शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सरकारमुळे आरोग्य बिघडले, उपचारही तुम्हीच करा; सेवानिवृत्त पोलिसांचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:31 IST

आरोग्य योजनेसाठी पाच वर्षांपासून लढा

- राजेश निस्ताने

नांदेड : आधीच शिस्तीचे खाते, त्यात कायदा व सुव्यवस्था, व्हीआयपींची सुरक्षा, नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करताना पोलिस खात्यात संपूर्ण आयुष्य घालविले, सरकारसाठी रक्ताचे पाणी केले, वेळप्रसंगी छातीचा कोट केला, त्यामुळेच आमचे आरोग्य बिघडले, आता आम्ही सेवानिवृत्त झालो, म्हणून सरकार आम्हाला वाऱ्यावर सोडू शकत नाही. आता आमच्यावर उपचारही सरकारनेच मोफत करावे, यासाठी गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे.

महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी २००५ पासून ‘महाराष्ट्र पोलिस कुटुंब कल्याण आरोग्य योजना’ सुरू आहे. १८ मे २००५ ला मंत्रिमंडळाने यासंबंधीचा निर्णय घेतला. २ डिसेंबर २००५ च्या जीआरने ही योजना लागू केली. त्याअंतर्गत पोलिस कर्मचाऱ्याचे आई-वडील, पत्नी, अज्ञान मुले यांच्यावर मोफत उपचार केले जातात. २७ आकस्मिक व पाच गंभीर, अशा एकूण ३२ आजारांचा या योजनेत समावेश आहे. या योजनेत उपचारावरील खर्चाची मर्यादा नाही, परंतु सेवानिवृत्तीनंतर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.

निवृत्तीनंतरही पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी पोलिस कुटुंब कल्याण आरोग्य योजना लागू राहावी, यासाठी गेल्या पाच वर्षांपासून पोलिसांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांमार्फत संघर्ष सुरू आहे. अनेकदा मोर्चेही काढले गेले. पोलिस खात्यात आधीच कमी मनुष्यबळ व जास्त तास सेवा असल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडते. सेवानिवृत्तीनंतर त्याला अनेक आजार उद्भवतात. आधी असलेल्या आजारात भर पडते. सरकारच्या सेवेत असतानाच या आजारांची जणू ‘भेट’ मिळत असल्याने त्यावरील मोफत उपचारही सरकारनेच करावे, अशी पोलिस कुटुंबीयांची मागणी आहे. सरकार मात्र अशा उपचारासाठी महात्मा फुले, प्रधानमंत्री आरोग्य योजनेकडे बोट दाखवून हात वर करत आहे.

लष्कर, निमलष्कराच्या धर्तीवर लागू करालष्कर, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील निमलष्करी दल आदींना सेवानिवृत्तीनंतरही मोफत उपचार योजनेचा लाभ दिला जातो. पोलिसही सुद्धा सुरक्षा श्रेणीतील सेवा असल्याने त्याच धर्तीवर मोफत आरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी संघर्ष केला जात आहे. राज्य राखीव पोलिस दल आणि कारागृहाच्या यंत्रणेलाही या लाभापासून वंचित ठेवले जात आहे.

पोलिस कुटुंब रस्त्यावर लढा देणारसेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस कुटुंब कल्याण योजना ही मोफत आरोग्य सेवा लागू करावी, यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. वारंवार निवेदने दिली गेली, मोर्चे काढले गेले. मात्र प्रतिसाद दिला गेला नाही. शासनाने या मागणीचा विचार न केल्यास सर्व पोलिस कुटुंबांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी चालविली आहे.- नीलेश नागोलकर, कार्याध्यक्ष, पोलिस परिवार न्याय हक्क संघर्ष समिती.

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिसHealthआरोग्य