शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जोरदार पावसामुळे उर्ध्वमानार धरणात आवक वाढली; विसर्ग वाढण्याच्या शक्यतेने सतर्कतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 14:07 IST

सध्या उर्ध्वमानार धरणातून १५ दरवाज्याद्वारे ४७ हजार क्यूसेकपेक्षा अधिक विसर्ग सुरू आहे

- गोविंद कदमलोहा ( नांदेड) : तालुक्यातील उर्ध्व मानार (लिंबोटी) धरण ९१ टक्के भरले आहे. मात्र, परिसरातील सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येव्यात वाढ होत आहे. त्यामुळे आधीच सुरू असलेल्या विसर्गात कधीही वाढ केली जाऊ शकते, असा इशारा तहसील प्रशासनाकडून देण्यात आला आहे. यासाठी तलाठ्यांमार्फत गावकऱ्यांना सावधानतेचा संदेश पोहोचविण्यात आला आहे.

लिंबोटी उर्ध्वमानार धरणाचे १५ दरवाजे प्रत्येकी १ मीटरने उघडण्यात आले असून, सध्या १३३५.१८ क्यूमेक (सुमारे ४७,१५१ क्यूसेक) इतका विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. धरणात सतत येवा वाढत असल्याने परिस्थितीनुसार विसर्ग आणखी वाढविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

धरण क्षेत्रातील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून वाढत्या विसर्गामुळे लोहा व कंधार तालुक्यातील लिंबोटी, चोंडी, दगडसंगावी, मांजरे सांगवी, बोरी खु., उमरज, शेकापूर, घोडज, हणमंतवाडी, डोंगरगाव, संगमवाडी, कोल्ह्यांचीवाडी व इमामवाडी ही गावे पुराच्या धोक्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी सतर्क रहावे अफवांवर विश्वास ठेवू नयेलोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी सांगितले आहे की, ''धरणात मोठ्या प्रमाणावर येवा होत आहे. त्यानुसार विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे निम्न भागातील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे व सतर्क राहावे. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. पुरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी उर्ध्वमानार प्रकल्प लिंबोटी येथे पुर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे,”

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसDamधरण