शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

जाकापूर, इस्लापूरला भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:43 IST

तालुक्यात कमी झालेले पर्जन्यमान आणि पुरेशा सिंचन क्षमतेच्या अभावामुळे फेब्रुवारी पासून पाणी टंचाईच्या झळा तालुकावासियांना सोसाव्या लागत आहेत.

ठळक मुद्देभोकर तालुक्यात १४ गावांत अधिग्रहणइस्लापूरला महिलांनी खुर्चीला चिटकवले निवेदन

भोकर : तालुक्यात कमी झालेले पर्जन्यमान आणि पुरेशा सिंचन क्षमतेच्या अभावामुळे फेब्रुवारी पासून पाणी टंचाईच्या झळा तालुकावासियांना सोसाव्या लागत आहेत. आतापर्यंत ४३ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली असली तरी १४ गावांमध्ये अधिग्रहण मंजूर करण्यात आले आहे. तर जाकापूर येथे टँकरची मागणी करण्यात आली आहे.तालुक्याचा सर्वाधिक भाग डोंगराळ असल्याने कायम पाण्याच्या स्तोत्राचा अभाव आहे. त्यातच पुरेशा साठवण क्षमतेची कमतरता असल्याने जानेवारी अखेर तालुक्याला पाणी टंचाईचा सामना अधिकतर गावांना करावा लागतो. याहीवर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील १७ गावांनी जानेवारी अखेर पंचायत समितीकडे अधिग्रहणाची मागणी केली होती. त्या प्रमाणे पंचायत समिती व तहसील कार्यालयामार्फत स्थळ पाहणी केलेल्या ६ गावातील टंचाई निवारणार्थ खाजगी विहीर अथवा विंधन विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. यात पोमनाळा, कासारपेठ तांडा, गारगोटवाडी (पां), कोळगाव (खु), डौरवाडी, कांडली आदी गावांना फेब्रुवारी महिन्यातच अधिग्रहणाला मंजुरी मिळाली. त्यानंतर फेब्रुवारी अखेर पर्यंत अधिग्रहण मागणीच्या प्रस्तावानुसार मंजूर करण्यात आलेल्या ८ गावांना मंजुरी मिळाली आहे. यात पाकी धुळदेव, चिंचाळा, गारगोटवाडी (दि.), पाकीतांडा, पांडूरणा, देवठाणातांडा, देवठाणामसलगा आणि देवठाणा आदी गावात नव्याने मंजुरी मिळाली आहे. मागणी केलेल्या रामनगरतांडा, देवठाणातांडा आणि दिवशी खु. तांडा येथील मागणी नामंजूर करण्यात आली तर उर्वरीत २६ गावांमध्ये पंचायत समिती स्तरावर स्थळ पाहणी करण्यात येवून तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.शहरापासून ६ कि.मी. वरील जाकापूर येथे ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून येथील ग्राम पंचायतीने टँकर मागणीचा ठराव घेवून तसा प्रस्ताव एक महिन्यापूर्वीच सादर केला असला तरी तेथे अजून मंजुरी मिळाली नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे.अधिग्रहण मागणीला मंजुरीपोमनाळा, कासारपेठ तांडा, गारगोटवाडी (पां), कोळगाव (खू), डौरवाडी, कांडली आदी गावांना फेब्रुवारी महिन्यातच अधिग्रहणाला मंजुरी मिळाली. त्यानंतर फेब्रुवारी अखेर पर्यंत अधिग्रहण मागणीच्या प्रस्तावानुसार मंजूर करण्यात आलेल्या ८ गावांना मंजुरी मिळाली आहे. यात पाकी धुळदेव, चिंचाळा, गारगोटवाडी (दि.), पाकीतांडा, पांडूरणा, देवठाणातांडा, देवठाणामसलगा आणि देवठाणा आदी गावात नव्याने मंजुरी मिळाली आहे.दहा दिवसांपासून नळयोजना बंदइस्लापूर : परिसरातील नागरिकांना सध्या तीव्र पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे़ मागील दहा दिवसापासून नळ योजना बंद असल्याने महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्चीलाच निवेदन चिटकावले़ पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महिला निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या होत्या़ मात्र त्याठिकाणी सरपंचासह पदाधिकारी न आल्याने महिलांनी चक्क खुर्चीलाच निवेदन चिटकविले. २६ मार्च रोजी पाणी पुरवठा न केल्यास ग्रा.पं.ला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. सध्या येथे शंभर रुपये टाकीप्रमाणे पाणी विक्री चालू आहे. काही गावकरी वॉटर फिल्टरचे अशुद्ध वेस्ट पाणी वापरत आहेत. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी निवेदन दिले़ यावेळी रंजना बर्डे, अखिला शेख, करुणा शेळके, कलावती हनवते, पदमीनबाई घुले, पंचफुला मोरे, सत्यभामा पंदीलवार, सौजरबाई पंदिलवार, गंगाबाई काळे, पद्मीन गजभारे, रजिया शेख, खादीरबाई श्ेख, चंद्रकला भवरे, दुर्गा वाघमारे, आखिलाबी, आम्रपाली शेळके, सुरेखा जाधव, किरण वानखेडे, प्रतिभा हनवते, लव्हाळेबाई, शेख हुसेन, दलित भालेराव, रफीक पटेल, रवि कसबे, संतराम पंदीलवाड आदी उपस्थित होत्या़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई