर या दोन रेल्वे गाड्यांची प्रत्येकी एक फेरी केली जाणार आहे. हैदराबाद- भगत की कोठी (०७०२१ ) ही रेल्वे २२ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ पाच वाजता हैदराबाद येथून सुटणार आहे. सिकंदराबाद, मेदचल, वाडियाराम, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव मार्गे ही रेल्वे धावणार आहे. त्याचप्रमाणे गुंटूर -जयपूर (०७०२२) ही रेल्वे देखील २२ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता सुटणार असून, विजयवाडा, खम्मम, वारंगल, नागपूर, इटारसी, भोपाळ, सुजलापूर या मार्गाने धावणार आहे. रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या विशेष फेऱ्या चालविल्या जात आहेत.

प्रत्यक्षात नांदेडसह मराठवाड्यातील इतर रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता पुणे आणि मुंबईकडे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांनाच प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे या दोन मार्गावर विशेष रेल्वे सोडण्याची किंवा रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्याची आवश्यकता आहे. रेल्वे प्रशासनाने रविवारी विशेष फेऱ्या वाढविल्या असल्या तरी त्यात पुणे आणि मुंबईकडे धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा समावेश नाही. त्यामुळे या भागातील प्रवाशांना या विशेष रेल्वे फेऱ्यांचा कितपत फायदा होतो हा प्रश्नच आहे.

टॅग्स :NandedनांदेडRailway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वे