शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

नांदेड जिल्ह्यात १४९० गावांना अतिवृष्टीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 15:14 IST

जिल्ह्यात ४ लाख ११ हजार ३७५ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित

ठळक मुद्देआतापर्यंत १०७ मि़मी़पाऊस४० ते ४५ टक्के पंचनामे पूर्ण 

- अनुराग पोवळे

नांदेड : जिल्ह्यात १८ आॅक्टोबरपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे १४९० गावांतील ४ लाख ११ हजार ३७५ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत़ यात सर्वाधिक फटका हा सोयाबीन पिकाला बसला असून सोयाबीनचे ७० ते ८० टक्के नुकसान झाले असून त्या खालोखाल ज्वारीचे ५० ते ६० टक्के नुकसान झाले आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ३०़७८ मि़मी़ पाऊस बरसला आहे़ ही टक्केवारी १०७़८७ इतकी झाली आहे़ चार वर्षानंतर पावसाने सरासरी ओलांडली आहे़

जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कंधार तालुक्याला बसला असून ४९ हजार ८३४ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली असून येथे ६४ हजार ८७२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे़ त्या खालोखाल लोहा तालुक्यात खरीप पिकांचे नुकसान झाले असून ४८ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात ६२ हजार ३५१ शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली आहेत़ नायगाव तालुक्यात ४३ हजार ४५० हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले असून त्यात २७ हजार ९४० हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे़ नांदेड तालुक्यात १८ हजार ९७६, अर्धापूर तालुक्यात १४ हजार ६८५, मुदखेड तालुक्यात १० हजार १४, देगलूर तालुक्यात २२ हजार ४३०, मुखेड तालुक्यात २१ हजार १३५, बिलोली तालुक्यात १९ हजार ४२०, धर्माबाद तालुक्यात २१ हजार ५५०, किनवट तालुक्यात २ हजार ६८९, माहूर तालुक्यात १२ हजार १२०, हिमायतनगर तालुक्यात १८ हजार ३७०, हदगाव तालुक्यात ३४ हजार ३४१, भोकर तालुक्यात ३९ हजार हेक्टर क्षेत्रात आणि उमरी तालुक्यात ३४ हजार ३६१ हेक्टर क्षेत्रातील पिके अतिवृष्टीने बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी विभागाने काढला असून हा अहवाल शासनाला पाठवण्यात आला आहे़ 

जिल्ह्यात सोयाबीनची ३ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती़ त्यातील २ लाख ४१ हजार ४९८ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे़ तब्बल ७० ते ८० टक्के सोयाबीन वाया गेले आहे़ जिल्ह्यात ज्वारीचे जवळपास ५० ते ६० टक्के नुकसान झाले असून ३५ हजार ६०० हेक्टर क्षेत्राची ज्वारीची पेरणी झाली होती़ त्यात २२ हजार १२४ हेक्टर क्षेत्रातील ज्वारी पूर्णत: काळी पडली आहे़ नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचीही बोंडे खराब झाले असून कापसाचे ३५ ते ४० टक्के नुकसान झाले आहे़ जिल्ह्यातील १ लाख १७ हजार १९८ हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे़ 

४ वर्षानंतर पावसाने सरासरी ओलांडली आहे़ ९५५़५५ मि़मी़ वार्षिक सरासरी पाऊस जिल्ह्यात होतो़ यंदा तो १०३०़७८ मि़मी़ इतका झाला आहे़ जिल्ह्यातील १६ पैकी १२ तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे़ मुदखेड तालुक्यात तब्बल दीडशे टक्के पाऊस झाला आहे़ कंधार तालुक्यात १३२़५९ टक्के, लोहा तालुक्यात १२९़०२ टक्के, नांदेड तालुक्यात १२२़२३ टक्के, अर्धापूर १०३़५०, भोकर १०३़४९, उमरी १००़३४, देगलूर १०३़७४, बिलोली १०८़९१, धर्माबाद ११७़०१, नायगाव ११५़६० टक्के आणि मुखेड तालुक्यात १२२़२० टक्के पाऊस झाला आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होणारे तालुके म्हणून ओळख असणाऱ्या किनवट-माहूर तालुक्यात मात्र यंदा पावसाने सरासरी गाठली नाही़ किनवट तालुक्यात ८०़८१ टक्के तर माहूर तालुक्यात ८४़६८ टक्के पाऊस झाला आहे़ हदगाव तालुक्यात ८४़३ आणि हिमायतनगर तालुक्यात ९६़२२ टक्के पाऊस बरसला आहे़ गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच यंदा दिवाळीत पावसाने जोरदार बॅटींग केली़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले़ 

पाच दिवसांत पंचनामेअतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकाचे पंचनामे कृषी व महसूल विभागाकडून संयुक्तपणे केले जात आहे़ आजघडीला जवळपास ४० टक्के नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली़  पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी केलेल्या पाहणीत पंचनाम्याचे काम पाच दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती