शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जाकापूर, इस्लापूरला भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:43 IST

तालुक्यात कमी झालेले पर्जन्यमान आणि पुरेशा सिंचन क्षमतेच्या अभावामुळे फेब्रुवारी पासून पाणी टंचाईच्या झळा तालुकावासियांना सोसाव्या लागत आहेत.

ठळक मुद्देभोकर तालुक्यात १४ गावांत अधिग्रहणइस्लापूरला महिलांनी खुर्चीला चिटकवले निवेदन

भोकर : तालुक्यात कमी झालेले पर्जन्यमान आणि पुरेशा सिंचन क्षमतेच्या अभावामुळे फेब्रुवारी पासून पाणी टंचाईच्या झळा तालुकावासियांना सोसाव्या लागत आहेत. आतापर्यंत ४३ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली असली तरी १४ गावांमध्ये अधिग्रहण मंजूर करण्यात आले आहे. तर जाकापूर येथे टँकरची मागणी करण्यात आली आहे.तालुक्याचा सर्वाधिक भाग डोंगराळ असल्याने कायम पाण्याच्या स्तोत्राचा अभाव आहे. त्यातच पुरेशा साठवण क्षमतेची कमतरता असल्याने जानेवारी अखेर तालुक्याला पाणी टंचाईचा सामना अधिकतर गावांना करावा लागतो. याहीवर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील १७ गावांनी जानेवारी अखेर पंचायत समितीकडे अधिग्रहणाची मागणी केली होती. त्या प्रमाणे पंचायत समिती व तहसील कार्यालयामार्फत स्थळ पाहणी केलेल्या ६ गावातील टंचाई निवारणार्थ खाजगी विहीर अथवा विंधन विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. यात पोमनाळा, कासारपेठ तांडा, गारगोटवाडी (पां), कोळगाव (खु), डौरवाडी, कांडली आदी गावांना फेब्रुवारी महिन्यातच अधिग्रहणाला मंजुरी मिळाली. त्यानंतर फेब्रुवारी अखेर पर्यंत अधिग्रहण मागणीच्या प्रस्तावानुसार मंजूर करण्यात आलेल्या ८ गावांना मंजुरी मिळाली आहे. यात पाकी धुळदेव, चिंचाळा, गारगोटवाडी (दि.), पाकीतांडा, पांडूरणा, देवठाणातांडा, देवठाणामसलगा आणि देवठाणा आदी गावात नव्याने मंजुरी मिळाली आहे. मागणी केलेल्या रामनगरतांडा, देवठाणातांडा आणि दिवशी खु. तांडा येथील मागणी नामंजूर करण्यात आली तर उर्वरीत २६ गावांमध्ये पंचायत समिती स्तरावर स्थळ पाहणी करण्यात येवून तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.शहरापासून ६ कि.मी. वरील जाकापूर येथे ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून येथील ग्राम पंचायतीने टँकर मागणीचा ठराव घेवून तसा प्रस्ताव एक महिन्यापूर्वीच सादर केला असला तरी तेथे अजून मंजुरी मिळाली नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे.अधिग्रहण मागणीला मंजुरीपोमनाळा, कासारपेठ तांडा, गारगोटवाडी (पां), कोळगाव (खू), डौरवाडी, कांडली आदी गावांना फेब्रुवारी महिन्यातच अधिग्रहणाला मंजुरी मिळाली. त्यानंतर फेब्रुवारी अखेर पर्यंत अधिग्रहण मागणीच्या प्रस्तावानुसार मंजूर करण्यात आलेल्या ८ गावांना मंजुरी मिळाली आहे. यात पाकी धुळदेव, चिंचाळा, गारगोटवाडी (दि.), पाकीतांडा, पांडूरणा, देवठाणातांडा, देवठाणामसलगा आणि देवठाणा आदी गावात नव्याने मंजुरी मिळाली आहे.दहा दिवसांपासून नळयोजना बंदइस्लापूर : परिसरातील नागरिकांना सध्या तीव्र पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे़ मागील दहा दिवसापासून नळ योजना बंद असल्याने महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्चीलाच निवेदन चिटकावले़ पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महिला निवेदन देण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या होत्या़ मात्र त्याठिकाणी सरपंचासह पदाधिकारी न आल्याने महिलांनी चक्क खुर्चीलाच निवेदन चिटकविले. २६ मार्च रोजी पाणी पुरवठा न केल्यास ग्रा.पं.ला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. सध्या येथे शंभर रुपये टाकीप्रमाणे पाणी विक्री चालू आहे. काही गावकरी वॉटर फिल्टरचे अशुद्ध वेस्ट पाणी वापरत आहेत. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी निवेदन दिले़ यावेळी रंजना बर्डे, अखिला शेख, करुणा शेळके, कलावती हनवते, पदमीनबाई घुले, पंचफुला मोरे, सत्यभामा पंदीलवार, सौजरबाई पंदिलवार, गंगाबाई काळे, पद्मीन गजभारे, रजिया शेख, खादीरबाई श्ेख, चंद्रकला भवरे, दुर्गा वाघमारे, आखिलाबी, आम्रपाली शेळके, सुरेखा जाधव, किरण वानखेडे, प्रतिभा हनवते, लव्हाळेबाई, शेख हुसेन, दलित भालेराव, रफीक पटेल, रवि कसबे, संतराम पंदीलवाड आदी उपस्थित होत्या़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई