शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने पीक गेलं, डोकावरचे कर्ज कसे फिटेल; विवंचनेत शेतकऱ्याने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 19:40 IST

या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

- गोविंद टेकाळेअर्धापूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील धामदरी येथील ३५ वर्षिय शेतकऱ्याने अतिवृष्टीने पिके वाहून गेल्याने उत्पन्न काहीच नाही मिळणार, आता कर्जकडे फेडायचे या विवंचनेत कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान दि.२२ सप्टेंबर सोमवार रोजी या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील तरूण शेतकरी तातेराव भीमराव कदम वय ३५ वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तातेराव कदम हे मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. या वर्षी सुद्धा त्यांच्या दोन हेक्टर शेतात अतिवृष्टीने पीक वाहून गेल्याने काहीच उत्पन्न हाती येणार नाही. त्याचबरोबर त्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचा डोंगर वाढत होता. यातच मुलांच्या शिक्षणाच्या खर्च, घराचा उदरनिर्वाह कसा करायचा या विचारात ते असत. नापिकी आणि कर्ज यामुळे तातेराव पूर्णतः खचले होते. यातच रविवारी रात्री त्यांनी आपल्या राहत्या घरी छताच्या लोखंडी कडीला दस्तीने गळफास लावून आत्महत्या केली. 

या प्रकरणी साहेब कदम यांच्या माहितीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पप्पू चव्हाण करीत आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडfarmer suicideशेतकरी आत्महत्या